शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

यंदा उष्णतेच्या लाटेची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:51 IST

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या उन्हाळयात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. तसेच मागील वर्षापेक्षा यावर्षी उन्हाळयाची सुरूवातसुध्दा लवकर झालेली आहे.

ठळक मुद्देहवामान खात्याचा अंदाज : खबरदारी घेण्याचे जिल्हा आपत्ती प्राधिकरणचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या उन्हाळयात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. तसेच मागील वर्षापेक्षा यावर्षी उन्हाळयाची सुरूवातसुध्दा लवकर झालेली आहे. तेव्हा उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये याबाबत आवश्यक उपाययोजना संबंधित यंत्रणांनी कराव्यात असे शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही उन्हापासून स्वत:चा बचाव करावा, असे जिल्हा आपत्ती प्राधिकरणने म्हटले आहे.उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचा बचाव वेळीच करणे शक्य होईल यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. तहान लागलेली नसली तरी सुध्दा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कापडे वापरावित. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलांचा वापर करावा. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविलेली लस्सी, तोरणी, लिंबू- पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे आहेत. चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा. गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्या, पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करीत असतांना मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी. उन्हापासून संरक्षणाकरिता रस्त्याच्या कडेला शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा प्रशासनाने व सामाजिक संस्थांनी करावी. उन्हाळ्यात उष्माघाताचे दरवर्षी शेकडो बळी जातात. त्यामुळे नागरिकांनी तसेच प्रशासनानेही खबरदारी घ्यावी, असे आपत्ती प्राधिकरणने म्हटले आहे.बचावासाठी या गोष्टी टाळाव्यालहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद रंगाचे, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्या, असे केल्यास स्वत:चा उन्हापासून बचाव करता येईल.