शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

विहिरी व शेततळ्यांचा आराखडा तयार करा

By admin | Updated: December 20, 2015 01:08 IST

मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी नागपूर येथे आढावा बैठक घेऊन पाच हजार विहिरी जलयुक्त शिवार अभियानातून निर्माण करण्याचे उद्दीष्ट दिले होते.

जलसंधारण सचिवांचे निर्देश : गडचिरोलीत आढावा सभागडचिरोली : मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी नागपूर येथे आढावा बैठक घेऊन पाच हजार विहिरी जलयुक्त शिवार अभियानातून निर्माण करण्याचे उद्दीष्ट दिले होते. त्यानंतर लागलीच प्रशासन या दृष्टीने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. शनिवारी राज्याच्या जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी गडचिरोली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयात सभा घेऊन विहिरी व शेततळ्याचे आराखडे तयार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी रणजितकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता उपस्थित होत्या.जिल्ह्याचे जलस्तर वाढविणे व शेतकऱ्यांना दुबार पीक घेणे शक्य व्हावे या दृष्टीने पाच हजार शेततळे तयार केले जाणार आहे. जिल्ह्यातील आणखी काही गावे जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट करून त्या ठिकाणी तांत्रिक सहाय्य व अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही देशमुख यांनी दिले. या बैठकीला जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी राजीव जवळेकर, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, कौस्तुभ दिवेगावकर, अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना, विवेक होशिंग, वरिष्ठ भूवैज्ञानिक निखाडे, जलसंधारणाचे अधीक्षक अभियंता डी. डी. पोहोकर, नरेगाचे गट विकास अधिकारी एस. पी. पडघन, उपवनसंरक्षक जे. एन. शिंदे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)पाच हजार सामुदायिक विहिरी बांधादोन ते चार एकर शेती असलेल्या एका शेतकऱ्याला शेतात विहीर बांधणे शक्य नसते. परंतु पाच-पाचच्या गटात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संयुक्तरित्या जमिनीचा खर्च भरून तयार दर्शविल्यास त्या गटाला मनरेगा अंतर्गत विहीर देता येईल. त्याकरिता पाच हजार सामुदायिक विहिरींचे उद्दीष्ट या बैठकीत निश्चित करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याचे भूस्तर रचना वेगळी असून १० ते १५ फुटानंतर मनुष्यबळ वापरणे अशक्य आहे, अशा पार्श्वभूमीवर उर्वरित कामांसाठी गडचिरोली जिल्ह्याला खास बाब म्हणून कुशल कामांतर्गत प्रमाण बदलून देण्याची तयारी तसा मॉडेल व विहिरींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तत्काळ द्यावा, याला मंजुरीसह निधीही पुरविण्यात येईल, असे सचिव प्रभाकर देशमुख म्हणाले.