शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

गरिबांना मिळणार चणा व उडीद डाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 21:39 IST

राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून चणाडाळ व उडीदडाळ वितरित केली जाणार आहे. याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांना होणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाभरातील लाखो कुटुंबांना लाभ : स्वस्त धान्य दुकानात मिळेल सवलत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून चणाडाळ व उडीदडाळ वितरित केली जाणार आहे. याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांना होणार आहे.गरीब नागरिकांना शासनाकडून दोन रूपये किलो गहू व तीन रूपये किलो तांदूळ याप्रमाणे अत्यंत नाममात्र किमतीत धान्य उपलब्ध करून दिले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण कुटुंबांच्या जवळपास ७० टक्के लाभार्थ्यांना गहू व तांदूळ उपलब्ध होते. रोजीरोटी करणारे कुटुंब खुल्या बाजारातून धान्य खरेदी करू शकत नाही. अशा कुटुंबांसाठी स्वस्त धान्य दुकानातील धान्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. बीपीएल व अंत्योदय लाभार्थ्यांना गहू व तांदळासोबतच साखर उपलब्ध करून दिली जाते. मात्र प्राधान्य कुटुंबांना केवळ गहू व तांदळाचाच पुरवठा केला जातो. काही महिन्यांपासून प्रतिकुटुंब एक किलो तुरीची डाळ उपलब्ध करून दिली जात आहे. ३५ रूपये किलो दराने अत्यंत चांगल्या दर्जाची डाळ उपलब्ध होत असल्याने प्रत्येक लाभार्थी आपल्या हिश्याची डाळ खरेदी करीत आहे. तुर डाळीसोबतच आता चणा व उडीद डाळ देण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक संबंधित राशन दुकानदारांसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. चणा व उडीद डाळीचे एक किलोचे पॉकेट राहणार आहे. या डाळीवर राशन दुकानदाराला दीड रूपयांचे कमिशन दिले जाणार आहे. ग्राहकांना सदर डाळ पॉकेट ३५ रूपयात पडणार आहे. दुकानदार उडीद व चणाडाळ खरेदी करतील. मात्र ग्राहक उडदाची डाळ खरेदी करणार काय, असा प्रश्न आहे.उडीद डाळ कोण खरेदी करणार?चणा डाळीपासून विविध पदार्थ बनविले जातात. त्यामुळे दैनंदिन आहारात चणाडाळीचा वापर होतो. परिणामी चणाडाळ प्रत्येक लाभार्थी खरेदी करेल. मात्र उडीद डाळीचा पाहिजे त्या प्रमाणात वापर होत नाही. केवळ वड्या टाकण्यासाठीच उडीद डाळ वापरली जाते. त्यातही उडीदाचे दोन ते तीन प्रकार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील वावरांमध्ये पिकणाऱ्या उडीदाचा दर्जा अतिशय चांगला राहतो. त्यामुळे ग्रामीण भागातून उडीद खरेदी केले जातात. मात्र बºयाचदा दुकानात येणारे उडीद हे खरीप हंगामातील राहते. याला येले उडीद असे संबोधल्या जाते. या उडीदाची चव चांगली राहत नसल्याचा अनुभव असल्याने उडीद डाळीचे पॉकेट विकताना दुकानदारांची दमछाक होणार आहे.एक किलो गव्हामुळे कुटुंब अडचणीतगडचिरोली जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकाला प्रतीलाभार्थी केवळ एक किलो गहू व चार किलो तांदूळ दिले जाते. गडचिरोली जिल्ह्यात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी स्वत:च्या शेतातील तांदूळ उपलब्ध राहतात. स्वस्त धान्य दुकानातून गहू कमी प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे लाभार्थ्यांना गहू खरेदी करावे लागते. इतर जिल्ह्यांमध्ये प्रती लाभार्थी दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू उपलब्ध होते. तेवढेच धान्य द्यावे, अशी मागणी आहे.