शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
4
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
6
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
7
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
8
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
9
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
10
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
11
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
12
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
14
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
16
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
17
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
18
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
19
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
20
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर

किडीच्या प्रादुर्भावाने पछाडले

By admin | Updated: September 27, 2015 00:59 IST

धान, सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

शेतकरी संकटात : धान, सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव; हाताशी आलेले पीक गेलेगडचिरोली : धान, सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली असून हाताशी आलेले पीक आता हातून जाण्याच्या विवंचनेने बळीराजा त्रस्त झाला आहे. यंदा पावसाने दगा दिल्यानंतरही शेतकऱ्याने कशीतरी रोवणी केली होती. परंतु धानपीक आता किडीमुळे पूर्णत: नष्ट झाले आहे. काही ठिकाणी पिकांमध्ये गुरांना चरण्यासाठी सोडून दिले आहे.जिल्ह्याच्या वडसा तालुक्यांमध्ये सावंगी, कोंढाळा, उसेगाव, तुळशी, विसोरा, शंकरपूर, कोकडी, फरीझरी, एकलपूर, चोप कोरेगाव, धानोरा तालुक्यातील चातगाव, कन्हाळगाव, खुर्सा, गिलगाव, बेडगाव, मुरमाडी, मुरूमबोडी, रांगी, मोहली, खेडी, सोडे, लेखामेंढा, पांढरसडा, दुधमाळा, आरमोरी तालुक्यातील कासवी, वैरागड, ठाणेगाव, सुकाळा, मोहझरी, शिवणी, मेंढेबोडी, करपळा, सिर्सी, देऊळगाव, शेगाव, डोंगरगाव, लोहारा, कोजबी, गणेशपूर, पेवठी (नवरगाव), इंजेवारी, गडचिरोली तालुक्यात अडपल्ली, गोगाव, माहदवाडी, कुराडी, चुरचुरा, नवरगाव, धुंडेशिवणी, कळमगाव टोला, पिपरटोला, अमिर्झा, चांभार्डा या भागासह दक्षिण व उत्तर गडचिरोली भागातील अनेक तालुक्यांमध्ये धानावर गादमाशी, खोडकीडा, करपा, लष्करीअळी, पाने गुंडाळणारी अळी, बेरडी, कडाकरपा या रोगांचा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाअभावी आधीच विलंबाने झालेली धानाची रोवणी आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात किडीचा झालेला प्रादुर्भाव यामुळे संपूर्ण नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. किड नियंत्रणासाठी शेतकरी पिकावर फवारणी करीत असले तरी त्याचा प्रभाव दिसूनच येत नाही, अशी माहिती या भागाचा दौरा करून आलेल्या लोकमत चमुला अनेक शेतकऱ्यांनी बोलताना दिली. यंदा विलंबाने आलेला पाऊस यामुळे दुष्काळी परिस्थिती होतीच परंतु त्यातही हाताशी आलेले पीक आता जात असल्याने शेतकऱ्याची स्थिती आता मोडण्याच्याच अवस्थेत असल्याचे आरमोरी, वडसा, धानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी विभागाचे अधिकारी आमच्या गावाकडे येऊन गेले. त्यांनी पिकांची पाहणी केली. परंतु त्यानंतर सांगितलेले उपाय केल्यानंतरही किड कमी झाली नाही, अशी माहिती शंकरपूर येथील शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. वडसा, आरमोरी तालुक्यात का आली कीड?वडसा, आरमोरी तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी इटियाडोह प्रकल्पाचे पाणी वापरून उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले. उन्हाळी धानाचे पीक साधारणत: मे, जून महिन्यात काढणीला काढण्यात आले. त्यानंतर लगेचच खरीप हंगामासाठी मशागत सुरू झाली. या कालावधीत बांधीमध्ये पाणी असल्याने गवत व जुन्या धानाची देठ कायम होती. त्यामुळे प्रमुख किडीचा जीवनक्रम सतत चालू राहील. परिणामी खरीप हंगामामध्ये किडीच्या वाढीकरिता पोषक असे वातावरण तयार होऊन या भागात किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हे एक प्रमुख कारण असल्याचे सोनापूर कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) डॉ. सुधीर बोरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.उशिरा रोवणीमुळे बेरडीचे आक्रमणगडचिरोली जिल्ह्यात यंदा पाऊस अनियमित स्वरूपात झाला. उशिरा धानाची लागवड झाली. धानपीकाची रोवणी जेवढी उशीरा व धान रोवणीला लागणाऱ्या पऱ्ह्यांचा कालावधी जर ५० ते ६० दिवसांचा असेल तर अशा ठिकाणी हमखास बेरडी व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. हीच परिस्थिती यंदा गडचिरोली जिल्ह्यात आहे. त्यामुळे बेरडीचेही प्रचंड आक्रमण झाल्याचे दिसून येत आहे.