शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

उन्हाळी धानाला कोंड्याचा भाव

By admin | Updated: June 4, 2014 23:44 IST

उन्हाळी धानाची फसल निघाली असून शेतकरी धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेत आहेत. मात्र धानाला ओलावा असून मार्केटमध्ये मंदी असल्याचे कारण पुढे करून केवळ ९00 ते ११00

असंतोष : शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून फसवणूकअरूण राजगिरे - कोरेगाव/चोपउन्हाळी धानाची फसल निघाली असून शेतकरी धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेत आहेत. मात्र धानाला ओलावा असून मार्केटमध्ये मंदी असल्याचे कारण पुढे करून केवळ ९00 ते ११00 रूपयापर्यंतचे भाव दिले जात आहे. एवढा भाव धानाच्या कोड्यालाही मिळत आहे. त्याचबरोबर या विक्रीतून धान उत्पादनाचा खर्चही भरून निघणे कठीण झाला असल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोष पसरला आहे. कोरेगाव चोप परिसरासह देसाईगंज तालुक्यात उन्हाळी धान पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. मागील वर्षी अगदी शेवटपर्यंत पाऊस पडल्याने मोठे तलाव व इटियाडोह प्रकल्प पाण्याने भरला होता. त्यामुळे यावर्षी देसाईगंज तालुक्यातील बहुसंख्य शेतकर्‍यांनी उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेतले. काही दिवसातच खरीप हंगामाला सुरूवात होणार आहे. खरीप हंगामासाठी बियाणे, खते, कीटकनाशके व इतर खर्च करण्यासाठी शेतकरी वर्ग धानाची विक्री करीत आहे. देसाईगंज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी धानाची मोठय़ा प्रमाणात आवक वाढली आहे. याचा फायदा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी घेणे सुरू केले आहे. धानामध्ये ओलावा आहे, मार्केटमध्ये मंदी आहे, असे कारण पुढे करून उन्हाळी धानाला केवळ ९00 रूपये ते १ हजार १३0 रूपयापर्यंतचे भाव दिले जात आहे. आधारभूत हमीभाव १ हजार ३00 रूपयापेक्षा जास्त असतांनाही यापेक्षाही कमी भाव देऊन शासनाचा निर्णय पायदळी तुडवून शेतकर्‍यांची लुबाडणूक चालविली जात आहे. देसाईगंज तालुक्यातील बहुसंख्य शेतकर्‍यांनी चांगला भाव मिळावा यासाठी जय o्रीराम, ओम तीन, एचएमटी, साईराम यासारख्या बारीक धानाची लागवड केली. या धानाला इतर बाजारामध्ये जवळपास २ हजार ते ३ हजार रूपयापर्यंतचा भाव दिला जात आहे. मात्र देसाईगंज येथील व्यापार्‍यांनी संघटन करून अत्यंत कमी भाव देत आहेत. ९00 ते १ हजार १00  रूपयापेक्षा जास्त भाव तांदूळ दळल्यानंतर निर्माण झालेल्या कोंड्याला व कुकसालाही मिळत आहे. यातून व्यापारी व राईस मिलधारक लाखो रूपये कमवत आहेत. धानाला सध्या मिळत असलेल्या भावातून नफा तर सोडाच उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. वाढत्या महागाईमुळे बियाणे, खते, कीटकनाशके यांचे भाव गगणाला भिडले आहेत. मजुरांची मजुरी १५0 ते २00 रूपये एवढी झाली आहे. या सर्व बाबीमुळे उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. मोठय़ा आशेने तालुक्यातील शेतकर्‍यांनी धान पिकाची लागवड केली. मात्र मिळत असलेल्या कमी भावामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. या विक्रीतून अत्यंत कमी पैसे मिळत असल्याने पुढील खरीप हंगाम कसा करावा, असा प्रश्न या शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. मात्र पुढील खरीप हंगामासाठी खर्च करायचा असल्याने मिळेल त्या किंमतीत धानाची विक्री केली जात आहे. व्यापार्‍यांकडून होणारी फसवणूक लक्षात घेऊन आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी मागील एक महिन्यांपासून जिल्हाभरातील लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या या दुर्लक्षामुळेही शेतकर्‍यांचे हाल होत असल्याचे स्पष्ट होत आहे. धानाला बोनस देण्याचे तरतूद शासनाने केली असली तरी देसाईगंज पंचायत समितीमध्ये विकणार्‍या शेतकर्‍यांना अजूनपर्यंत रूपयाचेही बोनस देण्यात आलेले नाही. त्यामुळे बाजार समितीमध्येच धान नेऊन का विकावे, असा प्रश्न तालुक्यातील शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.