शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शाळेच्या प्रवेशद्वारासमाेरच कचऱ्याचा ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST

वैरागड गावातील प्रमुख रस्त्यांपैकी करपडा हा एक रस्ता आहे. महात्मा जाेतिबा फुले चौक ते आदिशक्ती माता मंदिराकडे व पुढे ...

वैरागड गावातील प्रमुख रस्त्यांपैकी करपडा हा एक रस्ता आहे. महात्मा जाेतिबा फुले चौक ते आदिशक्ती माता मंदिराकडे व पुढे विहीरगाव घाटाकडे जाणारा हा रस्ता असून, येथून नेहमीच वर्दळ असते. रस्त्याच्या कडेला परिसरातील नागरिक आपल्या घरातील केरकचरा आणून टाकत असल्याने, शाळेसमोरच ढीग तयार झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हा कचरा इकडे तिकडे पसरून त्या ठिकाणी घाण तयार झाली आहे. सध्या या मार्गाने ये-जा करणे कठीण झाले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर निवासी आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम पडू शकतो. ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग त्याच ठिकाणी ठिकाणी विद्युत राेहित्र आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास कर्मचाऱ्यांना दुरुस्तीसाठी याच ढिगावर उभे राहून विद्युत दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे अंकुर आश्रमशाळेतील कर्मचारी व परिसरातील नागरिकांना हाेणारा त्रास लक्षात घेऊन कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

गाळ उपशावर खर्च, मात्र कचऱ्याकडे दुर्लक्ष

अंकुर आश्रमशाळेसमाेर कचरा टाकण्यावर प्रतिबंध घालावा, तसेच जमा झालेल्या कचऱ्याची उन्हाळ्यातच विल्हेवाट लावावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली होती, परंतु लाखो रुपये खर्च दाखवून नाल्या स्वच्छ करणाऱ्या ग्रामपंचायतीने कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट लावली नाही. गाळ उपशावर लाखाे रुपयांचा खर्च करण्यात आला, परंतु कचऱ्याचे ढीग कायम आहे. ढिगाच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास हाेत आहे.

230721\4406img_20210722_165111.jpg

शाळेसमोरील कचर्‍याचा ढीग