शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विकासात पोलीस पाटलांचा वाटा मोठा

By admin | Updated: February 10, 2016 01:31 IST

दुर्गम व नक्षलग्रस्त गावाचा विकास करण्याबरोबरच गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस पाटलांनी आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केले.

अम्ब्रीशराव आत्राम यांचे प्रतिपादन : पोलीस पाटलांच्या कार्यशाळेत मार्गदर्शिकेचे विमोचनगडचिरोली : दुर्गम व नक्षलग्रस्त गावाचा विकास करण्याबरोबरच गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस पाटलांनी आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केले. पोलीस पाटलाला गावामध्ये आजही मानाचे स्थान असून हा मानसन्मान कायम ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी गावाच्या विकासासाठी स्वत:ला झोकून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. पोलीस मुख्यालयात मंगळवारी जिल्हाभरातील पोलीस पाटलांचे चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रणजितकुमार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, प्रकाश गेडाम, अनिल करपे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांना मार्गदर्शक ठरू शकेल, यासाठी ‘पोलीस पाटील मार्गदर्शीका’ या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. सदर पुस्तिका प्रत्येक पोलीस पाटलाला देण्यात आली. या कार्यशाळेला जिल्हाभरातील जवळपास दीड हजार पोलीस पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या परंपरेनुसार गावातील पहिला व्यक्ती हा पोलीस पाटील आहे. पोलीस पाटलाला जेवढा मानसन्मान मिळतो, तेवढा मानसन्मान सरपंच व किंवा ग्रामपंचायत सदस्यांनाही मिळत नाही. प्रत्येक पोलीस पाटलाने स्वत:ची जबाबदारी समजून घ्यावी, असे सांगितले. जिल्हाधिकारी रणजितकुमार म्हणाले की, जिल्ह्यात पोलीस पाटील हे पद सांभाळताना पोलीस पाटलांना फार मोठी जोखीम उचलावी लागते. तरीही या जिल्ह्यातील पोलीस पाटील अत्यंत चांगले काम करीत आहे. नक्षल्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना घरकूल किंवा जमीन देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पेन्शन मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले की, पोलीस पाटलांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. नक्षल्यांच्या दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील पोलीस पाटील आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, संचालन पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार तर आभार पोलीस उपनिरिक्षक पालवे यांनी मानले.