शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

दहा दिवसांपासून वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:08 IST

तालुक्यातील बेज्जूरपल्ली येथील विद्युत पुरवठा मागील १० दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देबेजूरपल्ली येथील समस्या : महावितरण कंपनीचे दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमतसिरोंचा : तालुक्यातील बेज्जूरपल्ली येथील विद्युत पुरवठा मागील १० दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.बेज्जूरपल्ली हे गाव सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर आहे. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा उपकेंद्रातून वीज पुरवठा होत आहे. सदर अंतर अधिक असल्याने बेज्जूरपल्ली गावात सिरोंचा तालुक्यातून विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी अनेकदा महावितरणकडे करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच झाले. जिमलगट्टा येथून विद्युत पुरवठा होत असल्याने वारंवार बिघाड निर्माण होत आहे. एकदा बिघाड निर्माण झाल्यानंतर आठ ते दहा अथवा पंधरा दिवसांपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. विशेष म्हणजे सदर गाव दुर्गम भागात असल्याने अधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष होते.अनेकदा विद्युत पुरवठा एकदा खंडित झाल्यास सुरळीत व्हायला १५ ते २० दिवस लागतात. बेजूरपल्ली या गावात अद्यापही मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाही. आरोग्य, शिक्षण, पाणी या समस्या येथे आहेत. यातच पुन्हा अनियमित वीज पुरवठ्याची समस्या आहे. त्यामुळे येथील नागरिक समस्यांनी त्रस्त आहेत. बेजूरपल्ली येथील लोकसंख्या ८०० च्या आसपास आहे. गावातील नागरिकांना विविध कामे करावी लागतात. याकरिता वीज आवश्यक असते. परंतु वीज समस्या वेळेवर सुटत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील वीज समस्येकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.बेज्जूरपल्ली हे गाव सिरोंचा तालुक्यातील आहे. मात्र येथे अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा वीज उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केला जातो. सदर अंतर अत्यंत लांब होत असल्याने अनेकदा बिघाड निर्माण होतो. त्यामुळे बेजूरपल्ली येथे सिरोंचा तालुक्यातून वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती उप कार्यकारी अभियंता चंद्रशेखर सडमाके यांनी माध्यमांना दिली.कव्हरेजचीही समस्यासिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरातही वीज व कव्हरेजची समस्या आहे. याशिवाय या भागात इंटरनेट सेवा अत्यंत मंद गतीने चालत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.