शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

इथं प्यावे लागतेय खड्ड्याचे पाणी, ग्रामपंचायतीसह पंचायत समितीने फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 20:59 IST

एकीकडे आता खेड्यापाड्यात शुद्धीकरण केलेल्या पाण्याच्या कॅन वापरल्या जात असल्या तरी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात मात्र चक्क खड्ड्यातील

मेश मारगोनवारभामरागड (गडचिरोली): एकीकडे आता खेड्यापाड्यात शुद्धीकरण केलेल्या पाण्याच्या कॅन वापरल्या जात असल्या तरी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात मात्र चक्क खड्ड्यातील अशुद्ध पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तुमरकोडी या गावातील दोन्ही हातपंप निकामी झाल्याने येथील नागरिकांना पाणीच मिळेनासे झाले. परिणामी खड्ड्यातील पाण्यातून त्यांना तहान भागवावी लागत आहे. पण या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. 

तुमरकोडी हे गाव कोठी ग्रामपंचायतअंतर्गत येते. या गावात दोन हातपंप आहेत. त्यापैकी एक हातपंप महिनाभरापासून बंद पडला आहे तर दुसरा हातपंप सुरू आहे. मात्र या हातपंपातून लाल रंगाचे अशुद्ध पाणी येत असल्याने नागरिक त्या हातपंपाचे पाणी पित नाही. हे दोन्ही हातपंप निकामी झाल्याने या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.  यावर तोडगा म्हणून गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गावालगत असलेल्या नाल्यात लहानसा खड्डा खोदला. या नाल्यातील पाणी पाझरून त्या खड्ड्यात जमा होते. तेच पाणी गावकºयांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. 

विशेष म्हणजे एक-दोन गुंड पाणी काढल्यानंतर याही खड्ड्यातील पाणी गाळयुक्त होते. मात्र दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने गावातील महिला याच खड्ड्यातील पाणी आणत आहेत. उन्हाच्या झळांनी जीव कासाविस होत असल्याने या खड्ड्याचे अशुद्ध पाणी पिऊन नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले नाही. 

अजून उन्हाळ्याचे तीन महिने असेच दिवस काढावे लागणार आहे. त्यामुळे दिवसागणिक या गावातील पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होणार आहे. बंद असलेले हातपंप दुरूस्त करावे, अशी मागणी गावातील पोलीस पाटील गिस्सा मट्टामी, कोमेटी पोदाळी, इरगू लेकामी यांच्यासह नागरिकांनी ग्रामसेवकाकडे केली होती. मात्र ग्रामसेवकाने त्याकडे दुर्लक्ष केले. येथील ग्रामसेवक मुख्यालयी राहात नाही. त्यामुळे गावातील अडचणी त्यांच्या लक्षात येत नाही. 

ग्रामसेवकाने दुर्लक्ष केल्यानंतर नागरिकांनी पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली. मात्र दोन आठवड्यांचा कालावधी उलटूनही हातपंप दुरूस्त करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांचाही आता नाईलाज झाला आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत. बंद हातपंप दुरूस्त करावा, त्याचबरोबर नेमक्या कोणत्या कारणामुळे हातपंपातील पाणी लालसर येत आहे याची चाचणी करावी, अशीही मागणी केली जात आहे.