शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

लोकाभिमुख योजनांची जागृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

माहिती व प्रसारण मंत्रालय पुणे येथील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोद्वारा गडचिरोली येथील गोंडवन कलादालनात सांस्कृतिक कलाकारांसाठी शुक्रवारी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : गोंडवन कला दालनात केंद्र सरकारच्या योजनांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना तळागळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती करावी, असा सूर सीआरपीएफ १९१ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी यांच्यासह मान्यवरांनी काढला.माहिती व प्रसारण मंत्रालय पुणे येथील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोद्वारा गडचिरोली येथील गोंडवन कलादालनात सांस्कृतिक कलाकारांसाठी शुक्रवारी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यशाळेला सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट जियाऊ सिंह, प्रादेशिक लोकसंपर्क संचालक संतोष अजमेरा, द्वितीय कमान अधिकारी टी.के.सोलंकी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्यवक अमित पुंडे उपस्थित होते. प्रास्ताविकातून संतोष अजमेरा यांनी तळागळातील लोकांचा विकास साधण्यासाठी लोक कलावंतांनी स्थानिकांचा विश्वास संपादन करून आपल्या उद्बोधन व प्रबोधन कार्यक्रमादरम्यान पोटतिडकीने कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्याचे काम करावे, असे सांगितले. जिल्ह्याच्या सर्व घटकातील लोकांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत त्यांच्याच भाषेत माहिती पोहोचविणे गरजेचे आहे. तेव्हाच ग्रामीण व दुर्गम भागातील विकास साधता येईल, असे मत टी.के.सोलंकी यांनी व्यक्त केले.याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी जिल्ह्यात सात स्थानिक भाषा बोलल्या जातात, असे सांगितले. यावेळी शांतीलाल सेता, अमित पुंडे व गुरूदास सेमस्कर यांनीही मार्गदर्शन केले. संचालन ब्युरोचे व्यवस्थापक किरण भुजभळ व पंकज दाभाडे व आभार क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी मानले.सात संच करणार योजनांबाबत प्रबोधनगडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यांमधील गावांमध्ये जाऊन केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती देण्यासाठी जवळपास १०० कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सांस्कृतिक कलाकारांचे सात संच नेमण्यात आले आहेत. संचाद्वारे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन नागरिकांना शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली जाईल. तसेच या योजनांचे स्वरूप, व्याप्ती सांगून त्यांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित सुद्धा केले जाणार आहे. अशाप्रकारे कलाकारांचे संच काम करणार आहेत.