शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

हा तर कमलापूर हत्ती कॅम्प बंद करण्याचाच डाव.. स्थलांतरणावरून पुन्हा नागरिकांमध्ये वाढतोय रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2022 12:52 IST

हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बंदिस्त संग्रहालयात नेणे हा हत्ती कॅम्प बंद करण्याचाच डाव असून, तो हाणून पाडा, अशी जनभावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसर्व स्तरातून होत आहे हत्तींना रोखण्याची मागणी

गडचिरोली : कोणतीही गरज नसताना राज्यातील एकमेव हत्ती कॅम्पसह पातानील व ताडोबातील बहुतांश हत्ती गुजरातला पाठविण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये पुन्हा असंतोष वाढत आहे. हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बंदिस्त संग्रहालयात नेणे हा हत्ती कॅम्प बंद करण्याचाच डाव असून, तो हाणून पाडा, अशी जनभावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये हत्तींच्या स्थलांतराबाबत पहिले पत्र आल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातून विरोधाचा सूर आळवला गेला. त्यामुळे हत्तींना गुजरातला हलविण्याचा निर्णय स्थगित ठेवला होता; पण आता पुन्हा हत्ती हलविण्याचे पत्र पाठविल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष वाढला आहे. गडचिरोली जिल्हाच नाही, तर महाराष्ट्राचे हे वनवैभव वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हत्ती कॅम्पमधील पर्यटकांचा वावर वाढल्यामुळे नक्षली कारवायादेखील कमी झाल्या आहेत. येथील नागरिकांना नवा रोजगार मिळाला आहे. पुढे जसजशा सोयी वाढतील तसतसे पर्यटक वाढून रोजगारही वाढेल. असे असताना हत्ती कॅम्प पर्यटनाच्या दृष्टीने वाढविण्याचे सोडून या हत्तींना गुजरातमध्ये नेण्याचा डाव जनता यशस्वी होऊ देणार नाही, अशी भावना युवक काँग्रेसचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. प्रणितकुमार जांभुळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केली.

हत्ती पोसणे जड झाले का?

उद्योगविरहित, पण निसर्गसौंदर्याने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हत्ती कॅम्प हे प्रमुख आकर्षण आहे. जसजसी या हत्ती कॅम्पची माहिती मिळत आहे तसतसा महाराष्ट्र, तेलंगणातील पर्यटकांचा औढा हत्ती कॅम्पकडे वाढत आहे. अशा स्थितीत हत्तींच्या सोयीसुविधा, वैद्यकीय तपासण्या, देखभालीकडे विशेष लक्ष देण्याऐवजी या हत्तींना दुसऱ्या राज्यात पाठविणे म्हणजे आम्ही ते हत्ती पोसण्यासाठी सक्षम नाही, असा जणू संदेश वन्यजीव विभागाची यंत्रणा आणि राज्य शासन देऊ पाहत आहे का, असा संतप्त सवालही अनेकांनी व्यक्त केला.

- तर लोक रस्त्यावर उतरतील

कमलापूर हत्ती कॅम्प हे राज्यासह जिल्ह्याचे वैभव आहे. येथील नागरिकांचे या परिसराशी भावनिक नाते जुळले आहे. त्यामुळे हत्ती स्थलांतर होणार या बातमीने अनेकांमध्ये असंतोषाचे वातावरण बघायला मिळत आहे. समाजमाध्यमांवर त्याचे पडसाद उमटत आहे. जनभावनेचा आदर न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

पुन्हा नक्षल्यांचे माहेरघर बनवू नका

कधीकाळी नक्षल्यांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या कमलापूरला आता हत्तींमुळे नवीन ओळख मिळाली आहे. अशा स्थितीत हत्तींना येथून हलविणे म्हणजे पुन्हा हा परिसर नक्षल्यांच्या ताब्यात येण्यासारखे आहे. कमलापूरला पुन्हा नक्षल्यांचे माहेरघर बनवू नका, त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हत्ती कॅम्प वाचवावा, अशी भावना जिल्हा युवा पुरस्कारप्राप्त समाजिक कार्यकर्ते अनुप कोहळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Governmentसरकारforest departmentवनविभागgadchiroli-acगडचिरोली