शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
6
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
7
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
8
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
9
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
10
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
11
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
12
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
13
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
14
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
15
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
16
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
17
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
18
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
19
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
20
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क

विकासात पोलीस पाटलांचा वाटा मोठा

By admin | Updated: February 10, 2016 01:31 IST

दुर्गम व नक्षलग्रस्त गावाचा विकास करण्याबरोबरच गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस पाटलांनी आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केले.

अम्ब्रीशराव आत्राम यांचे प्रतिपादन : पोलीस पाटलांच्या कार्यशाळेत मार्गदर्शिकेचे विमोचनगडचिरोली : दुर्गम व नक्षलग्रस्त गावाचा विकास करण्याबरोबरच गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस पाटलांनी आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केले. पोलीस पाटलाला गावामध्ये आजही मानाचे स्थान असून हा मानसन्मान कायम ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी गावाच्या विकासासाठी स्वत:ला झोकून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. पोलीस मुख्यालयात मंगळवारी जिल्हाभरातील पोलीस पाटलांचे चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रणजितकुमार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, प्रकाश गेडाम, अनिल करपे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांना मार्गदर्शक ठरू शकेल, यासाठी ‘पोलीस पाटील मार्गदर्शीका’ या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. सदर पुस्तिका प्रत्येक पोलीस पाटलाला देण्यात आली. या कार्यशाळेला जिल्हाभरातील जवळपास दीड हजार पोलीस पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या परंपरेनुसार गावातील पहिला व्यक्ती हा पोलीस पाटील आहे. पोलीस पाटलाला जेवढा मानसन्मान मिळतो, तेवढा मानसन्मान सरपंच व किंवा ग्रामपंचायत सदस्यांनाही मिळत नाही. प्रत्येक पोलीस पाटलाने स्वत:ची जबाबदारी समजून घ्यावी, असे सांगितले. जिल्हाधिकारी रणजितकुमार म्हणाले की, जिल्ह्यात पोलीस पाटील हे पद सांभाळताना पोलीस पाटलांना फार मोठी जोखीम उचलावी लागते. तरीही या जिल्ह्यातील पोलीस पाटील अत्यंत चांगले काम करीत आहे. नक्षल्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना घरकूल किंवा जमीन देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पेन्शन मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले की, पोलीस पाटलांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. नक्षल्यांच्या दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील पोलीस पाटील आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, संचालन पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार तर आभार पोलीस उपनिरिक्षक पालवे यांनी मानले.