शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

दहा दिवसांपासून वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:08 IST

तालुक्यातील बेज्जूरपल्ली येथील विद्युत पुरवठा मागील १० दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देबेजूरपल्ली येथील समस्या : महावितरण कंपनीचे दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमतसिरोंचा : तालुक्यातील बेज्जूरपल्ली येथील विद्युत पुरवठा मागील १० दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.बेज्जूरपल्ली हे गाव सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर आहे. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा उपकेंद्रातून वीज पुरवठा होत आहे. सदर अंतर अधिक असल्याने बेज्जूरपल्ली गावात सिरोंचा तालुक्यातून विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी अनेकदा महावितरणकडे करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच झाले. जिमलगट्टा येथून विद्युत पुरवठा होत असल्याने वारंवार बिघाड निर्माण होत आहे. एकदा बिघाड निर्माण झाल्यानंतर आठ ते दहा अथवा पंधरा दिवसांपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. विशेष म्हणजे सदर गाव दुर्गम भागात असल्याने अधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष होते.अनेकदा विद्युत पुरवठा एकदा खंडित झाल्यास सुरळीत व्हायला १५ ते २० दिवस लागतात. बेजूरपल्ली या गावात अद्यापही मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाही. आरोग्य, शिक्षण, पाणी या समस्या येथे आहेत. यातच पुन्हा अनियमित वीज पुरवठ्याची समस्या आहे. त्यामुळे येथील नागरिक समस्यांनी त्रस्त आहेत. बेजूरपल्ली येथील लोकसंख्या ८०० च्या आसपास आहे. गावातील नागरिकांना विविध कामे करावी लागतात. याकरिता वीज आवश्यक असते. परंतु वीज समस्या वेळेवर सुटत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील वीज समस्येकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.बेज्जूरपल्ली हे गाव सिरोंचा तालुक्यातील आहे. मात्र येथे अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा वीज उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केला जातो. सदर अंतर अत्यंत लांब होत असल्याने अनेकदा बिघाड निर्माण होतो. त्यामुळे बेजूरपल्ली येथे सिरोंचा तालुक्यातून वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती उप कार्यकारी अभियंता चंद्रशेखर सडमाके यांनी माध्यमांना दिली.कव्हरेजचीही समस्यासिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरातही वीज व कव्हरेजची समस्या आहे. याशिवाय या भागात इंटरनेट सेवा अत्यंत मंद गतीने चालत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.