शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

विजेअभावी धानपीक धोक्यात

By admin | Updated: April 16, 2017 00:33 IST

विसोरावरून पूर्वेला एक किमी अंतरावरील गाढवी नदी काठावर शंकरपूरच्या शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी धान पिकाची लागवड केली.

शेतकरी संतप्त : पिकांच्या पाणीपुरवठ्यात अडचणअतुल बुराडे विसोराविसोरावरून पूर्वेला एक किमी अंतरावरील गाढवी नदी काठावर शंकरपूरच्या शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी धान पिकाची लागवड केली. मात्र विजेच्या लपंडावाने पाण्याअभावी सदर उन्हाळी धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी महावितरणच्या विरोधात रोष व्यक्त करीत आहेत.विसोरा-शंकरपूर या दोन गावाच्या मध्यातून वाहणाऱ्या गाढवी नदीच्या पाण्याच्या भरवशावर विसोरा, शंकरपूर येथील शेतकऱ्यांनी नदीच्या शंकरपूर कडील शेतात उन्हाळी धान पिकाची लागवड केली. धान पिकाच्या उत्पादनासाठी बी-बियाणे नांगरणी, वखरणी, पेरणी, चिखल, रोवणी, निंदण, औषध फवारणी, कापणी, मळणी या सर्व जंजाळातून धानरास घरी येण्यासाठी धान पिकाला पाणी पुरवठा आवश्यक आहे. मात्र मागील महिनाभरापासून शंकरपूर नदी घाटावरील डीपीवर डीओ व फेज जात असल्याने शेतीला पाणी पुरवठा करणे अशक्य होत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने या परिसरातील धानपीक करपल्यागत झाले आहे. वीज पुरवठा सुरू झाल्यावर अगदी काही वेळात वीज पुरवठा खंडीत होते. परिणामी पिकाला पुरेसे पाणी होत नसल्याने उभ्या पिकाखालील जमिनीला भेगा पडल्या असून येत्या आठवड्याभरात धान पीक पूर्णत: करपण्याची शक्यता आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शेतकरी कमालीचा संतापला आहे. अशा परिस्थितीत वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी येत नाही. त्यामुळे गावातीलच नागरिक व शेतकरी स्वत: दिवस रात्र एक करून वीज पुरवठा सुरू करतात. महिनाभरापूर्वी नवीन डीपी सुरू करण्यासाठी महावितरणकडे रितसर अर्ज करण्यात आला होता. मात्र या अर्जावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. खंडीत वीज पुरवठ्याची अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेकडो एकरवरील धान पीक करपून नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर समस्या दूर करण्यासाठी आमदार क्रिष्णा गजबे यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले. महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सदर समस्या निकाली काढावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सायंकाळी उशिरापर्यंत परत त्याच डीपीवरून अखेर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून वीज पुरवठा सुरू केला. तरीही नवीन डीपीची मागणी कायम आहे.महावितरणचे अधिकारी गैरहजर गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी शनिवारी दुपारच्या सुमारास शंकरपूर येथील १०-१५ शेतकऱ्यांनी थेट देसाईगंज येथील महावितरणचे कार्यालय गाठले. मात्र या कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने चर्चा होऊ शकली नाही. ज्या डीपीवरून शेतकऱ्यांच्या शेतीला वीज पुरवठा होतो. ती डीपी वारंवार पेट घेतल्याने पूर्णत: खराब झाली आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिक कृषीपंप डीपीला जोडल्याने ही वीज खंडीत पुरवठ्याची समस्या उद्भवत आहे. सातत्याने मागणी करूनही सद्य:स्थितीत नवीन डीपी लावणे शक्य नसल्याची स्पष्टोक्ती अभियंता शेतकऱ्यांना देतात.