.सिनेमामधील सर्व युवक हे सिरोंचा शहरातील असून लहानपणापासून त्यांना सिनेमा बनविण्याची इच्छा होती. त्यामुळे हे युवक एकत्र येऊन सिनेमा बनवायच्या तयारीला लागले. सिनेमा बनवताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण ते आपल्या जिद्दीवर कायम राहले. शूटिंग सुरुवात ऑक्टोबर २०२०मध्ये केली. दि. १० मार्च रोजी हा सिनेमा रिलीज केला. सिनेमा डायरेक्टर लाजर बोलापली, प्रोड्यूसर अरुण तोकला , मुजीक कल्याण पेदापली याने दिले आहे. तर सिनेमाची कथा माही घरपट्टी यांनी लिहिली आहे. कलाकार म्हणून सुनील राजू घरपट्टी, कल्याणी दुर्गम (नायिका), संदीप मंचाला (खलनायक), महेंद्र घरपट्टी यांची मुख्य भूमिका या सिनेमात झळकत आहे. सिनेमाचे चित्रीकरण संपूर्ण सिरोंचा शहरातील विविध भागात झाले आहे. चित्रपटातील कथा एक प्रेम कथा असून नायक-नायिकांची भेट सुरुवातीला तेलंगाणातील मंदिरामध्ये होते. सिरोंचा शहरातील काॅलेजमधे शिक्षण घेताना दोघांमध्ये प्रेम जुळते. सिनेमामधील खलनायक नायिकेवर एकतर्फी प्रेम करीत असतो. पण ती त्याला सतत नकार देत असते, चित्रपटाच्या माध्यमातून युवकांना प्रेमाबाबतीत काय होईल या बाबतीत संदेश युवा पिढीला दिला आहे. हा सिनेमा दुसरा भाग असून पहिला भाग मागील वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपट प्रदर्शित करतेवळी महेश तिवारी, मोहमद इरफान हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सिराेंचातील युवकांची चित्रलिला युट्यूबवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST