शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

क्रांतिदिनी जिल्ह्यात उसळला होता जनक्षोभ

By admin | Updated: August 9, 2015 01:35 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या १८५७ च्या उठावाला पहिले स्वातंत्र्य समर संबोधले त्या स्वातंत्र्य समरादरम्यान वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांनी इंग्रजांना सळो की, पळो...

क्रांती दिन विशेषगडचिरोली : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या १८५७ च्या उठावाला पहिले स्वातंत्र्य समर संबोधले त्या स्वातंत्र्य समरादरम्यान वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांनी इंग्रजांना सळो की, पळो करून सोडले होते. या थोर आदिवासी क्रांती पुरूषाची प्रेरणा घेऊन गडचिरोली जिल्ह्यातही क्रांतिदिनी जनक्षोभ उसळला होता. स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांशी झुंजणारे स्वातंत्र्य सैनिक स्व. मारोतरावजी नरोटे यांचे स्मारक गडचिरोली शहरातील त्रिमूर्ती चौकात आहे. शहरातील गांधी चौकातील ‘जयस्तंभ’ सुध्दा भारताच्या स्वातंत्र्यात जिल्ह्यातील विरांनी दिलेल्या योगदानाची साक्ष अजूनही देत आहे. या स्मारकांमुळे जिल्ह्यातील पिढींना प्रेरणा मिळत आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या जिल्ह्याच्या सुपुत्रांना कायम स्मरणात ठेवता यावे, हा यामागील उद्देश आहे. चांद्यातील ब्रिटिशविरोधी क्रांतीची आग गडचिरोलीतही पोहोचली होती. येथील जगन्नाथ शंखदरवार आणि मारोतराव नरोटे या लढ्यात अग्रणी होते. ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी चांगलीच झुंज दिली. याशिवाय मोतिराम वाणी, विठ्ठल गुड्डेवार, जाफरभाई, शंकरराव झोटिंग, जे. टी. पाटील म्हशाखेत्री, मुराभाई, धोंडबा खडसे, पाराशर असे अनेक स्वातंत्र्य सैनिक त्या काळात सक्रिय होते. आरमोरी येथील थोर स्वातंत्र्य सेनानी कृ. व्यं. ताडुरवार गुरूजी यांनीही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. आरमोरीतील पहिले शिक्षक होण्याचा मान त्यांना मिळाला. आपल्या क्षेत्राचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधीही त्यांना मिळाली. त्यांचा जन्म १ जानेवारी १९१६ मध्ये झाला. तर त्यांचे निधन १८ मार्च १९६० रोजी झाले. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन आरमोरी येथील पंचायत समितीच्या बाजुला १ जानेवारी १९९८ मध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. (शहर प्रतिनिधी)