शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
5
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
6
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
7
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
8
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
9
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
10
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
11
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
12
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
13
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
14
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
15
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
17
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
18
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
20
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

एकच दिवस उघडली पत्तीगावची शाळा

By admin | Updated: November 22, 2014 01:24 IST

येथून १० किमी अंतरावर असलेल्या पत्तीगाव येथील शाळा चालू सत्रात केवळ १५ आॅगस्ट या एकाच दिवशी उघडण्यात आली.

संजय गज्जलवार जिमलगट्टायेथून १० किमी अंतरावर असलेल्या पत्तीगाव येथील शाळा चालू सत्रात केवळ १५ आॅगस्ट या एकाच दिवशी उघडण्यात आली. शाळेत शिक्षकच येत नसल्याने नाईलाजास्तव शाळेतील विद्यार्थी जंगलात गुरे चारण्यासाठी नेत असल्याचे भयावह वास्तव प्रत्यक्ष दिसून आले. पत्तीगाव येथे १ ते ४ पर्यंतचे वर्ग असून यामध्ये १८ विद्यार्थी पटसंख्येवर दाखल आहेत. या शाळेसाठी शिक्षण विभागाने झेड. एम. पोटावी यांची नियुक्ती केली आहे. मात्र २६ जूनपासून शाळेला प्रारंभ होऊनही एकही दिवस या शाळेतील शिक्षक शाळेमध्ये आले नाही. १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात झेंडावंदन करण्यासाठी आले होते. झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तत्काळ निघून गेले. तेव्हापासून सदर शिक्षकाचे गावातील नागरिकांनी तोंडही बघीतले नाही. सत्र सुरू झाल्यानंतर बरेच विद्यार्थी अध्ययनासाठी नियमितपणे १० वाजता शाळेमध्ये जात होते. मात्र शिक्षकच येत नसल्याने दुपारी १ ते २ वाजेपर्यंत वाट बघून घराकडे परतत होते. हा प्रकार जवळपास एक महिना चालला. त्यानंतर शिक्षक येत नसल्याचे पाहून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठविणेच बंद केले. त्याऐवजी आता हे विद्यार्थी जंगलात गुरे चारण्यासाठी नेत आहेत. त्याचबरोबर आईवडिलांना शेतीच्या कामासाठी मदत करीत आहेत. प्रत्यक्ष शाळेला भेट दिली असता, या शाळेच्या सभोवताल असलेल्या कचरा व धुळीवरून सदर शाळा सहा महिने उघडण्यात आली नसावी, हे स्पष्ट दिसून येते. याच शाळेतील वर्ग दुसरीचा सुरेश कोहलू मडावी हा विद्यार्थी जंगलामध्ये गुरे चारण्यासाठी नेत आहेत. त्याला शाळेबद्दल विचारले असता, शाळा कधीच उघडत नसल्याने जंगलात गुरे चारण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. या विद्यार्थ्याला मराठी बोलता येत नव्हते. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडण्यासाठी शासन गाव तिथे शाळा उघडल्या आहेत व शिक्षकांना गलेगट्ट पगार देत आहे. मात्र दुर्गम भागातील शिक्षक शाळेत जातच नसून घरबसल्या पगार उचलत आहेत. पत्तीगाव येथील शिक्षक पोटावी यांच्या या कारभारामुळे नागरिक त्रस्त असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांनी वेळोवेळी शाळेला भेटी देणे आवश्यक आहे. मात्र दस्तरखुद्द केंद्रप्रमुखच एकचवेळा भेट दिली असल्याचे सांगत आहेत. यावरून केंद्रप्रमुखसुद्धा कामचुकारपणा करीत असल्याने त्यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे.