शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ११ शेतकऱ्यांचा गौरव

By admin | Updated: July 2, 2015 02:09 IST

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन ...

पालकमंत्र्यांचे आवाहन : जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावागडचिरोली : कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन व कृषी जनजागृती सप्ताह शुभारंभाच्या कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी रणजीतकुमार, कृषी विभाग उपसंचालक विजय कोळेकर, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड, जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते पडीत जागेवर सुबाभूळची शेती, भातपिकाच्या शेतीसाठी रोवणी यंत्राचा वापर, शेळी व भाजीपाला उत्पादन करणारे तसेच यांत्रिकीकरणाद्वारे भात रोवणी व श्रीपद्धतीने भाताची रोवणी करणाऱ्या पुरूष व महिला शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रंसगी पालकमंत्री आत्राम म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात भरपूर प्रमाणात पाणी आहे. मात्र जिल्ह्याच्या पाणी स्त्रोतातून शेतीपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाच्या वतीने विविध शासकीय योजना राबवूनही दुर्गम भागातील शेतकरी दरवर्षी दुष्काळाचा सामना करतो. पुरेशा प्रमाणात सिंचन सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. याकरिता पाच वर्षांचा सिंचन सुविधेचा सूक्ष्म आराखडा तयार करणे गरजेचे आहे व असा आराखडा तयार करण्याच्या कार्यवाहिला राज्याचे मुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखविली असून येत्या काही महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातही कृषी क्षेत्राच्या विकासाचा व सिंचन सुविधेचा आराखडा तयार होईल, असेही पालकमंत्री आत्राम म्हणाले.सन्मानित झालेल्या आदर्श शेतकऱ्यांचा जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी आदर्श घेऊन कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करावी, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जि. प. सीईओ संपदा मेहता यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, संचालन चंद्रकांत ठाकरे यांनी केले तर आभार एस. टी. पठाण यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)कृषी कर्मचाऱ्यांकडून गावागावांत जनजागृती कृषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ ते ७ जुलैदरम्यान कृषी विभागाचे कर्मचारी १२ ही तालुक्यात गावागावात जाऊन कृषी योजना व धोरणाबाबत जनजागृती करणार आहेत, अशी माहिती डॉ. कुडमुलवार यांनी दिली.या शेतकऱ्यांचा झाला गौरवकृषीदिन कार्यक्रमात पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये चंद्रशेखर रामदास मुरतेली रा. पारडी ता. गडचिरोली, भास्कर श्रीराम वैद्य रा. शिवणी बुज ता. आरमोरी, सुहांगणा हिरालाल प्रधान रा. पिंपळगाव (हलदी) ता. देसाईगंज, खुशाल वासुदेव गुरनुले रा. बेतकाठी ता. कोरची, रेखा कृष्णा गावतुरे रा. बेडगाव घाट ता. कोरची, उदाराम बळीराम क वाडकर रा. नवरगाव ता. कुरखेडा, गजानन भुरसे रा. मेंढाटोला ता. धानोरा, मोरेश्वर गंगाधर चरडे रा. चंदनवडी ता. चामोर्शी, मीना बिचंगा सिडाम रा. मल्लमपल्ली, बंडू चिन्ना लेकामी रा. मल्लमपल्ली ता. एटापल्ली, सिरय्या पेंटा गावडे रा. गरखापेठा ता. सिरोंचा आदींचा समावेश आहे.