शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कुलिंगच्या नावाखाली सिरोंचात लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:34 IST

प्रत्येक शीतपेयाच्या बॉटलवरही किंमत छापली राहते. याच किमतीला शीतपेयांची विक्री करणे गरजेचे असताना दुकानदार छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने शीतपेयांची विक्री करीत आहेत. याबाबत एखाद्या ग्राहकाने कारण विचारल्यास शीतपेय थंड करण्याचे चॉर्जेस असल्याचे सांगितले जाते. मात्र ही ग्राहकांची एकप्रकारची लूट आहे.

ठळक मुद्देग्राहक अनभिज्ञ : १६ रुपयांची पाण्याची बॉटल विकली जाते २० रुपयाला

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : प्रत्येक शीतपेयाच्या बॉटलवरही किंमत छापली राहते. याच किमतीला शीतपेयांची विक्री करणे गरजेचे असताना दुकानदार छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने शीतपेयांची विक्री करीत आहेत. याबाबत एखाद्या ग्राहकाने कारण विचारल्यास शीतपेय थंड करण्याचे चॉर्जेस असल्याचे सांगितले जाते. मात्र ही ग्राहकांची एकप्रकारची लूट आहे.सिरोंचात १० रुपयांचे शीतपेयाचे पॉकेट १३ रुपयाला विकले जाते. दही व काही शीतपेयांच्या पॉकेटची किंमत १५ रुपये असताना त्यासाठी १८ रुपये आकारले जातात. पाण्याच्या बॉटलची किंमत १६ रुपये असताना सरसकट २० रुपये आकारले जात आहेत. छापील किमतीपेक्षा अधिक किमतीला वस्तूची विक्री करणे हे कायद्यान्वये गुन्हा आहे. मात्र याला न जुमानताच दुकानदार शीतपेयांची विक्री करीत आहेत. ग्राहकही वाद नको म्हणून दुकानदार म्हणेल तेवढे पैसे देत आहेत. एखाद्यावेळेस विक्रेत्याने अधिक किमतीबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास त्याला खडे बोल सुनावले जाते.ग्राहकांच्या चुप्पीचा दुकानदारांकडून गैरफायदा उचलला जात आहे. छापील किमतीवर सर्व करासहीत असा स्पष्ट उल्लेख कंपनीकडून केला राहतो. याचा अर्थ सदर वस्तू त्याच किमतीला विकायची राहते. या किमतीमध्ये ठोक व किरकोळ व्यापाऱ्याचा नफा, तसेच कुलिंगसाठी येणारा खर्च आदी अंतर्भूत असतो. मात्र याला न जुमानताच दुकानदार अधिक किमतीने विक्री करीत आहेत. अधिकच्या किमतीबाबत ग्राहकही प्रशासनाकडे तक्रार करीत नसल्याने कारवाई करणे शक्य होत नाही.सांगितले जाते कमी मार्जिनचे कारणशीतपेयांवर अत्यंत कमी प्रमाणात दुकानदारांना नफा मिळतो. त्यातही शीतपेय थंड करून ठेवावी लागतात. त्यासाठी अधिकच्या वीज बिलाचा भूर्दंड दुकानदारांवर पडतो, असे कारण सांगितले जाते. मात्र हे कारण सयुक्तिक नाही. कारण चिल्लर दुकानदारांचा नफा समाविष्ट करूनच छापील किंमत दिली जाते. सर्वच वस्तू छापील किमतीवर विकल्या जात असताना शीतपेय मात्र याला अपवाद आहेत. ते छापील किमतीपेक्षा अधिक दराने विकले जात आहेत.