शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

नाटकबाजी करणाऱ्यांना समाजाच्या व्यथा कळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:18 IST

देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते आपल्या सरकारच्या फसव्या प्रसिद्धीचे ढोल वाजविण्यासाठी डॉ.बाबासांहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे नाटक करीत आहे. त्यांना समाजाच्या व्यथा कळतच नाही, अशी टिका करून गोरगरीबांचे उत्थान करण्यासाठी ठोस, कायदेशीर व रचनात्मक उपाययोजनांची आवश्यकता आहे,....

ठळक मुद्देसुरेश माने यांची टीका : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पर्याय म्हणून समोर येणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते आपल्या सरकारच्या फसव्या प्रसिद्धीचे ढोल वाजविण्यासाठी डॉ.बाबासांहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे नाटक करीत आहे. त्यांना समाजाच्या व्यथा कळतच नाही, अशी टिका करून गोरगरीबांचे उत्थान करण्यासाठी ठोस, कायदेशीर व रचनात्मक उपाययोजनांची आवश्यकता आहे, हे मोदी सरकारने लवकर समजावे, असा इशारा बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीचे (बीआरएसपी) संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.सुरेश माने यांनी दिला.गडचिरोलीत शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रपरिषदेत अ‍ॅड.माने बोलत होते. यावेळी बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दशरथ मडावी, कैलास नगराळे, विलास कोडापे, मिलिंद बांबोळे, सदाशिव निमगडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी माने म्हणाले, सर्वात जास्त हिंसाचार भाजपच्या राजवटीत दलितांवर झाला आहे. अनेक राज्यात त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणात दलितांवरील गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, पण प्रत्यक्षात काहीच केले नाही. शासनाने किती गुन्हे मागे घेतले याचे आकडे द्यावे, असेही ते म्हणाले. भाजप सरकारने लोकशाही आणि राज्यघटनेवरील हल्ले थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले. सूरजागड खाण प्रकरणी भाजप नेते आधी एक बोलत होते, आता सत्तेत आल्यावर वेगळी भूमिका घेत आहेत. नेमकी भूमिका कोणती हे त्यांनी स्पष्ट करावे, असे माने म्हणाले.समाजातील कोणताही वर्ग आता भाजपचे समर्थन करायला तयार नाही. त्याचा फटका राज्यात येणाºया निवडणुकांत भाजपला निश्चित बसेल. शिवाय काँग्रेस आणि भाजपच्या धोरणांमध्ये फारसा फरक नाही.त्यामुळे समर्थ पर्याय म्हणून बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी राज्यात विधानसभेच्या अनेक जागा लढवेल, असेही अ‍ॅड. सुरेश माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सरकारने तेंदूपत्ता संकलन करावेगडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाचा वाटा असणाऱ्या तेंदूपत्ता व्यवसायावर यावर्षी ठेकेदारांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. यामुळे हजारो मजुरांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात जिल्हाधिकाºयांनी मध्यस्थी करावी आणि सरकारने तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरू करावे, अशी मागणी बीआरएसपीचे विदर्भ अध्यक्ष दशरथ मडावी यांनी यावेळी केली.