शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

नक्षलवाद्यांच्या पत्रकांना पोलिसांचे तगडे उत्तर

By admin | Updated: April 24, 2015 00:00 IST

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे माओवाद्यांनी विविध ठिकाणी पत्रक टाकून मतदारांना आवाहन केले होते.

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे माओवाद्यांनी विविध ठिकाणी पत्रक टाकून मतदारांना आवाहन केले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलीस प्रशासनानेही गेल्या अनेक दिवसांपासून कंबर कसली असून नक्षल्यांच्या या पत्रकबाजीला पोलीस प्रशासनाने सडेतोड उत्तर दिल्याचा दावा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गुरूवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात अहेरी उपविभागात अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या चार तालुक्यात ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २४ एप्रिलला होत आहे. या निवडणुकीसाठी मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी पोलीस प्रशासनाने १५ हजार पोस्टर छापून दुर्गम गावांपर्यंत जनजागृती केली आहे. नक्षलवाद्यांनी १९८० पासून या जिल्ह्याच्या विकासात अडथळे आणलेत. सर्वसामान्यांना विकासापासून दूर ठेवण्याचे काम कशा पध्दतीने केले. रस्त्याचे काम बंद पाडून शाळा उद्ध्वस्त केल्या आदींची सचित्र माहिती जनजागृती पोस्टरमधून देण्यात आली आहे, असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान वाढावे, यासाठी पोलीस प्रशासनाने ग्रामभेट कार्यक्रमावर भर देऊन नागरिकांना लोकशाहीचे महत्त्व समजावून दिले, अशी माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिले. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीला एक अतिरिक्त हेलिकॉप्टर बोलाविण्यात आले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या फौजा जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.दुर्गम व अतिदुर्गम भागात पोलिसांचा जनसामान्यांशी संपर्क आता मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. नक्षल्यांचा जनाधार सातत्याने कमी होत आहे. त्यांच्या दबावामुळे नामांकनपत्र भरल्या गेले नाही, ही अत्यंत दिशाभूल करणारी बाब माध्यमांच्या माध्यमातून पसरविली जात आहे. दुर्गम भागात २० ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांकडे नामांकन पत्र भरण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रच उपलब्ध नाही. बऱ्याच ठिकाणी महिलांच्या ५० टक्के जागा आरक्षित आहे. त्या महिलांजवळ कागदपत्रांची पूर्तता नसल्याने नामांकनपत्र भरता येत नाही. ही बाब पोलीस विभागाच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. या दृष्टीने विचार होण्याची गरज आहे, असेही पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अहेरी उपविभागात ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी १९८ बूथ राहणार आहेत. त्यापैकी ३३ बूथ अतिसंवेदनशील, ९५ बूथ संवेदनशील व ७० बूथ साधारण आहेत. या सर्व ठिकाणी भरघोस मतदान मतदार करतील व लोकशाही बळकटीकरणासाठी ते सहकार्य करतील.- संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली