शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

अरूंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:54 IST

वैरागड ते मानापूर पुढे अंगारापर्यंतचा रस्ता अरूंद आहे. त्यातच शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचबरोबर झुडपेही रस्त्यावर आली आहेत.

ठळक मुद्देवैरागड-मानापूर मार्गावर अडथळा : शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने कमी झाली रूंदी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागड ते मानापूर पुढे अंगारापर्यंतचा रस्ता अरूंद आहे. त्यातच शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचबरोबर झुडपेही रस्त्यावर आली आहेत. परिणामी या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.वैरागड ते अंगारा रस्त्याचे सीमांकन झाले असून रस्त्याची रूंदी निश्चित करण्यासाठी रूंदी दर्शविणारे दगड मुख्य रस्त्यापासून १५ ते २० फुटावर लावण्यात आले आहेत. याचा अर्थ अर्धेअधिक रस्त्यावर अतिक्रमण झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. काही शेतकºयांच्या शेतामध्ये खांब गडले आहेत. खांबापर्यंत रस्त्यांची हद्द असल्याची जाणीव शेतकºयांना असतानाही रस्त्यापर्यंत कुपन करण्यात आले आहे. या मार्गावरील सुकाळा फाटा ते शिवणीपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे की, केवळ १० ते १२ फुटाचा रस्ता शिल्लक राहिला आहे. सदर मार्गावर अनेक गावे येतात. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी व चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. समोरासमोर दोन वाहने आल्यास बाजू देताना फारमोठी कसरत करावी लागते. तसेच वाहनाला ओव्हरटेक करणेही शक्य होत नाही.रस्त्यावर कुंपन करूनही कोणीच अटकाव करीत नसल्याने दिवसेंदिवस रस्त्यावर कुंपन करण्याचे प्रकार वाढत चालले आहे. ही अतिशय गंभीर बाब असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. वळण मार्गावर समोरचे वाहन दिसत नाही. परिणामी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.डांबरी रस्त्याच्या बाजूला दोन ते तीन फूट अंतरावर मुरूम टाकणे आवश्यक आहे. मात्र मुरूमही टाकण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्याची रूंदी पुन्हा कमी झाली आहे.रस्त्याला झुडपांचा वेढारस्त्याच्या बाजूलाच झुडूपे आहेत. झुडूप व झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळेही रस्त्याची रूंदी आणखी कमी झाली आहे. बाजूला वाहन गेल्यानंतर झुडूपांच्या फांद्या लागतात. एवढेच नाही तर ट्रकसारखे मोठे वाहन या मार्गावरून गेल्यास दोन्ही बाजूने झाडाच्या फांद्या लागतात. त्यामुळे वाहनचालक तसेच बसमधील प्रवाशी जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रस्त्याच्या बाजूला दोन ते तीन फुटावर मुरूम टाकण्यात आले नाही. त्यामुळे अगदी डांबरी रस्त्याला लागूनच गवत उगवले आहे. बाजू भरली नसल्याने खोलगट भाग निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहन खाली उतरल्यास तो डांबरवर चढविताना अडचण होत आहे.