शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

व्यसनमुक्तीसाठी कृती आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:03 IST

दारु व तंबाखुमुक्तीसाठी करण्याबाबत प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करुन १५ दिवसांत सादर करावा आणि त्यानुसार काम सुरु करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी येथे दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : कार्यालय प्रमुखांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारु व तंबाखुमुक्तीसाठी करण्याबाबत प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करुन १५ दिवसांत सादर करावा आणि त्यानुसार काम सुरु करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी येथे दिले.जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेला सर्चचे संचालक डॉ.अभय बंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, डीएचओ शशिकांत शंभरकर, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी आदी उपस्थित होते.जिल्हयात दरवर्षी २ हजार ५०० लोक तंबाखुयुक्त पदार्थांच्या व्यसनी जातात आणि यामुळे दरवर्षी १३ हजार नागरिक तंबाखुमूळे दारिद्र्यात लोटले जात आहेत. जिल्ह्यात तंबाखुयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे दरवर्षी ७३ कोटी रुपये खर्च होत असल्याचा निष्कर्ष निघालेला आहे. अगदी कमी वयात तंबाखूचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. मुखकर्करोग प्रतिबंधासाठी तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन बंद करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी केले.तंबाखू व दारुमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत सहभागी व अंमलबजावणी करणाºया कार्यालयांनी प्रथम व्यसनमुक्त कार्यालय झाल्याचे जाहीर करुन तसा फलक दर्शनी भागावर लावावा, अशा सूचना यापुर्वीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व शासकीय कार्यालय प्रमुख व शाखा प्रमुख यांनी पुढील १५ दिवसात दारु व तंबाखू नियंत्रणाबाबत कृती कार्यक्रम आराखडा तयार करुन सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले.याप्रसंगी डॉ.अभय बंग म्हणाले, अन्न व औषध विभागाने पोलिसांना सहकार्य करुन प्रथम तालुक्याच्या ठिकाणी कडक कारवाई करावी. या कारवाईचा परिणाम आपोआपच जिल्हाभरातील गावांमध्ये पोहचायला वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे प्रथम स्वत:चे कार्यालय, समाज या व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढा असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.दिवाळीपासून मुक्तीपथांतर्गत तालुक्याच्या ठिकाणापासून परिवर्तन कार्यक्रमांची सुरुवात करीत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्तीच्या या अभियानात ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग महत्वाची भुमिका बजावू शकेल, यासाठीही प्रयत्न करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी