शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

क्रांतिदिनी जिल्ह्यात उसळला होता जनक्षोभ

By admin | Updated: August 9, 2015 01:35 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या १८५७ च्या उठावाला पहिले स्वातंत्र्य समर संबोधले त्या स्वातंत्र्य समरादरम्यान वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांनी इंग्रजांना सळो की, पळो...

क्रांती दिन विशेषगडचिरोली : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या १८५७ च्या उठावाला पहिले स्वातंत्र्य समर संबोधले त्या स्वातंत्र्य समरादरम्यान वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांनी इंग्रजांना सळो की, पळो करून सोडले होते. या थोर आदिवासी क्रांती पुरूषाची प्रेरणा घेऊन गडचिरोली जिल्ह्यातही क्रांतिदिनी जनक्षोभ उसळला होता. स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांशी झुंजणारे स्वातंत्र्य सैनिक स्व. मारोतरावजी नरोटे यांचे स्मारक गडचिरोली शहरातील त्रिमूर्ती चौकात आहे. शहरातील गांधी चौकातील ‘जयस्तंभ’ सुध्दा भारताच्या स्वातंत्र्यात जिल्ह्यातील विरांनी दिलेल्या योगदानाची साक्ष अजूनही देत आहे. या स्मारकांमुळे जिल्ह्यातील पिढींना प्रेरणा मिळत आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या जिल्ह्याच्या सुपुत्रांना कायम स्मरणात ठेवता यावे, हा यामागील उद्देश आहे. चांद्यातील ब्रिटिशविरोधी क्रांतीची आग गडचिरोलीतही पोहोचली होती. येथील जगन्नाथ शंखदरवार आणि मारोतराव नरोटे या लढ्यात अग्रणी होते. ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी चांगलीच झुंज दिली. याशिवाय मोतिराम वाणी, विठ्ठल गुड्डेवार, जाफरभाई, शंकरराव झोटिंग, जे. टी. पाटील म्हशाखेत्री, मुराभाई, धोंडबा खडसे, पाराशर असे अनेक स्वातंत्र्य सैनिक त्या काळात सक्रिय होते. आरमोरी येथील थोर स्वातंत्र्य सेनानी कृ. व्यं. ताडुरवार गुरूजी यांनीही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. आरमोरीतील पहिले शिक्षक होण्याचा मान त्यांना मिळाला. आपल्या क्षेत्राचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधीही त्यांना मिळाली. त्यांचा जन्म १ जानेवारी १९१६ मध्ये झाला. तर त्यांचे निधन १८ मार्च १९६० रोजी झाले. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन आरमोरी येथील पंचायत समितीच्या बाजुला १ जानेवारी १९९८ मध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. (शहर प्रतिनिधी)