शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

मुलचेरा, गोलाकर्जीत नागरिकांनी केला ‘रास्ता रोको’

By admin | Updated: September 30, 2016 01:31 IST

मुलचेरा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावाव्या, या मागणीसाठी अब्दुल जमीर हकीम यांच्या नेतृत्वात

रस्ता व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन : आलापल्ली-सिरोंचा मार्गावर वाहतूक ठप्पमुलचेरा/राजाराम खांदला : मुलचेरा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावाव्या, या मागणीसाठी अब्दुल जमीर हकीम यांच्या नेतृत्वात मुलचेरा येथील सुभाषचंद्र चौकात गुरूवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर अहेरी तालुक्यातील गोलाकर्जी परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष जमीर हकीम यांच्या नेतृत्वात सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील गोलाकर्जी येथे गुरूवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनदरम्यान सुमारे तीन तास वाहतूक ठप्प पडली होती. मुलचेरा तालुक्यातील रस्त्यांची दुरूस्ती करावी, अतिक्रमणधारकांना वनपट्ट्यांचे वितरण करावे, चेन्ना सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करावे, मुखडी ग्रामपंचायत, आंबटपल्ली ग्रामपंचायत व गोविंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्व गावांचे सर्वेक्षण करून ताबडतोब उपसा जलसिंचन योजना मंजूर करावी, प्राथमिक आरोग्य केंद्र सुंदरनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीत हलविण्यात यावे, वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असून वन विभागाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर ते मुखडी फाटा, मोहुर्ली ते कोठारी, कोठारी ते कांचनपूर, भगतनगर ते सुंदरनगर रस्त्यांची दुरूस्ती मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात यावी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मुलचेरा तालुक्यातील एकही रस्ता समाविष्ट करण्यात आला नाही. मुलचेरा येथे बसस्थानक निर्माण करावे, मुलचेरा ते मार्र्कंडा, मुलचेरा-कोपरअल्ली-अंबेला-घोट, मुलचेरा ते एटापल्ली, कोपरअल्ली चेक ते शांतीग्राम, मुलचेरा ते कुदीरामपल्ली मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी आदी मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रशासनातर्फे नायब तहसीलदार पठाण, पोलीस अधिकारी ठाकरे, वनाधिकारी मढेवार, एसटी विभागाचे राकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे भुजने, आरोग्य विभागाचे डॉ. काकडे उपस्थित होते. आंदोलनादरम्यान मुलचेराचे नगराध्यक्ष सुभाष आत्राम, उपाध्यक्ष देवा चौधरी, दीपक परचाके, नामदेव कुसनाके, माजी सरपंच रणजीत स्वर्णकार, नीलकमल मंडल, उमेश पेडुकर, युद्धिष्ठीर बिश्वास, टिल्लू मुखर्जी, लतीफ शेख, गणपत मडावी, ईश्वर मडावी, शैलेश खराती, निकुले, विष्णू रॉय, तपन पांडे, सुबोल बिश्वास, निखील इज्जतदार, मनोज कर्मकार, सुभाष पटेल, सुरेंद्र अलोणे, अप्पू मुजुमदार यांच्यासह शेकडो गावकरी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)