शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

गढूळ पाणीपुरवठ्याने धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:02 IST

शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून स्थानिक इंदिरा गांधी चौक परिसरात जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची निर्मिती केली. मात्र या रुग्णालयात बांधकामाच्या वेळी पाणीपुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश करण्यात आला नाही.

ठळक मुद्देमहिला रुग्णालयातील समस्या : जलशुद्धीकरण केंद्रासाठी पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून स्थानिक इंदिरा गांधी चौक परिसरात जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची निर्मिती केली. मात्र या रुग्णालयात बांधकामाच्या वेळी पाणीपुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश करण्यात आला नाही. या रुग्णालयाला कठाणी नदीतून थेट पाणीपुरवठा होत आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसात रुग्णालयात गढूळ पाणी येत असल्याने येथील रुग्णांना जलजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.महिला रुग्णालयाची कठाणी नदीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठीची स्वतंत्र नळ पाईपलाईन आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कठाणी नदी कोरडी पडत असल्याने पाणीटंचाई भासू नये, याकरिता नगर पालिकेच्या वैनगंगा नदीवरील पाणी योजनेची स्वतंत्र नळ पाईपलाईन बसविण्यात आली आहे. या दोन्ही नळ पाईपलाईनमधून रुग्णालयाला पाणीपुरवठा होत आहे. मात्र कठाणी नदीतून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने येथील रुग्णांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. यासंदर्भात महिला रुग्णालय प्रशासनामार्फत आलम व ब्लिचिंग पावडरच्या सहाय्याने कठाणी नदीतून टाकीत येणाºया पाण्याचे शुद्धीकरण करण्याचे काम होत आहे. मात्र ही तात्पुरती व्यवस्था आहे. सदर रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर व कर्मचारी आदींची वाढती संख्या लक्षात घेता, या रुग्णालयात स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करणे अत्यावश्यक आहे. रुग्णालय इमारत बांधकामाच्या प्रस्तावात वॉटर फिल्टर प्लॅन्टचा समावेश असता तर आज ेगढूळ पाण्याचा प्रश्न उद्भवला नसता.याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपचंद सोयाम यांनी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या उपअभियंत्यांना पत्र पाठवून जलशुद्धीकरण केंद्राचा प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार करण्याची विनंती केली आहे. जिल्हा नियोजन समितीतून ३५ लाख रूपयांची तरतूद झाल्यास येथे फिल्टर प्लॅन्ट होईल.जिल्हा महिला व बाल रुग्णालयात कठाणी नदीमधून थेट पाणीपुरवठा केला जात असल्याने पावसाळ्यात गढूळ पाणी येते. यावर उपाय म्हणून आलम व ब्लिचिंग पावडरचा वापर केला जात असून कठाणी नदीतून रुग्णालयाच्या टाकीत पडणाºया पाण्याचे शुद्धीकरण केले जात आहे. रुग्णालयात जलशुद्धीकरण केंद्र आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव सादर करून त्याचे अंदाजपत्रक तयार करावे, अशा आशयाचे पत्र महिला रूग्णालय प्रशासनामार्फत महाराष्टÑ जीवन प्राधिकरण गडचिरोलीच्या उपअभियंत्यांना पाठविण्यात आले आहे. तसेच या पत्राची प्रत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनाही पाठविण्यात आली आहे.- डॉ.दीपचंद सोयाम, वैद्यकीय अधीक्षक,जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणHealthआरोग्य