शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

चामोर्शीतील जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सव कुणाच्या परवानगीने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:58 IST

गेल्या ९ व १० डिसेंबरला चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा शताब्दी महोत्सव कुणाच्या परवानगीने घेतला? हा महोत्सव शाळेच्या सन्मानासाठी होता की आमदारांच्या गवागव्यासाठी?

ठळक मुद्देज्येष्ठ सदस्यांचा सवाल : स्थायी समितीत गाजला देणगी वसुलीचा घोळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या ९ व १० डिसेंबरला चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा शताब्दी महोत्सव कुणाच्या परवानगीने घेतला? हा महोत्सव शाळेच्या सन्मानासाठी होता की आमदारांच्या गवागव्यासाठी? असे प्रश्न उपस्थित करीत या महोत्सवासाठी संकलित करण्यात आलेल्या निधीत घोळ झाला, त्याची चौकशी करा अशी मागणी बुधवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली. यामुळे जि.प.च्या वर्तुळात खळबळ उडाली. शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सभागृहात सांगितले.ज्येष्ठ सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केल्यानंतर माजी सभापती अतुल गण्यारपवार यांनी या शताब्दी महोत्सवावरून चांगलाच संताप व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या शाळेचा शताब्दी महोत्सव असताना त्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेण्याची गरज नव्हती का? ती घेतली का? असे प्रश्न केल्यानंतर शिक्षणाधिकारी ओ.बी. गुढे यांनी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय शाळा व्यवस्थापन समिती आयोजक म्हणून असणे गरजेचे असताना आमदार डॉ.देवराव होळी यांनी स्वत:चे नाव आयोजक म्हणून टाकून स्वत:चा गवगवा केला. बीडीओ, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनाही हेतूपुरस्सर डावलल्याचा आरोप गण्यारपवार यांनी केला.लाखोंच्या देणग्या गेल्या कुठे?विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी काही अधिकाऱ्यांकडून लाखो रुपयांची देणगी गोळा करण्यात आली. पण प्रत्यक्ष शाळेची साधी रंगरंगोटीही करण्यात आली नाही किंवा शाळेतील सुविधांसाठी कोणताही हातभार लावला नाही. मग गोळा केलेल्या लाखो रुपयांच्या देणग्या कुठे गेल्या? त्याचा हिशेब सादर करावा, अशी मागणी अतुल गण्यारपवार यांनी केली.विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या माजी विद्यार्थ्यांना डावललेशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने सदर जि.प.शाळेत शिकलेल्या आणि विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव होणे अपेक्षित होते. त्यात प्रामुख्याने माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, स्थानिक जि.प.सदस्य तथा बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारवार, माजी सभापती गंगाधरराव गण्यारपवार यांच्यासह अनेक डॉक्टर, अभियंते, उद्योजक या शाळेत शिकलेले आहेत. पण कोणालाही कार्यक्रमाचे साधे निमंत्रणसुद्धा दिल्या गेले नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.