शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नाटकबाजी करणाऱ्यांना समाजाच्या व्यथा कळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:18 IST

देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते आपल्या सरकारच्या फसव्या प्रसिद्धीचे ढोल वाजविण्यासाठी डॉ.बाबासांहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे नाटक करीत आहे. त्यांना समाजाच्या व्यथा कळतच नाही, अशी टिका करून गोरगरीबांचे उत्थान करण्यासाठी ठोस, कायदेशीर व रचनात्मक उपाययोजनांची आवश्यकता आहे,....

ठळक मुद्देसुरेश माने यांची टीका : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पर्याय म्हणून समोर येणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते आपल्या सरकारच्या फसव्या प्रसिद्धीचे ढोल वाजविण्यासाठी डॉ.बाबासांहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे नाटक करीत आहे. त्यांना समाजाच्या व्यथा कळतच नाही, अशी टिका करून गोरगरीबांचे उत्थान करण्यासाठी ठोस, कायदेशीर व रचनात्मक उपाययोजनांची आवश्यकता आहे, हे मोदी सरकारने लवकर समजावे, असा इशारा बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीचे (बीआरएसपी) संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.सुरेश माने यांनी दिला.गडचिरोलीत शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रपरिषदेत अ‍ॅड.माने बोलत होते. यावेळी बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दशरथ मडावी, कैलास नगराळे, विलास कोडापे, मिलिंद बांबोळे, सदाशिव निमगडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी माने म्हणाले, सर्वात जास्त हिंसाचार भाजपच्या राजवटीत दलितांवर झाला आहे. अनेक राज्यात त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणात दलितांवरील गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, पण प्रत्यक्षात काहीच केले नाही. शासनाने किती गुन्हे मागे घेतले याचे आकडे द्यावे, असेही ते म्हणाले. भाजप सरकारने लोकशाही आणि राज्यघटनेवरील हल्ले थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले. सूरजागड खाण प्रकरणी भाजप नेते आधी एक बोलत होते, आता सत्तेत आल्यावर वेगळी भूमिका घेत आहेत. नेमकी भूमिका कोणती हे त्यांनी स्पष्ट करावे, असे माने म्हणाले.समाजातील कोणताही वर्ग आता भाजपचे समर्थन करायला तयार नाही. त्याचा फटका राज्यात येणाºया निवडणुकांत भाजपला निश्चित बसेल. शिवाय काँग्रेस आणि भाजपच्या धोरणांमध्ये फारसा फरक नाही.त्यामुळे समर्थ पर्याय म्हणून बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी राज्यात विधानसभेच्या अनेक जागा लढवेल, असेही अ‍ॅड. सुरेश माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सरकारने तेंदूपत्ता संकलन करावेगडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाचा वाटा असणाऱ्या तेंदूपत्ता व्यवसायावर यावर्षी ठेकेदारांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. यामुळे हजारो मजुरांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात जिल्हाधिकाºयांनी मध्यस्थी करावी आणि सरकारने तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरू करावे, अशी मागणी बीआरएसपीचे विदर्भ अध्यक्ष दशरथ मडावी यांनी यावेळी केली.