शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

ब्रिटिशकालीन जिल्ह्याची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:40 IST

सध्याच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात समाविष्ट असलेला सिरोंचा तालुका हा ब्रिटिशाच्या काळात जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण होते. मात्र सिरोंचा तालुक्याचा अद्यापही अपेक्षित विकास झाला नाही. या तालुक्यात अनेक मूलभूत समस्या कायम असून पर्यटन विकासाचा अभाव आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । सिरोंचा तालुका विकासाच्या प्रतीक्षेत, मूलभूत सोयीसुविधा, उद्योगधंदे व पर्यटन विकासाचा अभाव

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सध्याच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात समाविष्ट असलेला सिरोंचा तालुका हा ब्रिटिशाच्या काळात जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण होते. मात्र सिरोंचा तालुक्याचा अद्यापही अपेक्षित विकास झाला नाही. या तालुक्यात अनेक मूलभूत समस्या कायम असून पर्यटन विकासाचा अभाव आहे.सन १८७४ मध्ये सिरोंचा हे गाव वसल्याचा इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. त्या काळात अपर गोदावरी जिल्हा आयुक्ताचे पद रिक्त होते. १० आॅक्टोबर ते २४ डिसेंबर १८७३ पर्यंत डी. ड्रायसेंडल हे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर २५ डिसेंबर १९६३ ते १० एप्रिल १८७५ या कालावधीत लेफ्टनंट कर्नल सी. एल. आर. ग्लासफोर्ड यांनी उपायुक्त पदाचा कार्यभार सांभाळला. त्यावेळच्या अपर गोदावरी जिल्ह्यात उत्कृष्ट तालुका म्हणून सिरोंचाची ख्याती होती. तत्कालीन बस्तर राज्याच्या ३३ किमी अंतरावर सिरोंचा तालुक्याची सीमा आखण्यात आली. १८६७ मध्ये सिरोंचा तालुक्याचे क्षेत्रफळ १० हजार ५३ चौरस एवढे निश्चित करण्यात आले. १८५७ च्या प्रथम भारतीय स्वातंत्र्य युध्दात त्याच्या वारसानांना ५०० रुपयांची वार्षिक पेन्शन सुरू केले. ती इसवी सन १८९५ पर्यंत सुरू होती. १८७४ मध्ये सिरोंचा तालुका चांदा जिल्ह्याचा भाग म्हणून संपर्कात आला. ब्रिटीश रेसीडेंट सिरोंचात राहून विभागाचे प्रशासकीय कारभार चालवित असायचे.विश्रामगृह देते ऐतिहासिक स्मृतींना उजाळासार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेली सिरोंचा येथील शासकीय विश्रामभवनाची दुमजली इमारत आजही ब्रिटिशकालीन स्मृतींना उजाळा देते. शिवाय गोदावरील व प्राणहिता नदीच्या संगमाचे विहंगम दृश्य तसेच श्री कालेश्वर-मुक्तेश्वर मंदिर हे धार्मिकतेचे प्रतीक आहे. सन १८६१ मध्ये मध्यप्रांतांची निर्मिती करण्यात आली असून चांदा जिल्हा व नागपूर विभाग त्यांना समाविष्ट केल्याचे नमूद केले आहे. चांदा जिल्ह्यात मूल, वरोरा व ब्रह्मपुरी या तीन नव्या तालुक्याची निर्मिती करण्यात आली.नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग नाहीसिरोंचा तालुक्यात जल, जमीन, जंगल व इतर नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. मात्र उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी या साधन संपत्तीचा अद्यापही परिपूर्ण उपयोग सरकारकडून झाल्याचे दिसून येत नाही. ब्रिटिश काळात जिल्ह्याचा दर्जा असलेल्या सध्याचा सिरोंचा तालुका विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली