शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या शेतकऱ्यांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:55 IST

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना मार्गदर्शनही केले.

ठळक मुद्देकृषी कल्याण अभियानाचा समारोप : शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची दिली माहिती
<p>लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना मार्गदर्शनही केले.आकांक्षित जिल्हा विकास कार्यक्रमाअंतर्गत १ जून ते ३१ जुलै या कालावधीत कृषी कल्याण अभियानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सांगता जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत चामोर्शी तालुक्यातील वसंतपूर या गावी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. कार्यक्रमाला सरपंच तपन सरकार, पंचायत समिती उपसभापती बिश्वास, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, पशुसंवर्धन आयुक्त डॉ.संगीता निरगुडकर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.बोथीकर, डॉ.ताथोड, डॉ.कदम, तालुका कृषी अधिकारी राजपूत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हेमंतकुमार उंदीरवाडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना, मृदा आरोग्य पत्रिका, पीक कर्ज योजना, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स व्यवसाय, जीवन सुरक्षा योजना, ग्राम स्वराज्य अभियान या विषयांवर शेतकºयांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची कृषीविषयक माहिती असलेली दैनंदिनी पुस्तक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. त्यातील तांत्रिक माहितीचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असे सूचित केले. शेतकऱ्यांना फळरोपे, मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाला वसंतपूर परिसरातील शेकडो शेतकरी व नागरिक उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्याचा सहावा क्रमांककृषी कल्याण अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांच्या आधारे गडचिरोली जिल्ह्याचा अखिल भारतीय स्तरावर सहावा क्रमांक आहे. मागील आठवड्यात गडचिरोली जिल्ह्याने चवथ्या क्रमांकावर झेप घेतली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत उर्वरित लक्षांक पूर्ती करून पहिल्या पाचमध्ये क्रमांक मिळविण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.कृषी कल्याण अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याला दिलेल्या लक्ष्यापैकी सद्य:स्थितीत ९९ टक्के मृद आरोग्य पत्रिका वितरणाचे उद्दिष्ट गाठले आहे. तसेच फळ रोपांचे वाटप १०२ टक्के, मिनीकिट बियाणे वाटप ११३ टक्के, नाडेप १२ टक्के, कृत्रिम रेतन १५ टक्के, लसीकरण ९७ टक्के एवढे उद्दिष्ट गाठले आहे.