शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
5
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
6
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
7
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
8
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
9
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
10
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
11
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
12
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
13
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
14
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
15
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
16
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
17
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
18
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
19
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
20
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

नक्षलवाद्यांच्या पत्रकांना पोलिसांचे तगडे उत्तर

By admin | Updated: April 24, 2015 00:00 IST

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे माओवाद्यांनी विविध ठिकाणी पत्रक टाकून मतदारांना आवाहन केले होते.

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे माओवाद्यांनी विविध ठिकाणी पत्रक टाकून मतदारांना आवाहन केले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलीस प्रशासनानेही गेल्या अनेक दिवसांपासून कंबर कसली असून नक्षल्यांच्या या पत्रकबाजीला पोलीस प्रशासनाने सडेतोड उत्तर दिल्याचा दावा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गुरूवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात अहेरी उपविभागात अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या चार तालुक्यात ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २४ एप्रिलला होत आहे. या निवडणुकीसाठी मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी पोलीस प्रशासनाने १५ हजार पोस्टर छापून दुर्गम गावांपर्यंत जनजागृती केली आहे. नक्षलवाद्यांनी १९८० पासून या जिल्ह्याच्या विकासात अडथळे आणलेत. सर्वसामान्यांना विकासापासून दूर ठेवण्याचे काम कशा पध्दतीने केले. रस्त्याचे काम बंद पाडून शाळा उद्ध्वस्त केल्या आदींची सचित्र माहिती जनजागृती पोस्टरमधून देण्यात आली आहे, असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान वाढावे, यासाठी पोलीस प्रशासनाने ग्रामभेट कार्यक्रमावर भर देऊन नागरिकांना लोकशाहीचे महत्त्व समजावून दिले, अशी माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिले. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीला एक अतिरिक्त हेलिकॉप्टर बोलाविण्यात आले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या फौजा जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.दुर्गम व अतिदुर्गम भागात पोलिसांचा जनसामान्यांशी संपर्क आता मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. नक्षल्यांचा जनाधार सातत्याने कमी होत आहे. त्यांच्या दबावामुळे नामांकनपत्र भरल्या गेले नाही, ही अत्यंत दिशाभूल करणारी बाब माध्यमांच्या माध्यमातून पसरविली जात आहे. दुर्गम भागात २० ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांकडे नामांकन पत्र भरण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रच उपलब्ध नाही. बऱ्याच ठिकाणी महिलांच्या ५० टक्के जागा आरक्षित आहे. त्या महिलांजवळ कागदपत्रांची पूर्तता नसल्याने नामांकनपत्र भरता येत नाही. ही बाब पोलीस विभागाच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. या दृष्टीने विचार होण्याची गरज आहे, असेही पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अहेरी उपविभागात ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी १९८ बूथ राहणार आहेत. त्यापैकी ३३ बूथ अतिसंवेदनशील, ९५ बूथ संवेदनशील व ७० बूथ साधारण आहेत. या सर्व ठिकाणी भरघोस मतदान मतदार करतील व लोकशाही बळकटीकरणासाठी ते सहकार्य करतील.- संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली