शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पेसा ग्रामपंचायतींना सहा कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:46 IST

पेसा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतींना पाच टक्के थेट निधी योजनेंतर्गत सुमारे ६ कोटी १२ लाख ७२ हजार रुपयांचा निधी आरटीजीएसद्वारे ग्रामकोष समितीच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपाच टक्के थेट निधी योजना : प्रती व्यक्ती १८१ रुपये मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पेसा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतींना पाच टक्के थेट निधी योजनेंतर्गत सुमारे ६ कोटी १२ लाख ७२ हजार रुपयांचा निधी आरटीजीएसद्वारे ग्रामकोष समितीच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.राज्य शासन दरवर्षी पेसा ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेच्या नियतव्ययाच्या पाच टक्के निधी उपलब्ध करून देते. २०१८-१९ या वर्षातील दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्यात आला आहे. धानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ६१ ग्रामपंचायतीमधील २१८ गावे, कुरखेडा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीमधील ११९ गावे, कोरची तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीमधील १२० गावे, गडचिरोली पंचायत समिती क्षेत्रातील २० ग्रामपंचायतीमधील ४९ गावे, आरमोरी पंचायत समिती क्षेत्रातील १६ ग्रामपंचायतीमधील ४९ गावे, चामोर्शी तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीमधील ७४ गावे, देसाईगंज पंचायत समिती क्षेत्रातील सहा ग्रामपंचायतीमधील आठ गावे, सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीमधील ११३ गावे, अहेरी पंचायत समितीमधील ३९ ग्रामपंचायतीमधील १५० गावे, मुलचेरा पंचायत समिती क्षेत्रातील ११ गावांमधील ३७ गावे, भामरागड पंचायत समितीमधील १९ ग्रामपंचायतीमधील १०० गावे, एटापल्ली पंचायत समितीमधील ३१ ग्रामपंचायतीमधील १८० गावांच्या ग्रामकोष समितीच्या बँक खात्यात निधी जमा केला जाणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतीत मोडणाºया ३ लाख ३७ हजार २५ एवढ्या आदिवासी लोकसंख्येकरिता दरडोई १८१.८०४६ रुपये याप्रमाणे ६ कोटी १२ लाख ७२ हजार रुपयांचा निधी करून देण्यात आला आहे.पेसा अंतर्गत प्राप्त होणारा निधी कोणत्या बाबीवर खर्च करावा, याचे पूर्ण अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामसभा आपल्या गावाची गरज लक्षात घेऊन सदर निधी खर्च करतात. त्यामुळे गावकऱ्यांची नेमकी गरज पूर्ण होण्यास मदत होते.मनुष्यबळ विकासावर खर्चाची अपेक्षाग्रामसभांना प्राप्त होणारा निधी खर्च करण्याचा अधिकार पूर्णपणे ग्रामसभांना आहे. बहुतांश ग्रामसभा या निधीचे नियोजन करताना केवळ बांधकामावर भर देतात. नाल्या, रस्ते बांधण्यासाठी शासनाकडून विविध योजनांतर्गत निधी प्राप्त होतोच. त्यामुळे पेसाचा निधी नाल्या, रस्ते, पूल, मोरी बांधकामावर खर्च न करता तो गावातील मनुष्यबळाचा विकास होईल, अशा साधनांवर खर्च करणे आवश्यक आहे. गावातील युवक, विद्यार्थी यांना विविध सुविधा पुरविणे, महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देणे, त्यासाठी प्रशिक्षण आयोजित करणे या बाबीवर खर्च करता येते शक्य आहे. मात्र फारच कमी ग्रामसभा या महत्त्वाच्या बाबीवर खर्च करीत असल्याचे दिसून येते.वर्ष संपल्यावर मिळाला निधीपेसा अंतर्गतच्या ग्रामसभांना आदिवासी उपयोजनेच्या एकूण नियतव्ययाच्या पाच टक्के निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने २१ एप्रिल २०१५ रोजी घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी तेवढा निधी द्यावाच लागतो. मात्र याचे नियोजन करण्यात राज्य शासन कमजोर पडत आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा निधी आर्थिक वर्ष संपून एक महिन्याचा कालावधी झाल्यानंतर मिळाला आहे. जून महिन्यापासून शेतीची कामे सुरू होतात. त्यामुळे या कालावधीत नियोजन करणे शक्य होत नाही. परिणामी हा निधी अनेक महिने ग्रामसभेकडेही पडून राहतो. राज्य शासनाने सदर निधी वेळेवर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत