शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

निकृष्ट बंधाऱ्याची पूर्ण रक्कम अदा

By admin | Updated: June 12, 2016 01:14 IST

जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग या विभागाकडून चंदनवेली येथे आदिवासी उपयोजनेंतर्गत जलशिवार योजना पाणी साठवण बंधारा बांधण्यात आला.

चंदनवेली येथील बंधारा : ग्रामपंचायतीचे दुर्लक्षएटापल्ली : जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग या विभागाकडून चंदनवेली येथे आदिवासी उपयोजनेंतर्गत जलशिवार योजना पाणी साठवण बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ठ आहे. त्यामुळे क्वालिटी कंट्रोल विभागाकडून याची चौकशी करावी, अशी मागणी दीपक वैद्य यांनी केली आहे. चंदनवेली येथे बंधारा बांधकामासाठी १५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून बंधाऱ्याचे बांधकाम केले जात होते. बंधारा बांधताना ४० एमएम गिट्टी बाहेरून बोलावून ती वापरणे आवश्यक असताना कंत्राटदाराने ४० एमएम गिट्टी न वापरता बंधाऱ्याच्या आजुबाजुचे दगड जमा केले. ते खोदून बंधाऱ्याच्या बांधकामासाठी गिट्टी वापरली, असा आरोप दीपक वैद्य यांनी केला आहे. बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाणी साठवून राहण्याकरिता गेट लावणे आवश्यक असते. तसेच हा गेट लावल्यानंतरच बांधकामाचा पूर्ण बिल काढणे आवश्यक असताना लोखंडी गेट न लावताच पूर्ण बिल देण्यात आले आहे. त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. १५ लाख रूपयांच्या निधीपैकी प्रत्यक्ष पाच लाख रूपये सुध्दा खर्च झाले नसावेत, असा आरोप सुध्दा वैद्य यांनी केला आहे. यासाठी दोषी असलेल्या ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी दीपक वैद्य यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. बंधाऱ्याचे बांधकाम ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली करण्यात येत आहे. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. मात्र ग्रामपंचायतीने स्वत: काम न करता ठेकेदाराला काम दिले. त्याच्यावरही नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे बंधारा निकृष्ठ दर्जाचा बांधण्यात आला. असाच प्रकार अनेक ठिकाणी झाला असून चंदनवेलीच्या कामात मोठा गैरव्यवहार झाला असून बांधकामाची चौकशी करण्याची मागणी दीपक वैद्य यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी करावीजिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या मार्फतीने जिल्हाभर तलाव, बोड्या खोदकाम, दुरूस्ती तसेच बंधारे बांधणे आदी कामे अहेरी उपविभागात मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहेत. राजकीय लोकांशी संबंध असलेले कंत्राटदार हे काम करीत आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागात थातूरमातूर काम केली आहेत. भामरागड, एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, सिरोंचा आदी तालुक्यात असा प्रकार झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी अकस्मात भेटी देऊन या सर्व कामांची पावसापूर्वी पाहणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. ग्रामसेवकाचा प्रतिक्रिया देण्यास नकारबंधारा बांधकामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे निकृष्ठ दर्जाच्या बंधाराबाबत गेदा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ई. एस. नारा यांना विचारणा केली असता, बंधाऱ्याच्या बांधकामाबाबत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यावरून बांधकामात घोळ असल्याचे स्पष्ट होत आहे.