शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

पितृपक्षातील पूजनीय कावळा

By admin | Updated: September 30, 2016 01:38 IST

वाढत्या प्रदूषणाचा परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवरही होत आहे. याची प्रचिती पर्यावरणातील होत असलेल्या जीवसृष्टीच्या

महत्त्व आजही कायम : प्रदूषण, टॉवर, रसायने प्रजातींसाठी ‘काळ’देसाईगंज : वाढत्या प्रदूषणाचा परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवरही होत आहे. याची प्रचिती पर्यावरणातील होत असलेल्या जीवसृष्टीच्या ऱ्हासावरून नेहमीच आलेली आहे. पर्यावरणातील तसेच हिंदू संस्कृतीतील महत्त्वपूर्ण मानला जाणारा पक्षी कावळा आज वाढत्या प्रदूषणामुळे जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वायू प्रदूषण, मोबाईल टॉवरमधील धोकादायक तरंग तसेच शेती व इतर क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या परिणामांमुळे आजघडीला कावळ्यांची संख्या कमी झाली आहे. तरीसुद्धा पितृपक्षातील कावळ्याचे महत्त्व कायम आहे. सर्वपित्री अमावस्या शुक्रवारी साजरी होत आहे. या निमित्ताने सण व कावळ्याच्या महत्त्वाचा घेतलेला हा आढावा.पितृपक्षाच्या पंधरवड्यात प्राचीन काळापासून कावळ्याला एक वेगळे महत्त्व आहे. ही परंपरा हिंदू संस्कृतीत आजही जोपासली जात आहे. कावळा हा चतूर व बुद्धिमान पक्षी आहे. देशी कावळा, डोम कावळा, पहाडी कावळा तर चवथा अत्यंत दुर्मीळ आढळणारा पांढरा कावळा असे कावळ्यांच्या जातीचे चार प्रकार पाहावयास मिळतात. ग्रामीण भागात बहुतेक देशी व डोम कावळा आढळतो. परंतु पूर्वीच्या तुलनेत आज झालेल्या प्रदूषणामुळे कावळ्यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. श्री गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर पितृपक्षाला सुरूवात होते. या पंधरवड्यात घरावर टाकलेले अन्न कावळ्यांनी खावे याकरिता हाजीहाजी करावी लागते. पितृपक्षात पूजापाठ केल्यानंतर द्रोणातील नवैैद्य जोपर्यंत कावळा ग्रहण करीत नाही. तोपर्यंत सारेजण जेवणाची वाट पाहत असतात. पितृपक्षात फिरणाऱ्या कावळ्यांना यावेळी सुगीचे दिवस असतात. पितृपक्षात पूजापाठ केल्यानंतर नवैैद्याचा अधिकार प्रथम कावळ्यांना दिला जातो. पूर्वजांच्या रूपात कावळा घरी अन्नग्रहण करण्याकरिता येतो, असाही समज ग्रामीण भागात आहे. किंवा कावळ्याच्या पिलांना, कावळ्याला माणसाचा स्पर्श झाला तर त्या कावळ्यावर इतर कावळे हल्ला करतात, असाही समज ग्रामीण भागात आहे. एकूणच, पितृपक्षातील पंधरवड्यात कावळ्याचे महत्त्व आजही कायम आहे. (प्रतिनिधी)अमावस्येला अशी होते पूजापितृपक्ष अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी खास पक्वानांचे पात्र तयार केले जाते. त्याची पूजा केल्यानंतरच पात्रातील सर्व पदार्थ एका पळसाच्या किंवा घोगर वनस्पतीच्या पानांच्या द्रोणात काढून ते अंगणात ठेवतात. त्यामागील उद्देश असा की, कावळ्यांनी चोच मारून ते थोडेतरी ग्रहण करावे. कारण कावळ्यांनी चोच मारल्यानंतर ते पात्र स्वर्गातील आपल्या पितरांना पावन होते, असा समज हिंदू संस्कृतीत आजही कायम आहे. त्यामुळे पितृपक्षात कावळ्यांचे महत्त्व पूजनीय व अनन्यसाधारण आहे. दुर्गम भागातून कावळे लुप्तजिल्ह्यातील जंगलात अनेक जातींचे पशुपक्षी आढळून येतात. यात कावळ्यांची संख्या पूर्वी मोठ्या प्रमाणात होती. परंतु मागील काही वर्षांपासून प्रत्येक गावात आढळणारा कावळा दुर्गम भागातून लुप्त झाला आहे. चिमणी व इतर पक्ष्यांचा ठावठिकाणाही दुर्गम भागातील पाड्यांमध्ये दिसून येत नाही. कावळ्यांची शिकार करून त्यांचे पंख एका बांबूच्या टोकावर अडकवून ठेवण्याची प्रवृत्ती बळावल्यामुळे तसेच शिकारी वाढल्याने दुर्गम भागातील कावळे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, असे संख्येवरून दिसून येते.