शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

निकृष्ट बंधाऱ्याची पूर्ण रक्कम अदा

By admin | Updated: June 12, 2016 01:14 IST

जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग या विभागाकडून चंदनवेली येथे आदिवासी उपयोजनेंतर्गत जलशिवार योजना पाणी साठवण बंधारा बांधण्यात आला.

चंदनवेली येथील बंधारा : ग्रामपंचायतीचे दुर्लक्षएटापल्ली : जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग या विभागाकडून चंदनवेली येथे आदिवासी उपयोजनेंतर्गत जलशिवार योजना पाणी साठवण बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ठ आहे. त्यामुळे क्वालिटी कंट्रोल विभागाकडून याची चौकशी करावी, अशी मागणी दीपक वैद्य यांनी केली आहे. चंदनवेली येथे बंधारा बांधकामासाठी १५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून बंधाऱ्याचे बांधकाम केले जात होते. बंधारा बांधताना ४० एमएम गिट्टी बाहेरून बोलावून ती वापरणे आवश्यक असताना कंत्राटदाराने ४० एमएम गिट्टी न वापरता बंधाऱ्याच्या आजुबाजुचे दगड जमा केले. ते खोदून बंधाऱ्याच्या बांधकामासाठी गिट्टी वापरली, असा आरोप दीपक वैद्य यांनी केला आहे. बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाणी साठवून राहण्याकरिता गेट लावणे आवश्यक असते. तसेच हा गेट लावल्यानंतरच बांधकामाचा पूर्ण बिल काढणे आवश्यक असताना लोखंडी गेट न लावताच पूर्ण बिल देण्यात आले आहे. त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. १५ लाख रूपयांच्या निधीपैकी प्रत्यक्ष पाच लाख रूपये सुध्दा खर्च झाले नसावेत, असा आरोप सुध्दा वैद्य यांनी केला आहे. यासाठी दोषी असलेल्या ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी दीपक वैद्य यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. बंधाऱ्याचे बांधकाम ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली करण्यात येत आहे. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. मात्र ग्रामपंचायतीने स्वत: काम न करता ठेकेदाराला काम दिले. त्याच्यावरही नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे बंधारा निकृष्ठ दर्जाचा बांधण्यात आला. असाच प्रकार अनेक ठिकाणी झाला असून चंदनवेलीच्या कामात मोठा गैरव्यवहार झाला असून बांधकामाची चौकशी करण्याची मागणी दीपक वैद्य यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी करावीजिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या मार्फतीने जिल्हाभर तलाव, बोड्या खोदकाम, दुरूस्ती तसेच बंधारे बांधणे आदी कामे अहेरी उपविभागात मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहेत. राजकीय लोकांशी संबंध असलेले कंत्राटदार हे काम करीत आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागात थातूरमातूर काम केली आहेत. भामरागड, एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, सिरोंचा आदी तालुक्यात असा प्रकार झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी अकस्मात भेटी देऊन या सर्व कामांची पावसापूर्वी पाहणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. ग्रामसेवकाचा प्रतिक्रिया देण्यास नकारबंधारा बांधकामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे निकृष्ठ दर्जाच्या बंधाराबाबत गेदा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ई. एस. नारा यांना विचारणा केली असता, बंधाऱ्याच्या बांधकामाबाबत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यावरून बांधकामात घोळ असल्याचे स्पष्ट होत आहे.