शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकाभिमुख योजनांची जागृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

माहिती व प्रसारण मंत्रालय पुणे येथील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोद्वारा गडचिरोली येथील गोंडवन कलादालनात सांस्कृतिक कलाकारांसाठी शुक्रवारी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : गोंडवन कला दालनात केंद्र सरकारच्या योजनांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना तळागळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती करावी, असा सूर सीआरपीएफ १९१ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी यांच्यासह मान्यवरांनी काढला.माहिती व प्रसारण मंत्रालय पुणे येथील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोद्वारा गडचिरोली येथील गोंडवन कलादालनात सांस्कृतिक कलाकारांसाठी शुक्रवारी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यशाळेला सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट जियाऊ सिंह, प्रादेशिक लोकसंपर्क संचालक संतोष अजमेरा, द्वितीय कमान अधिकारी टी.के.सोलंकी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्यवक अमित पुंडे उपस्थित होते. प्रास्ताविकातून संतोष अजमेरा यांनी तळागळातील लोकांचा विकास साधण्यासाठी लोक कलावंतांनी स्थानिकांचा विश्वास संपादन करून आपल्या उद्बोधन व प्रबोधन कार्यक्रमादरम्यान पोटतिडकीने कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्याचे काम करावे, असे सांगितले. जिल्ह्याच्या सर्व घटकातील लोकांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत त्यांच्याच भाषेत माहिती पोहोचविणे गरजेचे आहे. तेव्हाच ग्रामीण व दुर्गम भागातील विकास साधता येईल, असे मत टी.के.सोलंकी यांनी व्यक्त केले.याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी जिल्ह्यात सात स्थानिक भाषा बोलल्या जातात, असे सांगितले. यावेळी शांतीलाल सेता, अमित पुंडे व गुरूदास सेमस्कर यांनीही मार्गदर्शन केले. संचालन ब्युरोचे व्यवस्थापक किरण भुजभळ व पंकज दाभाडे व आभार क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी मानले.सात संच करणार योजनांबाबत प्रबोधनगडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यांमधील गावांमध्ये जाऊन केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती देण्यासाठी जवळपास १०० कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सांस्कृतिक कलाकारांचे सात संच नेमण्यात आले आहेत. संचाद्वारे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन नागरिकांना शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली जाईल. तसेच या योजनांचे स्वरूप, व्याप्ती सांगून त्यांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित सुद्धा केले जाणार आहे. अशाप्रकारे कलाकारांचे संच काम करणार आहेत.