शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
3
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
4
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
5
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
6
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
8
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
9
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
10
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
11
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
12
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
13
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
14
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
15
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
16
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
17
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
18
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
19
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
20
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांपासून वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:08 IST

तालुक्यातील बेज्जूरपल्ली येथील विद्युत पुरवठा मागील १० दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देबेजूरपल्ली येथील समस्या : महावितरण कंपनीचे दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमतसिरोंचा : तालुक्यातील बेज्जूरपल्ली येथील विद्युत पुरवठा मागील १० दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.बेज्जूरपल्ली हे गाव सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर आहे. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा उपकेंद्रातून वीज पुरवठा होत आहे. सदर अंतर अधिक असल्याने बेज्जूरपल्ली गावात सिरोंचा तालुक्यातून विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी अनेकदा महावितरणकडे करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच झाले. जिमलगट्टा येथून विद्युत पुरवठा होत असल्याने वारंवार बिघाड निर्माण होत आहे. एकदा बिघाड निर्माण झाल्यानंतर आठ ते दहा अथवा पंधरा दिवसांपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. विशेष म्हणजे सदर गाव दुर्गम भागात असल्याने अधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष होते.अनेकदा विद्युत पुरवठा एकदा खंडित झाल्यास सुरळीत व्हायला १५ ते २० दिवस लागतात. बेजूरपल्ली या गावात अद्यापही मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाही. आरोग्य, शिक्षण, पाणी या समस्या येथे आहेत. यातच पुन्हा अनियमित वीज पुरवठ्याची समस्या आहे. त्यामुळे येथील नागरिक समस्यांनी त्रस्त आहेत. बेजूरपल्ली येथील लोकसंख्या ८०० च्या आसपास आहे. गावातील नागरिकांना विविध कामे करावी लागतात. याकरिता वीज आवश्यक असते. परंतु वीज समस्या वेळेवर सुटत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील वीज समस्येकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.बेज्जूरपल्ली हे गाव सिरोंचा तालुक्यातील आहे. मात्र येथे अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा वीज उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केला जातो. सदर अंतर अत्यंत लांब होत असल्याने अनेकदा बिघाड निर्माण होतो. त्यामुळे बेजूरपल्ली येथे सिरोंचा तालुक्यातून वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती उप कार्यकारी अभियंता चंद्रशेखर सडमाके यांनी माध्यमांना दिली.कव्हरेजचीही समस्यासिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरातही वीज व कव्हरेजची समस्या आहे. याशिवाय या भागात इंटरनेट सेवा अत्यंत मंद गतीने चालत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.