शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज तलाठी कार्यालयात अर्थ सहाय्य योजनेची प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: April 25, 2016 01:19 IST

कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे आकस्मिक निधन झाल्यास सदर कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत २० हजार रूपयांची आर्थिक मदत दिली जाते.

चार महिने उलटले : लाभार्थ्यांच्या कार्यालयात हेलपाटादेसाईगंज : कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे आकस्मिक निधन झाल्यास सदर कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत २० हजार रूपयांची आर्थिक मदत दिली जाते. याकरिता स्थानिक पातळीवर तलाठी कार्यालयातून कार्यवाही होणे गरजेचे असते. त्याशिवाय प्रकरणे पुढे रेटली जात नाही. परंतु याउलट स्थिती असल्याचे देसाईगंज तलाठी कार्यालयात दिसून आले आहे. चार महिन्यापासून लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहे. परिणामी लाभार्थी कार्यालयाच्या हेलपाटा मारत आहेत.देसाईगंज येथील किदवाई वॉर्डातील दारिद्र्य रेषेखालील कमावत्या व्यक्तीचे निधन झाले. परिणामी त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असल्याने तलाठी कार्यालयात सदर प्रकरण १४ जानेवारी २०१६ ला दाखल करण्यात आले. तलाठ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित कुटुंबातील व्यक्ती दोनदा तलाठी कार्यालयात कार्यवाहीसाठी हजरही झाली. परंतु प्रकरण पुढे रेटण्यात आले नाही. तलाठी व कोतवालांकडून आज या, उद्या या अशी बोळवण करण्यात आली. सध्या प्रकरण दाखल केल्याचा घटनेला चार महिने उलटले आहेत. परंतु संबंधित लाभार्थ्याला अद्यापही शासनाकडून आर्थिक मदत मिळालेली नाही. प्रकरण तलाठी कार्यालयातच धूळखात ठेवण्यात आले आहे. या कार्यालयात इतरही प्रकरणे अशाच प्रकारे धूळखात ठेवण्यात आली, अशी माहिती आहे. तलाठी कार्यालयास अशा प्रकारे प्रकरणे प्रलंबित ठेवत असतील तर मदत कशी मिळणार, असा सवाल करीत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राकाँ अल्पसंख्य आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अ. लतीफ शेख यांनी केली आहे.