शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

ठेंगणा पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:34 IST

तालुका मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या कुंभी गावाजवळील पोटफोडी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

ठळक मुद्देकुंभीवासीय त्रस्त : पावसाळ्यात पुलावरून वाहते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुका मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या कुंभी गावाजवळील पोटफोडी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.चांदाळा गावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर कुंभी हे गाव आहे. या गावची लोकसंख्या एक हजारच्या जवळपास आहे. कुंभी गावाला जाताना पोटफोडी नदी पडते. या नदीवर पूल नव्हता, त्यावेळी नागरिक डोंग्याने प्रवास करीत होते. अनेक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर नदीवर पूल बांधण्यात आला. जवळपास दोन फूट उंचीचे पाईप टाकून पूल बांधला आहे. पोटफोडी नदी जंगलातून येते. त्यामुळे थोडाही पाऊस झाला तरी नदीच्या पाण्याची पातळी वाढते व पूल पाण्याखाली येते. पावसाळ्यात अनेकवेळा सदर पूल बुडून राहते. या गावात पहिली ते चवथी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. त्यानंतर पाचवीपासून चांदाळा व अकरावीपासून गडचिरोली येथे यावे लागते. पावसाळ्यात पुलावरून पाणी राहत असल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडते. तर काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेत येतात.गडचिरोली हे तालुका व जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या गावातील नागरिकांनाही गडचिरोली येथे येताना याच पुलाचा सामना करावा लागतो. प्रचारासाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला येथील गावकरी पूल बांधून देण्याची मागणी करतात. निवडणुकीपुरते आश्वासन दिले जाते. मात्र त्यानंतर राजकीय पदाधिकाऱ्यांनाही विसर पडते. त्यामुळे ठेंगण्या पुलाची समस्या कायम आहे. पूल बांधकामाची आश्वासने ऐकून नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. यानंतर निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल. तसेच जो उमेदवार पूल बांधकामाचे ठोस आश्वासन देईल, त्यालाच मतदान केले जाईल, असा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे.माडेमूलचाही रस्ता अडतोकुंभी गावाजवळच माडेमूल हे गाव आहे. माडेमूल गावाला जाण्यासाठीही पोटफोडी नदी ओलांडून जावे लागते. या गावाला सुद्धा कुंभी गावाप्रमाणेच पाईप टाकून जवळपास तीन ते चार फूट उंचीचा पूल बनविण्यात आला आहे. मात्र पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर या पुलावरूनही पाणी वाहते. त्यामुळे या गावातील नागरिकांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.