शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

पावसाने पुलाची दयनीय अवस्था

By admin | Updated: July 13, 2017 02:10 IST

जनतेच्या दळणवळणासाठी सोयीचे व्हावे म्हणून रांगी ते वैरागड या मार्गावर दोन पुलाचे बांधकाम करण्यात आले.

रांगी ते वैरागड मार्ग : चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारक प्रचंड त्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क रांगी : जनतेच्या दळणवळणासाठी सोयीचे व्हावे म्हणून रांगी ते वैरागड या मार्गावर दोन पुलाचे बांधकाम करण्यात आले. रांगी ते कोरेगाव व कुकडी ते लोहारादरम्यान पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पहिल्याच मुसळधार पावसाने पुलावरील मुरूमावर खड्डे निर्माण झाले व यात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. चिखलामुळे वाहने फसून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. रांगी ते वैरागड मार्गावर पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले. मात्र पुलापासून असलेल्या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे व संबंधित कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे वाहनधारकांना या मार्गावरून खडतर व धोकादायक प्रवास करावा लागत आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्यास चिखलामुळे या मार्गावरील रहदारी बंद होण्याची शक्यता आहे. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पुलाची तत्काळ पाहणी करून येथे ठोस उपाययोजना करून पूल व रस्त्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी रांगी परिसरातील नागरिकांनी केली आहे. गतवर्षी पुलाअभावी या ठिकाणी अनेक वाहनधारकांची वाहने फसली. कित्येकांना वाहन ढकलत न्यावे लागले. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन येथे पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पूल बांधकामानंतर दगड व मुरूमाची योग्यरित्या पिचिंग न झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. रांगी-वैरागड मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात राहत असल्याने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आहे.