शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

आराखडा तयार मात्र बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:40 IST

उन्हाळ्यात निर्माण होणारी वैरागड येथील पाणी टंचाई निवारण्यासाठी राष्टÑीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत गोरजाई डोहावर नळ योजना प्रस्तावित असून....

ठळक मुद्देग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : वाढत्या लोकसंख्येच्या वैरागडात उन्हाळ्यात जाणवते टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : उन्हाळ्यात निर्माण होणारी वैरागड येथील पाणी टंचाई निवारण्यासाठी राष्टÑीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत गोरजाई डोहावर नळ योजना प्रस्तावित असून या नळ योजनेचा प्रारूप आराखडा तयार झाला आहे. मात्र मागील चार वर्षांपासून नळ योजनेचा मुहूर्त सापडत नसल्याने सदर योजना कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वैरागड येथे ७५ हजार लिटर क्षमतेची जुनी पाणी पुरवठा योजना आहे. गावाची वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा वाढता वापर लक्षात घेऊन गोरजाई डोहावर पाणी पुरवठा योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी होत होती. मात्र जुन्याच पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर गावाच्या मध्यभागी भोयर यांच्या घराजवळ १५ हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी बांधण्यात आली. मात्र गावातील अर्ध्या अधिक नळधारकांना पाणी मिळत नाही. फेब्रुवारी महिन्यापासून गावात पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळे नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली आहे.राष्टÑीय ग्रामीण जल योजना कार्यक्रमांतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना ग्रामसभेत मंजूर करण्यात आली. यात विहीर खोलीकरण, पंप दुरूस्ती, नवीन पाणी पुरवठा विहीर, फिल्टर, गोरजाई डोहावर नवीन पंप, नवीन गृह पाईपलाईन यांचा समावेश आहे. योजनेच्या अधिकाºयांनी जागेसाठी अनेकदा सर्वे केला. मात्र येथील स्थानिक प्रशासनाकडून या कामासाठी पाठपुरावा होत नसल्याने नळ योजनेचे काम थंडबस्त्यात आहे. अगदी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर थातूरमातूर उपाययोजना केली जाते. मागील वर्षी केवळ खड्डा तयार करण्यासाठी एक लाख रूपयांचा खर्च केला होता. मात्र या खड्ड्याचा उपयोग झाला नाही.आमदारांचे आश्वासन हवेत विरलेआमदार कृष्णा गजबे यांनी १६ एप्रिल रोजी ग्रामपंचायत सभागृहात बैठक घेऊन वैरागड येथील पाणी टंचाईवर चर्चा केली आणि गोरजाई डोहावरील नळ योजनेचे काम लवकरात लवकर सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र सदर आश्वासन हवेतच विरले. वैरागडच्या या नळ योजनेच्या प्रश्नाकडे तालुका, जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.