शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

पटसंख्या ‘जैसे थे’ राहणार

By admin | Updated: July 25, 2015 01:59 IST

कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकड्यांची विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत आली होती.

शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन : कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडीचे विद्यार्थी वैरागड : कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकड्यांची विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत आली होती. या विरोधात शिक्षक संघटनांनी आंदोलन केल्यानंतर पटसंख्या ‘जैसे थे’ च ठेवून आॅनलाईन संच मान्यता रद्द करण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक संघटनांना दिले आहे. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. सन २०१३- १४ या शैक्षणिक वर्षात शासनाने माध्यमिक शाळांना संलग्न असलेल्या आदिवासी विभागातील उच्च माध्यमिक शाळेच्या तुकडीची विद्यार्थी पटसंख्या ५०, ग्रामीण भागासाठी ५५ व शहरी भागातील उच्च माध्यमिक शाळेच्या तुकडीची विद्यार्थी पटसंख्या ६० ठरविण्यात आली होती. चालू शैक्षणिक वर्षात मात्र या तिनही विभागातील पटसंख्येची अट वाढवून ८० एवढी करण्यात आली. वरीष्ठ महाविद्यालयाला संलग्नित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडीची संख्या ८० वरून १२० करण्यात आली. यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत आले होते.या विरोधात २२ जुलै रोजी राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चे काढण्यात आले. या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. चर्चेदरम्यान शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, २८ जुलै रोजी शिक्षण सचिव, आयुक्त, संचालक आयुक्त यांच्यासोबत बैठक घेऊन १५ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन संच मान्यता रद्द करण्यात येईल. उर्वरित मागण्यांवरसुद्धा सकारात्मक निर्णय घेतल्या जाईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)