शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पटसंख्या ‘जैसे थे’ राहणार

By admin | Updated: July 25, 2015 01:59 IST

कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकड्यांची विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत आली होती.

शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन : कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडीचे विद्यार्थी वैरागड : कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकड्यांची विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत आली होती. या विरोधात शिक्षक संघटनांनी आंदोलन केल्यानंतर पटसंख्या ‘जैसे थे’ च ठेवून आॅनलाईन संच मान्यता रद्द करण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक संघटनांना दिले आहे. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. सन २०१३- १४ या शैक्षणिक वर्षात शासनाने माध्यमिक शाळांना संलग्न असलेल्या आदिवासी विभागातील उच्च माध्यमिक शाळेच्या तुकडीची विद्यार्थी पटसंख्या ५०, ग्रामीण भागासाठी ५५ व शहरी भागातील उच्च माध्यमिक शाळेच्या तुकडीची विद्यार्थी पटसंख्या ६० ठरविण्यात आली होती. चालू शैक्षणिक वर्षात मात्र या तिनही विभागातील पटसंख्येची अट वाढवून ८० एवढी करण्यात आली. वरीष्ठ महाविद्यालयाला संलग्नित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडीची संख्या ८० वरून १२० करण्यात आली. यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत आले होते.या विरोधात २२ जुलै रोजी राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चे काढण्यात आले. या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. चर्चेदरम्यान शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, २८ जुलै रोजी शिक्षण सचिव, आयुक्त, संचालक आयुक्त यांच्यासोबत बैठक घेऊन १५ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन संच मान्यता रद्द करण्यात येईल. उर्वरित मागण्यांवरसुद्धा सकारात्मक निर्णय घेतल्या जाईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)