शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अकाली पावसाने धानाची नासधूस

By admin | Updated: October 31, 2015 02:16 IST

अपुरा पाऊस, कीड, रोगांच्या कचाट्यातून बचावलेले धान पीक कापणीला आले होते. बहुतांश ठिकाणी धानाची कापणीही झाली होती.

रोगानंतर निसर्गाची अवकृपा : गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज तालुक्यातील पिकांचे नुकसानगडचिरोली : अपुरा पाऊस, कीड, रोगांच्या कचाट्यातून बचावलेले धान पीक कापणीला आले होते. बहुतांश ठिकाणी धानाची कापणीही झाली होती. परंतु गुरूवारी रात्री व शुक्रवारी पहाटे निसर्गाची अवकृपा होऊन गडचिरोली, आरमोरी, देसाईगं तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने कापलेल्या धानाच्या कडपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हाती येत असलेले धान पीक संकटात सापडल्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे. देसाईगंज तालुक्यातील विसोरा परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या पावसाने कापलेल्या धानाच्या कडपा पूर्णत: भिजल्या. निश्चित व भरपूर पावसाचे व धान पिकाचे क्षेत्र म्हणून हा परिसर ओळखला जातो. मात्र चालू हंगामात हा अंदाज खोटा ठरल्याने परिसरातील धान पीक उत्पादक सुरुवातीपासूनच संकटातून मार्ग काढून पीक वाचवित होता. अखेर धान निसवले, कापणी झाली आणि आता बांधणी करुन मळणी केलेले धान घरी आणणे एवढे काम उरले असतांना वरुणराजा बरसल्याने हातचे पीक जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विसोरा परिसरात पावसाच्या सरी कोसळल्याने रस्त्यावरील खड्डे, शेतातील बांध्यांमध्ये पाणी साचले. शेतांमधील धान पीक कापणीयोग्य होत आहे, काही झाले असून कापणीच्या प्रतीक्षेत आहे तर काही हेक्टरवरील धान पीक कापलेले दुरवस्थेत आहे. कापणीयोग्य आणि कापलेल्या धानावर शुक्रवारी झालेल्या पावसाने परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कापलेले धान पीक मळणीसाठी पूर्णत: कोरडे असले पाहिजे त्यात जर ओलावा असेल तर त्याचा थेट परिणाम धान उत्पन्नावर होऊ शकतो. एकूणच येथील बव्हंशी बळीराजांची आर्थिक घडी फक्त आणि फक्त शेतीवरच अवलंबून असल्यानेच शेती ही या शेतकऱ्यांची जीवनरेषा आहे म्हटल्यास चूक ठरणार नाही. देसाईगंत तालुक्यातील कोरेगाव, चोप, बोडधा, रावणवाडी, डोंगरमेंढा, कसारी, शंकरपूर आदी गावांमध्ये शुक्रवारी पहाटे पाऊस झाल्याने कापलेले धान पीक पूर्णत: भिजले. यंदा सुरूवातीपासूनच पाऊस न झाल्याने जवळपास ३० टक्के रोवणी झालीच नाही. त्यानंतर धान पीक कसेबसे बचावल्यानंतर पुन्हा कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. अंतिम टप्यात पावसाची आवश्यकता असताना पाऊस झाला नाही. तर धान पीक कापणीनंतर शुक्रवारी पहाटे पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागातील धान पीकावर तुडतुडा व विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट झाले. यंदा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा सुरूवातीचा हंगामही नुकसानकारकच राहिला. अनेक शेतकऱ्यांचे पऱ्हे नष्ट झाले. त्यामुळे रोवणी करता आली नाही. पुन्हा तुडतुडा व अकाली पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरातील १५ ते २० गावांमध्ये अकाली पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या धानाच्या कडपा पूर्णत: भिजल्या. बांध्यांमध्ये पाणी साचल्यामुळे धानाला पिवळी कडा येऊन धानाचा भाव घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिसरातील टेंभा, खरपी, अमिर्झा, चांभार्डा, बोरी, देलोडा, मरेगाव, मौशिखांब गावातील कापलेले धान पूर्णत: भिजले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)