शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपण मोहीम ठरली केवळ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:38 IST

वृक्ष लागवडीचे फलक कायम रोप नष्ट वैरागड : ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवून मोठा गाजावाजा करून ही मोहीम राबविण्यात ...

वृक्ष लागवडीचे फलक कायम रोप नष्ट

वैरागड : ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवून मोठा गाजावाजा करून ही मोहीम राबविण्यात आली त्यात वनविभागाने किमान आपले ५० टक्के तरी रोप जगवले. उर्वरित स्थानिक स्वराज्य, संस्था बांधकाम विभाग, रोजगार हमी योजना या विभागाने केवळ वृक्षलागवडीचा देखावा निर्माण केला. ज्या ठिकाणी रोप लावले ती जागादेखील आता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही. आरमोरी तालुक्यातील वैरागड, कढाेली, देलनवाडी, मानापूर, डोंगरतमासी, वडेगाव, मेंढा आदी भागांत दाेन वर्षांपूर्वी लावलेली झाडे आता नष्ट झाली आहेत.

मागील चार-पाच वर्षांत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वनविभाग व इतर यंत्रणांनी नको त्या ठिकाणी वृक्षलागवड करून केवळ वृक्ष लागवडीचा देखावा निर्माण केला. वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाने तर वृक्षलागवडीची हद्दच केली. ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या चांगले जंगल आहे त्या जंगलातून जाणारे डांबरी रस्ते, पाणंद रस्ते, पायवाटा यांच्या दुतर्फा वृक्षारोपण केले. ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या उभे जंगलच अस्तित्वात होते त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची कोणत्या सुपीक डोक्यातील कल्पना होती, कोण जाणे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी म्हणजे ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, बांधकाम विभाग, रोजगार हमी योजनाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. त्यातील १० टक्के वृक्ष जिवंत स्थितीत नाहीत. वनविभाग वगळता इतर यंत्रणांनी लावलेले वृक्ष भुईसपाट झाले आहेत. रस्त्याच्या कडेला लावलेले वृक्ष जिवंत राहत नाही. असा दरवर्षीचा अनुभव असताना देखील रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण का केले जाते, असा प्रश्न आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, कढाेली, देलनवाडी, मानापूर, डोंगरतमासी फाटा ते वडगाव, मेंढा कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला दोन वर्षांपूर्वी झाडे लावली होती त्यातील २५ टक्केही झाडे जिवंत नाहीत.