शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

इथं प्यावे लागतेय खड्ड्याचे पाणी, ग्रामपंचायतीसह पंचायत समितीने फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 20:59 IST

एकीकडे आता खेड्यापाड्यात शुद्धीकरण केलेल्या पाण्याच्या कॅन वापरल्या जात असल्या तरी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात मात्र चक्क खड्ड्यातील

मेश मारगोनवारभामरागड (गडचिरोली): एकीकडे आता खेड्यापाड्यात शुद्धीकरण केलेल्या पाण्याच्या कॅन वापरल्या जात असल्या तरी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात मात्र चक्क खड्ड्यातील अशुद्ध पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तुमरकोडी या गावातील दोन्ही हातपंप निकामी झाल्याने येथील नागरिकांना पाणीच मिळेनासे झाले. परिणामी खड्ड्यातील पाण्यातून त्यांना तहान भागवावी लागत आहे. पण या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. 

तुमरकोडी हे गाव कोठी ग्रामपंचायतअंतर्गत येते. या गावात दोन हातपंप आहेत. त्यापैकी एक हातपंप महिनाभरापासून बंद पडला आहे तर दुसरा हातपंप सुरू आहे. मात्र या हातपंपातून लाल रंगाचे अशुद्ध पाणी येत असल्याने नागरिक त्या हातपंपाचे पाणी पित नाही. हे दोन्ही हातपंप निकामी झाल्याने या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.  यावर तोडगा म्हणून गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गावालगत असलेल्या नाल्यात लहानसा खड्डा खोदला. या नाल्यातील पाणी पाझरून त्या खड्ड्यात जमा होते. तेच पाणी गावकºयांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. 

विशेष म्हणजे एक-दोन गुंड पाणी काढल्यानंतर याही खड्ड्यातील पाणी गाळयुक्त होते. मात्र दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने गावातील महिला याच खड्ड्यातील पाणी आणत आहेत. उन्हाच्या झळांनी जीव कासाविस होत असल्याने या खड्ड्याचे अशुद्ध पाणी पिऊन नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले नाही. 

अजून उन्हाळ्याचे तीन महिने असेच दिवस काढावे लागणार आहे. त्यामुळे दिवसागणिक या गावातील पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होणार आहे. बंद असलेले हातपंप दुरूस्त करावे, अशी मागणी गावातील पोलीस पाटील गिस्सा मट्टामी, कोमेटी पोदाळी, इरगू लेकामी यांच्यासह नागरिकांनी ग्रामसेवकाकडे केली होती. मात्र ग्रामसेवकाने त्याकडे दुर्लक्ष केले. येथील ग्रामसेवक मुख्यालयी राहात नाही. त्यामुळे गावातील अडचणी त्यांच्या लक्षात येत नाही. 

ग्रामसेवकाने दुर्लक्ष केल्यानंतर नागरिकांनी पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली. मात्र दोन आठवड्यांचा कालावधी उलटूनही हातपंप दुरूस्त करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांचाही आता नाईलाज झाला आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत. बंद हातपंप दुरूस्त करावा, त्याचबरोबर नेमक्या कोणत्या कारणामुळे हातपंपातील पाणी लालसर येत आहे याची चाचणी करावी, अशीही मागणी केली जात आहे.