शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

फांद्यांची कटाई न केल्याने विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:39 IST

विजेच्या तारांवरील झाडाच्या फांद्यांची कटाई न केल्याने वारंवार होतो ब्रेकडाऊन... विज समस्या निकाली काढण्याची प्रवीण राहाटे यांची मागणी...... आरमोरी ...

विजेच्या तारांवरील झाडाच्या फांद्यांची कटाई न केल्याने वारंवार होतो ब्रेकडाऊन...

विज समस्या निकाली काढण्याची प्रवीण राहाटे यांची मागणी......

आरमोरी : तालुक्यातील कासवी परिसरात गेल्या महिनाभरापासून विजेचा सतत लपंडाव सुरू आहे. दिवसा लपंडाव व रात्री बत्ती गुल होत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. विजेच्या तारांनजीकच्या झाडाच्या फांद्याची कटाई न केल्याने वारंवार ब्रेकडाऊन होत आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे विजेच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. विजेची समस्या निर्माण होण्यास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी कासवीचे माजी उपसरपंच प्रवीण राहाटे यांनी केली आहे.

शेतीपंप तसेच इतर कामासाठी विजेची आवश्यकता असताना महावितरणचे अधिकारी म्हणतात, ब्रेकडाऊन आहे. विजेच्या अयोग्य विद्युत प्रवाहामुळे पंखे टिव्ही व इतर घरगुती उपकरणे तसेच शेतातील मोटारपंप कमी-जास्त दाबामुळे निकामी होतात. २४ तासांतून १० ते १५ तास अनियमित वीजपुरवठा होतो. त्यातच कमी पाऊस पडल्याने उकाडा वाढला आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने विजेअभावी अंधारात काढावी लागते. दिवसा तर लपंडाव होतोच, मात्र रात्री बत्ती गुल झाली की कधी सकाळी तर कधी दुपारी वीज येते. गेल्या महिनाभरापासून असा प्रकार सुरू आहे.

जोगीसाखरा फिडरवरून जेव्हापासून वीजपुरवठा हाेत आहे तेव्हापासूनच इन्शुलन्स बदलविण्यात आले नाही. तसेच एबी स्वीच हे प्रत्येक गावाजवळ देण्यात न आल्याने नागरिकांना यातना भोगावे लागत आहे. तत्काळ विजेची समस्या तत्काळ निकाली काढण्याची मागणीही राहाटे यांनी केली.

170921\img-20210917-wa0042.jpg

प्रवीण राहाटे यांचा फोटो