शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

जंगलाच्या जिल्ह्यात सरपणाची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST

चामाेर्शी : जिल्ह्यातील बाराही तालुक्यात जंगल आहे. तसेच जंगलाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात सरपणाची समस्या अनेक वर्षांपासून कायम ...

चामाेर्शी : जिल्ह्यातील बाराही तालुक्यात जंगल आहे. तसेच जंगलाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात सरपणाची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. महिलांच्या आरोग्याचा व धुरमुक्त स्वयंपाक हा विचार करून शासनाने प्रत्येक कुटुंबाला उज्ज्वला योजनेतून गॅस कनेक्शन दिले. मात्र दिवसेंदिवस गॅस भरण्यासाठी असलेले दर वाढत जात असल्याने गोरगरीब जनतेला गॅस भरणे परवडत नसल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करणे सुरु झाले आहे. स्वयंपाक तयार करण्यासाठी लागणाऱ्या सरपणासाठी महिला पायपीट करीत असून यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शेतातील पिके निघाल्यावर शेतकरी व नागरिक पावसाळ्यात लागणाऱ्या सरपणाची तजवीज करीत असतात. यासाठी शेताच्या बांधावर असलेले झाडे तोडून वाळवत असतात मग पावसाळ्यात त्या सरपणाचा उपयोग केला जातो. त्यासाठी महिला सकाळी सरपण गोळा करण्यासाठी घराबाहेर पडत असतात. त्या दुपारपर्यंत डोक्यावर मोळी घेऊन घरी परतताना दिसून येत आहेत. गॅसच्या किमती कमी होत्या तेव्हा बरेच कुटुंब गॅसवर स्वयंपाक करीत होते. मात्र दिवसेंदिवस गॅस भरण्यासाठी हातात चार पैसे नसल्याने बरेच कुटुंब गॅस सिलिंडर भरणे बंद केले आहेत. त्यामुळे पुन्हा सरपण गोळा करण्यासाठी महिलांना धडपड करावी लागत आहे. जंगलव्याप्त जिल्हा असूनही जिल्ह्यात सरपणाची गंभीर समस्या कायम असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे

गोबरगॅसची झाली आठवण

पूर्वी ‘गाव तिथे गोबरगॅस ’ ही संकल्पना होती मात्र जनावरांच्या घटत्या संख्येमुळे गोबर गॅसचे अस्तित्व फार काळ टिकू शकले नाही. शेतातील बहुतेक कामे टॅक्टरने केली जात आहेत. त्यामुळे जनावरे पाळणे आता कमी होऊ लागले आहे. जनावरांच्या शेणाचा गोबर गॅससाठी वापर करून त्याचा इंधन म्हणून वापर केला जात होता. मात्र जनावरांची संख्या रोडावली असल्याने गावागावात असलेल्या गोबर गॅस बंद पडलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे आता शेतकरी गोबर गॅसची आठवण करू लागले आहेत.

ग्रामीण भागात इंधन म्हणून गोवऱ्याचा आधार

ग्रामीण भागात सरपणाची समस्या कायम आहे. त्यासाठी शेतकरी कुटुंब आपल्याकडे असलेल्या जनावरांच्या शेणापासून गोवऱ्या थापण्याचे काम करीत आहेत. सध्या उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शेतकरी महिला उन्हाळ्यात शेतशिवारात गोवऱ्याच थापताना दिसून येत आहेत. पावसाळ्यात इंधन म्हणून गोवऱ्याचा माेठा आधार मिळत असतो यासाठी गावाबाहेरील शेतात वाळलेल्या गोवऱ्याचे ढिग दिसून येत आहेत.

पैशाच्या लोभापायी शेतातील वृक्षावर कुऱ्हाड

शेतकरी शेताच्या बांधावर असलेल्या वृक्षाचे पालनपोषण करून मोठ्या कष्टाने वाढविले. मात्र पैशाचा लोभ वाढत गेल्याने शेतातील वृक्ष तोडून ती परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांना विकली जात आहेत. त्यामुळे शेतशिवारातील सावली आता हळूहळू नष्ट व्हायला लागली आहे. विशेषतः बाभूळ व सुबाभूळ झाडाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांना यापोटी चार पैसे मिळत असले तरी मात्र पर्यावरणीय समस्या वाढत जाणार आहे. याबाबत पर्यावरण प्रेमी व वनविभाग मौन धारण केलेले दिसून येत आहे.