शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सहा महिन्यांपासून वीज समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST

धानोरा तालुका मुख्यालयापासून ११ किमी अंतरावर रांगी हे गाव आहे. या परिसरात मोहली, चिंगली, महावाडा, कन्हाळगाव, खेडी यासह अनेक लहान-मोठी गावे येतात. त्यामुळे या भागात वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. जंगलव्याप्त तसेच दुर्गम भाग असल्याने वर्षभरापूर्वी विद्युत पुरवठा खंडित होण्याची समस्या वाढल्यानंतर नागरिकांनी कुठे बिघाड आहे याबाबत लाईनमनद्वारा विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

ठळक मुद्देरांगी परिसर : वर्षभरापूर्वी बिघाडाबाबत माहिती देऊनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्करांगी : धानोरा तालुक्याच्या रांगी परिसरात वर्षभरापासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असताना बिघाडाबाबतची माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने मागील सहा महिन्यांपासून विद्युत पुरवठा खंडित होत असल्याची समस्या अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.धानोरा तालुका मुख्यालयापासून ११ किमी अंतरावर रांगी हे गाव आहे. या परिसरात मोहली, चिंगली, महावाडा, कन्हाळगाव, खेडी यासह अनेक लहान-मोठी गावे येतात. त्यामुळे या भागात वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. जंगलव्याप्त तसेच दुर्गम भाग असल्याने वर्षभरापूर्वी विद्युत पुरवठा खंडित होण्याची समस्या वाढल्यानंतर नागरिकांनी कुठे बिघाड आहे याबाबत लाईनमनद्वारा विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. परंतु वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले. अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे सध्या ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. सहा महिन्यांपासून दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. दिवसात तसेच रात्रीच्या सुमारास उकाड्याचा त्रासही नागरिकांना होतो.संपूर्ण धानोरा तालुक्यातच वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या आहे. आधीच जंगलव्याप्त तसेच नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या तालुक्यात विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यास वेळीच बिघाडीची दुरूस्ती होत नाही. त्यामुळे रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाल्यास संपूर्ण रात्र नागरिकांना अंधारातच काढावी लागते.तालुक्यात अनियमित वीज पुरवठा होत असतानाही ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठविले जात आहे. लॉकडाऊनमुळे आधीच सर्व कामधंदे, व्यवसाय ठप्प असतानाही स्थिर आकार, वीज आकार व इतर आकार मिळून अवाढव्य बिल पाठविले जात असल्याने नागरिकांचे महिन्याचे आर्थिक बजेट बिघडत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना नियमित विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी अनिल गणवनेवार, देवराव कुनघाडकर, प्रवीण मडावी, अहमद अली सय्यद, अरविंद जाधव, आमीर पठाण, अजमेर पठाण, मो. आलम यांच्यासह रांगी व परिसराच्या गावातील विद्युत ग्राहकांनी वीज वितरण कंपनीकडे केली आहे.ऑनलाईन व बँक व्यवहारांवर परिणामरांगी परिसरात मागील सहा महिन्यांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शासकीय कार्यालये, बँका तसेच अन्य ऑनलाईन कामे प्रभावित होत आहेत. ऑनलाईन कामे करताना वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कामावर परिणाम होतो. तसेच बँकेतील अनेक व्यवहार बाधित होतात. अनेकदा लिंक फेल तर कधी टॉवर बंद होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे बँकेत बाहेर गावाहून आलेल्या ग्राहकांना आल्यापावली परतावे लागते. शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा व अन्य दाखले काढताना अडचणी येतात. ही सर्व समस्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे उद्भवत असतानाही धानोरा येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप होत आहे.

टॅग्स :electricityवीज