शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

मोठ्या भावाच्या अंत्यदर्शनानंतर लहान्याने सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:31 IST

नियतीचा डाव कुणाला चुकविता आला नाही. तसेच मृत्यू कुणाला चुकतही नाही. जन्मलेल्या प्रत्येक जीवाचा अंत होणार, हे शाश्वत सत्य आहे. पण काळाने अनपेक्षितपणे गाठले तर त्याचे जाणे अनेकांना चटका लागून जाते. अशीच काहीशी घटना मोहझरी गावात घडली. मोठ्या भावाचे अंत्यदर्शन घेऊन आलेल्या लहान भावानेही त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने मोहझरी गावावर शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देमोहझरीतील घटना : नियतीच्या खेळाने मोहझरी गाव झाले सुन्न

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : नियतीचा डाव कुणाला चुकविता आला नाही. तसेच मृत्यू कुणाला चुकतही नाही. जन्मलेल्या प्रत्येक जीवाचा अंत होणार, हे शाश्वत सत्य आहे. पण काळाने अनपेक्षितपणे गाठले तर त्याचे जाणे अनेकांना चटका लागून जाते. अशीच काहीशी घटना मोहझरी गावात घडली. मोठ्या भावाचे अंत्यदर्शन घेऊन आलेल्या लहान भावानेही त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने मोहझरी गावावर शोककळा पसरली आहे.वैरागडपासून पाच किमी अंतरावर मोहझरी हे गाव आहे. २ जूनच्या रात्री १२.३० वाजता मधुमेहाच्या आजाराने कालिदास भिवा लोणबले (५५) याचा मृत्यू झाला. मोठ्या भावाच्या मृत्यूची बातमी कळताच गावातच राहणाऱ्या लहान भाऊ तुळशीदास भिवा लोणबले (५०) याने आपल्या भावाच्या घरी जाऊन अंतिम दर्शन घेतले. पोटाच्या आजाराने त्रस्त असल्याने तुळशीदास हा आराम करण्यासाठी घरी आला. पहाटे ५ वाजतापासून तुळशीदासचा आजार वाढला आणि २ जूनला सकाळी ६ वाजता तुळशीदासची प्राणज्योत मालवली. लोणबले बंधूंना मोठी मुले आहेत. ही मुले आता कमाईला लागल्यामुळे दोन्ही भावांच्या कुटुंबातील सदस्यांना आधार मिळेल. परंतू घरातील ज्येष्ठ सदस्य कायमचा निघून गेल्याने त्याची हुरहूर कायम राहणार आहे. विशेष म्हणजे कालीदास, तुळशीदाम या बांधवांच्या निधनानंतर कार्तिक कोटरंगे या युवकाचाही अचानक मृत्यू झाला. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात या तिघांचाही सक्रीय सहभाग असायचा. अवघ्या २४ तासात या तिघांवर काळाने झडप घातल्याने मोहझरी गावात शोककळा पसरली आहे.कार्तिकच्या मृत्यूने हळहळले गावलोणबले बांधवांचा मृत्यू झाला त्या दिवशी २४ तासाच्या आत, म्हणजे २ जून रोजी रात्री ९ वाजता कर्करोगाच्या आजाराने कार्तिक कानू कोटरंगे याचा मृत्यू झाला. दोन भावांचा अंत्यविधी आटोपून आलेल्या गावकऱ्यांना कार्तिक कोटरंगे (३४) याच्या मृत्यूची बातमी रात्री ९ वाजता कळली. या बातमीने गावकऱ्यांना चटका बसला. कार्तिक हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा होता. प्रामाणिक व कष्टाळू असलेला कार्तिक हा गावातील एका राईस मीलमध्ये दिवानजी म्हणून काम करीत होता. त्याच्या घरात म्हातारे वडील, पत्नी, दोन मुले आहेत. या सर्वांची जबाबदारी कार्तिकवर होती. कार्तिकचे वडील गावातील हनुमान मंदिराचे पुजारी म्हणून काम करीत आहेत. परंतू घरात कर्ता पुरूष असलेल्या कार्तिकच्या अकाली मृत्यूने त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.