शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून महिलेला बेदम मारहाण

By admin | Updated: July 14, 2014 23:58 IST

तालुक्यातील रंगधामपेठा येथील निर्मला व्यंकटस्वामी मोगरम या महिलेच्या मुलाने प्रेमप्रकरणातून मुलीलाला पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी मुलांची

प्रेमप्रकरणातून बदडले : आसरअल्लीच्या ठाणेदारावर कारवाईची मागणीसिरोंचा : तालुक्यातील रंगधामपेठा येथील निर्मला व्यंकटस्वामी मोगरम या महिलेच्या मुलाने प्रेमप्रकरणातून मुलीलाला पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी मुलांची आई निर्मला मोगरम हिला पोलीस ठाण्यात बोलावून तब्बल ५ दिवस ठाण्यात बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित महिला निर्मला मोगरम यांनी केली आहे.या घटनेसंदर्भात मारहाण प्रकरणास कारणीभूत असलेल्या आसरअल्ली पोलीस ठाण्याच्या ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी पीडित महिला निर्मला मोगरम यांनी केली आहे. निर्मला मोगरम यांनी दिलेल्या माहितीनुसार तिचा मुलगा महेंद्र लक्कस्वामी मोगरम (२४) रा. रंगधामपेठा याचे त्याच्याच गावातील व त्यांच्याच समाजातील १९ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधाची माहिती दोनही कुटुंबांना झाली होती. मात्र मुलीच्या वडीलाला हे प्रेमप्रकरण मान्य नव्हते. मुलीच्या कुटुंबांकडून प्रेमसंबंधाला होत असलेला विरोध पाहून या प्रेमयुगुलांनी घरून पळून जाण्याचा निर्णय घेतला. यानुसार दोघेही ३० जून रोजी सोमवारला गावातून पळून गेले. याबाबत मुलीच्या वडीलांनी १ जुलै रोजी मुलगी पळवून नेल्याची तक्रार आसरअल्ली पोलीस ठाण्यात दिली. २ जुलै रोजी बुधवारला सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान तीन दुचाकीवर पाच पोलीस जवान व एक महिला पोलीस कान्स्टेबल माझ्या घरी आले व त्यांनी आपल्याला दुचाकीवरून बसवून पोलीस ठाण्यात नेले, अशी माहिती मुलाची आई निर्मला मोगरम यांनी दिली. यावेळी कोणतीही विचारपूस न करता उपस्थित असलेले ठाणेदार कोळी व इतर चार महिला पोलिसांनी आपल्याला बेदम मारहाण केली, असा आरोप निर्मला मोगरम यांनी केला आहे. या मारहाणीत आपल्या दोन्ही तळहातावर फोड आले. तसेच पाठीवर व्रण उमटले. आपली कोणतीही चूक नसताना आपल्याला पोलिसांनी नाहक बेदम मारहाण केली, असे सांगितले. या संदर्भात आसरअल्ली ठाण्याचे पोलीस निरिक्षक व्ही. बी. कोळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी निर्मला मोगरम या महिलेला कुठल्याही प्रकारची मारहाण केली नाही. तिच्या मुलाने मुलगी पळवून नेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशीसाठी तिला दोन ते तीन दिवस ठाण्यात ठेवले होते. चौकशीसाठी सदर महिला सहकार्य करीत नव्हती, असेही ठाणेदार कोळी यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)