शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अकाली पावसाने धानाची नासधूस

By admin | Updated: October 31, 2015 02:16 IST

अपुरा पाऊस, कीड, रोगांच्या कचाट्यातून बचावलेले धान पीक कापणीला आले होते. बहुतांश ठिकाणी धानाची कापणीही झाली होती.

रोगानंतर निसर्गाची अवकृपा : गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज तालुक्यातील पिकांचे नुकसानगडचिरोली : अपुरा पाऊस, कीड, रोगांच्या कचाट्यातून बचावलेले धान पीक कापणीला आले होते. बहुतांश ठिकाणी धानाची कापणीही झाली होती. परंतु गुरूवारी रात्री व शुक्रवारी पहाटे निसर्गाची अवकृपा होऊन गडचिरोली, आरमोरी, देसाईगं तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने कापलेल्या धानाच्या कडपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हाती येत असलेले धान पीक संकटात सापडल्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे. देसाईगंज तालुक्यातील विसोरा परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या पावसाने कापलेल्या धानाच्या कडपा पूर्णत: भिजल्या. निश्चित व भरपूर पावसाचे व धान पिकाचे क्षेत्र म्हणून हा परिसर ओळखला जातो. मात्र चालू हंगामात हा अंदाज खोटा ठरल्याने परिसरातील धान पीक उत्पादक सुरुवातीपासूनच संकटातून मार्ग काढून पीक वाचवित होता. अखेर धान निसवले, कापणी झाली आणि आता बांधणी करुन मळणी केलेले धान घरी आणणे एवढे काम उरले असतांना वरुणराजा बरसल्याने हातचे पीक जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विसोरा परिसरात पावसाच्या सरी कोसळल्याने रस्त्यावरील खड्डे, शेतातील बांध्यांमध्ये पाणी साचले. शेतांमधील धान पीक कापणीयोग्य होत आहे, काही झाले असून कापणीच्या प्रतीक्षेत आहे तर काही हेक्टरवरील धान पीक कापलेले दुरवस्थेत आहे. कापणीयोग्य आणि कापलेल्या धानावर शुक्रवारी झालेल्या पावसाने परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कापलेले धान पीक मळणीसाठी पूर्णत: कोरडे असले पाहिजे त्यात जर ओलावा असेल तर त्याचा थेट परिणाम धान उत्पन्नावर होऊ शकतो. एकूणच येथील बव्हंशी बळीराजांची आर्थिक घडी फक्त आणि फक्त शेतीवरच अवलंबून असल्यानेच शेती ही या शेतकऱ्यांची जीवनरेषा आहे म्हटल्यास चूक ठरणार नाही. देसाईगंत तालुक्यातील कोरेगाव, चोप, बोडधा, रावणवाडी, डोंगरमेंढा, कसारी, शंकरपूर आदी गावांमध्ये शुक्रवारी पहाटे पाऊस झाल्याने कापलेले धान पीक पूर्णत: भिजले. यंदा सुरूवातीपासूनच पाऊस न झाल्याने जवळपास ३० टक्के रोवणी झालीच नाही. त्यानंतर धान पीक कसेबसे बचावल्यानंतर पुन्हा कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. अंतिम टप्यात पावसाची आवश्यकता असताना पाऊस झाला नाही. तर धान पीक कापणीनंतर शुक्रवारी पहाटे पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागातील धान पीकावर तुडतुडा व विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट झाले. यंदा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा सुरूवातीचा हंगामही नुकसानकारकच राहिला. अनेक शेतकऱ्यांचे पऱ्हे नष्ट झाले. त्यामुळे रोवणी करता आली नाही. पुन्हा तुडतुडा व अकाली पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरातील १५ ते २० गावांमध्ये अकाली पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या धानाच्या कडपा पूर्णत: भिजल्या. बांध्यांमध्ये पाणी साचल्यामुळे धानाला पिवळी कडा येऊन धानाचा भाव घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिसरातील टेंभा, खरपी, अमिर्झा, चांभार्डा, बोरी, देलोडा, मरेगाव, मौशिखांब गावातील कापलेले धान पूर्णत: भिजले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)