शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वृक्षारोपण मोहीम ठरली केवळ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:38 IST

वृक्ष लागवडीचे फलक कायम रोप नष्ट वैरागड : ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवून मोठा गाजावाजा करून ही मोहीम राबविण्यात ...

वृक्ष लागवडीचे फलक कायम रोप नष्ट

वैरागड : ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवून मोठा गाजावाजा करून ही मोहीम राबविण्यात आली त्यात वनविभागाने किमान आपले ५० टक्के तरी रोप जगवले. उर्वरित स्थानिक स्वराज्य, संस्था बांधकाम विभाग, रोजगार हमी योजना या विभागाने केवळ वृक्षलागवडीचा देखावा निर्माण केला. ज्या ठिकाणी रोप लावले ती जागादेखील आता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही. आरमोरी तालुक्यातील वैरागड, कढाेली, देलनवाडी, मानापूर, डोंगरतमासी, वडेगाव, मेंढा आदी भागांत दाेन वर्षांपूर्वी लावलेली झाडे आता नष्ट झाली आहेत.

मागील चार-पाच वर्षांत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वनविभाग व इतर यंत्रणांनी नको त्या ठिकाणी वृक्षलागवड करून केवळ वृक्ष लागवडीचा देखावा निर्माण केला. वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाने तर वृक्षलागवडीची हद्दच केली. ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या चांगले जंगल आहे त्या जंगलातून जाणारे डांबरी रस्ते, पाणंद रस्ते, पायवाटा यांच्या दुतर्फा वृक्षारोपण केले. ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या उभे जंगलच अस्तित्वात होते त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची कोणत्या सुपीक डोक्यातील कल्पना होती, कोण जाणे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी म्हणजे ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, बांधकाम विभाग, रोजगार हमी योजनाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. त्यातील १० टक्के वृक्ष जिवंत स्थितीत नाहीत. वनविभाग वगळता इतर यंत्रणांनी लावलेले वृक्ष भुईसपाट झाले आहेत. रस्त्याच्या कडेला लावलेले वृक्ष जिवंत राहत नाही. असा दरवर्षीचा अनुभव असताना देखील रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण का केले जाते, असा प्रश्न आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, कढाेली, देलनवाडी, मानापूर, डोंगरतमासी फाटा ते वडगाव, मेंढा कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला दोन वर्षांपूर्वी झाडे लावली होती त्यातील २५ टक्केही झाडे जिवंत नाहीत.