शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीतील जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सव कुणाच्या परवानगीने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:58 IST

गेल्या ९ व १० डिसेंबरला चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा शताब्दी महोत्सव कुणाच्या परवानगीने घेतला? हा महोत्सव शाळेच्या सन्मानासाठी होता की आमदारांच्या गवागव्यासाठी?

ठळक मुद्देज्येष्ठ सदस्यांचा सवाल : स्थायी समितीत गाजला देणगी वसुलीचा घोळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या ९ व १० डिसेंबरला चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा शताब्दी महोत्सव कुणाच्या परवानगीने घेतला? हा महोत्सव शाळेच्या सन्मानासाठी होता की आमदारांच्या गवागव्यासाठी? असे प्रश्न उपस्थित करीत या महोत्सवासाठी संकलित करण्यात आलेल्या निधीत घोळ झाला, त्याची चौकशी करा अशी मागणी बुधवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली. यामुळे जि.प.च्या वर्तुळात खळबळ उडाली. शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सभागृहात सांगितले.ज्येष्ठ सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केल्यानंतर माजी सभापती अतुल गण्यारपवार यांनी या शताब्दी महोत्सवावरून चांगलाच संताप व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या शाळेचा शताब्दी महोत्सव असताना त्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेण्याची गरज नव्हती का? ती घेतली का? असे प्रश्न केल्यानंतर शिक्षणाधिकारी ओ.बी. गुढे यांनी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय शाळा व्यवस्थापन समिती आयोजक म्हणून असणे गरजेचे असताना आमदार डॉ.देवराव होळी यांनी स्वत:चे नाव आयोजक म्हणून टाकून स्वत:चा गवगवा केला. बीडीओ, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनाही हेतूपुरस्सर डावलल्याचा आरोप गण्यारपवार यांनी केला.लाखोंच्या देणग्या गेल्या कुठे?विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी काही अधिकाऱ्यांकडून लाखो रुपयांची देणगी गोळा करण्यात आली. पण प्रत्यक्ष शाळेची साधी रंगरंगोटीही करण्यात आली नाही किंवा शाळेतील सुविधांसाठी कोणताही हातभार लावला नाही. मग गोळा केलेल्या लाखो रुपयांच्या देणग्या कुठे गेल्या? त्याचा हिशेब सादर करावा, अशी मागणी अतुल गण्यारपवार यांनी केली.विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या माजी विद्यार्थ्यांना डावललेशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने सदर जि.प.शाळेत शिकलेल्या आणि विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव होणे अपेक्षित होते. त्यात प्रामुख्याने माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, स्थानिक जि.प.सदस्य तथा बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारवार, माजी सभापती गंगाधरराव गण्यारपवार यांच्यासह अनेक डॉक्टर, अभियंते, उद्योजक या शाळेत शिकलेले आहेत. पण कोणालाही कार्यक्रमाचे साधे निमंत्रणसुद्धा दिल्या गेले नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.