शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

आदिवासींनी केली निसर्ग देवतेची पूजा

By admin | Updated: April 8, 2015 01:20 IST

जल, जंगल आणि जमिनीसाठी संघर्ष करण्याची पाळी आलेला आदिवासी माणूस निसर्गावर किती प्रेम करतो, ..

एटापल्ली : जल, जंगल आणि जमिनीसाठी संघर्ष करण्याची पाळी आलेला आदिवासी माणूस निसर्गावर किती प्रेम करतो, याचे एक उत्तम उदाहरण एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा (दमकोंडी) येथे पाहायला मिळाले. सुरजागड भागातील तब्बल ७० गावांतील हजारो स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन गर्देेवाडा पहाडावर वनोपज आणि निसर्गदेवतेची पूजा करुन निसर्गाचे रक्षण करण्याची शपथ घेतली.आदिवासी माणूस आदिम काळापासून निसर्गोपासक राहिला आहे. जंगलाचे रक्षण करुन त्याचे अस्तित्व कायम ठेवण्याचे काम तो आजपर्यंत करीत आला आहे. वृक्षवल्ली आणि पशुपक्ष्यांवर निस्सिम प्रेम करुन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्याची धडपड सतत राहिली आहे. मात्र अलीकडच्या काळात निसर्गाच्या या रक्षणकर्त्यालाच जल, जंगल आणि जमिनीसाठी संघर्ष करावा लागत आहे. हा संघर्ष सुरु असतानाच निसर्गावरील त्याचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. त्यामुळे निसर्गाचे रक्षण करण्याची शपथ घेण्यासाठी निसर्गदेवतेला साकडे घालण्याची पारंपरिक प्रथाही त्याने कायम ठेवली आहे. याचाच एक भाग म्हणून १ एप्रिलला एटापल्ली तालुक्यातील सुरजागड भागाच्या ७० गावांतील आदिवासी बांधव गर्देवाडाच्या पहाडावर एकत्र आले आणि त्यांनी निसर्गदेवतेची महापूजा केली. पेरमा भूमिया सैनू भुरा महा यांच्या हस्ते तेथे गडदेव आणि वनोपजाची महापूजा करण्यात आली. यावेळी सुरजागड भागाचे प्रमुख सैनू मासू गोटा, कनादेऊ गोटा, भारत जनआंदोलनाचे कार्यकर्ते चंद्रा कवडो यांच्यासह ७० गावांतील आदिवासी नागरिकांनी या महापूजेत भाग घेतला. यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करुन सामुदायिक भोजन करण्यात आले. तत्पूर्वी वनाधिकार व पेसा कायद्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या दोनही कायद्याने आदिवासींना दिलेले हक्क व अधिकाराबाबत मंथन झाले. दरवर्षी १ एप्रिलला महापूजा करण्याचे ठरविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)