शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

किडीच्या प्रादुर्भावाने पछाडले

By admin | Updated: September 27, 2015 00:59 IST

धान, सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

शेतकरी संकटात : धान, सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव; हाताशी आलेले पीक गेलेगडचिरोली : धान, सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली असून हाताशी आलेले पीक आता हातून जाण्याच्या विवंचनेने बळीराजा त्रस्त झाला आहे. यंदा पावसाने दगा दिल्यानंतरही शेतकऱ्याने कशीतरी रोवणी केली होती. परंतु धानपीक आता किडीमुळे पूर्णत: नष्ट झाले आहे. काही ठिकाणी पिकांमध्ये गुरांना चरण्यासाठी सोडून दिले आहे.जिल्ह्याच्या वडसा तालुक्यांमध्ये सावंगी, कोंढाळा, उसेगाव, तुळशी, विसोरा, शंकरपूर, कोकडी, फरीझरी, एकलपूर, चोप कोरेगाव, धानोरा तालुक्यातील चातगाव, कन्हाळगाव, खुर्सा, गिलगाव, बेडगाव, मुरमाडी, मुरूमबोडी, रांगी, मोहली, खेडी, सोडे, लेखामेंढा, पांढरसडा, दुधमाळा, आरमोरी तालुक्यातील कासवी, वैरागड, ठाणेगाव, सुकाळा, मोहझरी, शिवणी, मेंढेबोडी, करपळा, सिर्सी, देऊळगाव, शेगाव, डोंगरगाव, लोहारा, कोजबी, गणेशपूर, पेवठी (नवरगाव), इंजेवारी, गडचिरोली तालुक्यात अडपल्ली, गोगाव, माहदवाडी, कुराडी, चुरचुरा, नवरगाव, धुंडेशिवणी, कळमगाव टोला, पिपरटोला, अमिर्झा, चांभार्डा या भागासह दक्षिण व उत्तर गडचिरोली भागातील अनेक तालुक्यांमध्ये धानावर गादमाशी, खोडकीडा, करपा, लष्करीअळी, पाने गुंडाळणारी अळी, बेरडी, कडाकरपा या रोगांचा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाअभावी आधीच विलंबाने झालेली धानाची रोवणी आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात किडीचा झालेला प्रादुर्भाव यामुळे संपूर्ण नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. किड नियंत्रणासाठी शेतकरी पिकावर फवारणी करीत असले तरी त्याचा प्रभाव दिसूनच येत नाही, अशी माहिती या भागाचा दौरा करून आलेल्या लोकमत चमुला अनेक शेतकऱ्यांनी बोलताना दिली. यंदा विलंबाने आलेला पाऊस यामुळे दुष्काळी परिस्थिती होतीच परंतु त्यातही हाताशी आलेले पीक आता जात असल्याने शेतकऱ्याची स्थिती आता मोडण्याच्याच अवस्थेत असल्याचे आरमोरी, वडसा, धानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी विभागाचे अधिकारी आमच्या गावाकडे येऊन गेले. त्यांनी पिकांची पाहणी केली. परंतु त्यानंतर सांगितलेले उपाय केल्यानंतरही किड कमी झाली नाही, अशी माहिती शंकरपूर येथील शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. वडसा, आरमोरी तालुक्यात का आली कीड?वडसा, आरमोरी तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी इटियाडोह प्रकल्पाचे पाणी वापरून उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले. उन्हाळी धानाचे पीक साधारणत: मे, जून महिन्यात काढणीला काढण्यात आले. त्यानंतर लगेचच खरीप हंगामासाठी मशागत सुरू झाली. या कालावधीत बांधीमध्ये पाणी असल्याने गवत व जुन्या धानाची देठ कायम होती. त्यामुळे प्रमुख किडीचा जीवनक्रम सतत चालू राहील. परिणामी खरीप हंगामामध्ये किडीच्या वाढीकरिता पोषक असे वातावरण तयार होऊन या भागात किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हे एक प्रमुख कारण असल्याचे सोनापूर कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) डॉ. सुधीर बोरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.उशिरा रोवणीमुळे बेरडीचे आक्रमणगडचिरोली जिल्ह्यात यंदा पाऊस अनियमित स्वरूपात झाला. उशिरा धानाची लागवड झाली. धानपीकाची रोवणी जेवढी उशीरा व धान रोवणीला लागणाऱ्या पऱ्ह्यांचा कालावधी जर ५० ते ६० दिवसांचा असेल तर अशा ठिकाणी हमखास बेरडी व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. हीच परिस्थिती यंदा गडचिरोली जिल्ह्यात आहे. त्यामुळे बेरडीचेही प्रचंड आक्रमण झाल्याचे दिसून येत आहे.