शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

पेसा ग्रामपंचायतींना सहा कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:46 IST

पेसा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतींना पाच टक्के थेट निधी योजनेंतर्गत सुमारे ६ कोटी १२ लाख ७२ हजार रुपयांचा निधी आरटीजीएसद्वारे ग्रामकोष समितीच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपाच टक्के थेट निधी योजना : प्रती व्यक्ती १८१ रुपये मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पेसा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतींना पाच टक्के थेट निधी योजनेंतर्गत सुमारे ६ कोटी १२ लाख ७२ हजार रुपयांचा निधी आरटीजीएसद्वारे ग्रामकोष समितीच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.राज्य शासन दरवर्षी पेसा ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेच्या नियतव्ययाच्या पाच टक्के निधी उपलब्ध करून देते. २०१८-१९ या वर्षातील दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्यात आला आहे. धानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ६१ ग्रामपंचायतीमधील २१८ गावे, कुरखेडा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीमधील ११९ गावे, कोरची तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीमधील १२० गावे, गडचिरोली पंचायत समिती क्षेत्रातील २० ग्रामपंचायतीमधील ४९ गावे, आरमोरी पंचायत समिती क्षेत्रातील १६ ग्रामपंचायतीमधील ४९ गावे, चामोर्शी तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीमधील ७४ गावे, देसाईगंज पंचायत समिती क्षेत्रातील सहा ग्रामपंचायतीमधील आठ गावे, सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीमधील ११३ गावे, अहेरी पंचायत समितीमधील ३९ ग्रामपंचायतीमधील १५० गावे, मुलचेरा पंचायत समिती क्षेत्रातील ११ गावांमधील ३७ गावे, भामरागड पंचायत समितीमधील १९ ग्रामपंचायतीमधील १०० गावे, एटापल्ली पंचायत समितीमधील ३१ ग्रामपंचायतीमधील १८० गावांच्या ग्रामकोष समितीच्या बँक खात्यात निधी जमा केला जाणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतीत मोडणाºया ३ लाख ३७ हजार २५ एवढ्या आदिवासी लोकसंख्येकरिता दरडोई १८१.८०४६ रुपये याप्रमाणे ६ कोटी १२ लाख ७२ हजार रुपयांचा निधी करून देण्यात आला आहे.पेसा अंतर्गत प्राप्त होणारा निधी कोणत्या बाबीवर खर्च करावा, याचे पूर्ण अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामसभा आपल्या गावाची गरज लक्षात घेऊन सदर निधी खर्च करतात. त्यामुळे गावकऱ्यांची नेमकी गरज पूर्ण होण्यास मदत होते.मनुष्यबळ विकासावर खर्चाची अपेक्षाग्रामसभांना प्राप्त होणारा निधी खर्च करण्याचा अधिकार पूर्णपणे ग्रामसभांना आहे. बहुतांश ग्रामसभा या निधीचे नियोजन करताना केवळ बांधकामावर भर देतात. नाल्या, रस्ते बांधण्यासाठी शासनाकडून विविध योजनांतर्गत निधी प्राप्त होतोच. त्यामुळे पेसाचा निधी नाल्या, रस्ते, पूल, मोरी बांधकामावर खर्च न करता तो गावातील मनुष्यबळाचा विकास होईल, अशा साधनांवर खर्च करणे आवश्यक आहे. गावातील युवक, विद्यार्थी यांना विविध सुविधा पुरविणे, महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देणे, त्यासाठी प्रशिक्षण आयोजित करणे या बाबीवर खर्च करता येते शक्य आहे. मात्र फारच कमी ग्रामसभा या महत्त्वाच्या बाबीवर खर्च करीत असल्याचे दिसून येते.वर्ष संपल्यावर मिळाला निधीपेसा अंतर्गतच्या ग्रामसभांना आदिवासी उपयोजनेच्या एकूण नियतव्ययाच्या पाच टक्के निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने २१ एप्रिल २०१५ रोजी घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी तेवढा निधी द्यावाच लागतो. मात्र याचे नियोजन करण्यात राज्य शासन कमजोर पडत आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा निधी आर्थिक वर्ष संपून एक महिन्याचा कालावधी झाल्यानंतर मिळाला आहे. जून महिन्यापासून शेतीची कामे सुरू होतात. त्यामुळे या कालावधीत नियोजन करणे शक्य होत नाही. परिणामी हा निधी अनेक महिने ग्रामसभेकडेही पडून राहतो. राज्य शासनाने सदर निधी वेळेवर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत