शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

अरूंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:54 IST

वैरागड ते मानापूर पुढे अंगारापर्यंतचा रस्ता अरूंद आहे. त्यातच शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचबरोबर झुडपेही रस्त्यावर आली आहेत.

ठळक मुद्देवैरागड-मानापूर मार्गावर अडथळा : शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने कमी झाली रूंदी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागड ते मानापूर पुढे अंगारापर्यंतचा रस्ता अरूंद आहे. त्यातच शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचबरोबर झुडपेही रस्त्यावर आली आहेत. परिणामी या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.वैरागड ते अंगारा रस्त्याचे सीमांकन झाले असून रस्त्याची रूंदी निश्चित करण्यासाठी रूंदी दर्शविणारे दगड मुख्य रस्त्यापासून १५ ते २० फुटावर लावण्यात आले आहेत. याचा अर्थ अर्धेअधिक रस्त्यावर अतिक्रमण झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. काही शेतकºयांच्या शेतामध्ये खांब गडले आहेत. खांबापर्यंत रस्त्यांची हद्द असल्याची जाणीव शेतकºयांना असतानाही रस्त्यापर्यंत कुपन करण्यात आले आहे. या मार्गावरील सुकाळा फाटा ते शिवणीपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे की, केवळ १० ते १२ फुटाचा रस्ता शिल्लक राहिला आहे. सदर मार्गावर अनेक गावे येतात. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी व चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. समोरासमोर दोन वाहने आल्यास बाजू देताना फारमोठी कसरत करावी लागते. तसेच वाहनाला ओव्हरटेक करणेही शक्य होत नाही.रस्त्यावर कुंपन करूनही कोणीच अटकाव करीत नसल्याने दिवसेंदिवस रस्त्यावर कुंपन करण्याचे प्रकार वाढत चालले आहे. ही अतिशय गंभीर बाब असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. वळण मार्गावर समोरचे वाहन दिसत नाही. परिणामी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.डांबरी रस्त्याच्या बाजूला दोन ते तीन फूट अंतरावर मुरूम टाकणे आवश्यक आहे. मात्र मुरूमही टाकण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्याची रूंदी पुन्हा कमी झाली आहे.रस्त्याला झुडपांचा वेढारस्त्याच्या बाजूलाच झुडूपे आहेत. झुडूप व झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळेही रस्त्याची रूंदी आणखी कमी झाली आहे. बाजूला वाहन गेल्यानंतर झुडूपांच्या फांद्या लागतात. एवढेच नाही तर ट्रकसारखे मोठे वाहन या मार्गावरून गेल्यास दोन्ही बाजूने झाडाच्या फांद्या लागतात. त्यामुळे वाहनचालक तसेच बसमधील प्रवाशी जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रस्त्याच्या बाजूला दोन ते तीन फुटावर मुरूम टाकण्यात आले नाही. त्यामुळे अगदी डांबरी रस्त्याला लागूनच गवत उगवले आहे. बाजू भरली नसल्याने खोलगट भाग निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहन खाली उतरल्यास तो डांबरवर चढविताना अडचण होत आहे.