शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

पृथ्वी वाचविण्यासाठी वृक्षारोपण यज्ञ

By admin | Updated: June 24, 2017 01:26 IST

वाढत्या औद्योगिकरण व लोकसंख्येमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

खासदारांचे प्रतिपादन : वन विभाग व ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनतर्फे वृक्षदिंडी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : वाढत्या औद्योगिकरण व लोकसंख्येमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सजीव सृष्टीला दीर्घकाळ टिकवायचे असेल तर वृक्ष लागवडीशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करून वृक्ष जगवावे, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले. वन विभाग व ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वतीने गडचिरोली शहरातून शुक्रवारी सकाळी वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर मुख्य वनसंरक्षक कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार प्रा.अनिल सोले, आ.डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, मुख्य वनसंरक्षक येटबॉन, भाजप महामंत्री रवींद्र ओल्लालवार, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बबली मेश्राम, किशोर पाटील, विजय फडणवीस, प्रशांत कामडी, देवा डेहनकर, नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. अशोक नेते म्हणाले, एक व्यक्ती एका दिवशी जो आॅक्सिजन घेतो, त्याची किंमत काढली तर ती २५ हजार रूपयांच्या जवळपास आहे. झाडांची संख्या कमी झाली तर आॅक्सिजन विकत घेण्याची पाळी येऊ शकते, आॅक्सिजन मिळाला नाही तर सजीव दोन मिनीटेही जिवंत राहू शकत नाही. आॅक्सिजन पुरवठ्यासाठी झाडे एकमेव पुरवठादार आहेत. त्यामुळे सजीव सृष्टीमध्ये झाडांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येकाने झाडांची लागवड करून ते जगविण्याचा प्रयत्न करणे हे स्वत:चे कर्तव्य मानले पाहिजे. झाड लावून ते जगविण्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न राज्य व केंद्र शासन करीत आहे, असे मार्गदर्शन खा.अशोक नेते यांनी केले. आ.प्रा.अनिल सोले म्हणाले, वृक्षदिंडी विदर्भातील सहा जिल्ह्यात काढली जाणार आहे. आज आपण वृक्षलागवड केली नाही तर येणाऱ्या काळात जीवन जगणे कठीण होऊन जाईल. पूर्वी इंधन व पाणी निसर्गातून सहज मिळत होते. परंतु वेळीच योग्य काळजी घेतली नसल्यामुळे आपल्याला ते आता खरेदी करण्याची पाळी आली आहे, असे ते म्हणाले. आ.डॉ. देवराव होळी यांनी वृक्षदिंडी ही लोकचळवळ असल्याचे सांगून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे हे ईश्वरीय कार्य आहे. शासनामार्फत १ ते ७ जुलै या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात २५ लाख या उद्दिष्ट उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड केली जाणार आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक सुनील पेंदोरकर यांनी केले. कार्यक्रमादरम्यान सर्वांना वृक्ष लागवड व जगविण्याची शपथ दिली. मात्र वनविभागाने यावेळीही प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमापासून दूर ठेवले. वनविभागाने खोदले २५ लाख खड्डे गडचिरोली जिल्ह्याला वृक्षलागवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभाग मागील दोन महिन्यांपासून कामाला लागला आहे. वन विभागाच्या मार्फत जनजागृती केली जात आहे. वृक्षारोपणासाठी वन विभागाने सुमारे २५ लाख खड्डे खोदले आहेत. १ ते ७ जुलै या कालावधीत वृक्षलागवड केली जाईल. जिल्ह्यातील जंगल टिकून राहिले पाहिजे, यासाठी वन विभाग प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्य वनसंरक्षक येटबॉन यांनी केले. वृक्ष लागवड करू इच्छिणाऱ्या नागरिक व स्वयंसेवी संस्थांना सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिले जातील, अशीही माहिती मुख्य वनसंरक्षक येटबॉन यांनी कार्यक्रमादरम्यान दिली.