शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

नाटकबाजी करणाऱ्यांना समाजाच्या व्यथा कळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:18 IST

देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते आपल्या सरकारच्या फसव्या प्रसिद्धीचे ढोल वाजविण्यासाठी डॉ.बाबासांहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे नाटक करीत आहे. त्यांना समाजाच्या व्यथा कळतच नाही, अशी टिका करून गोरगरीबांचे उत्थान करण्यासाठी ठोस, कायदेशीर व रचनात्मक उपाययोजनांची आवश्यकता आहे,....

ठळक मुद्देसुरेश माने यांची टीका : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पर्याय म्हणून समोर येणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते आपल्या सरकारच्या फसव्या प्रसिद्धीचे ढोल वाजविण्यासाठी डॉ.बाबासांहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे नाटक करीत आहे. त्यांना समाजाच्या व्यथा कळतच नाही, अशी टिका करून गोरगरीबांचे उत्थान करण्यासाठी ठोस, कायदेशीर व रचनात्मक उपाययोजनांची आवश्यकता आहे, हे मोदी सरकारने लवकर समजावे, असा इशारा बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीचे (बीआरएसपी) संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.सुरेश माने यांनी दिला.गडचिरोलीत शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रपरिषदेत अ‍ॅड.माने बोलत होते. यावेळी बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दशरथ मडावी, कैलास नगराळे, विलास कोडापे, मिलिंद बांबोळे, सदाशिव निमगडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी माने म्हणाले, सर्वात जास्त हिंसाचार भाजपच्या राजवटीत दलितांवर झाला आहे. अनेक राज्यात त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणात दलितांवरील गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, पण प्रत्यक्षात काहीच केले नाही. शासनाने किती गुन्हे मागे घेतले याचे आकडे द्यावे, असेही ते म्हणाले. भाजप सरकारने लोकशाही आणि राज्यघटनेवरील हल्ले थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले. सूरजागड खाण प्रकरणी भाजप नेते आधी एक बोलत होते, आता सत्तेत आल्यावर वेगळी भूमिका घेत आहेत. नेमकी भूमिका कोणती हे त्यांनी स्पष्ट करावे, असे माने म्हणाले.समाजातील कोणताही वर्ग आता भाजपचे समर्थन करायला तयार नाही. त्याचा फटका राज्यात येणाºया निवडणुकांत भाजपला निश्चित बसेल. शिवाय काँग्रेस आणि भाजपच्या धोरणांमध्ये फारसा फरक नाही.त्यामुळे समर्थ पर्याय म्हणून बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी राज्यात विधानसभेच्या अनेक जागा लढवेल, असेही अ‍ॅड. सुरेश माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सरकारने तेंदूपत्ता संकलन करावेगडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाचा वाटा असणाऱ्या तेंदूपत्ता व्यवसायावर यावर्षी ठेकेदारांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. यामुळे हजारो मजुरांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात जिल्हाधिकाºयांनी मध्यस्थी करावी आणि सरकारने तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरू करावे, अशी मागणी बीआरएसपीचे विदर्भ अध्यक्ष दशरथ मडावी यांनी यावेळी केली.