शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खिचडी तपासणीचा अहवाल अप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:07 IST

तालुक्यातील खरपुंडी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील ३६ मुलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.

ठळक मुद्दे कुलूप ठोकणार : खराब झालेला जुना माल परत केल्याने वाढला संशय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील खरपुंडी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील ३६ मुलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेला १० दिवसांचा कालावधी उलटला तरी खिचडी नमुन्याचा तपासणी अहवाल अद्यापही प्राप्त झाला नाही. याशिवाय २२ जानेवारीला या शाळेतील खराब झालेला जुना तांदूळ व वाटाणा संबंधित कंत्राटदाराला परत पाठविण्यात आला आहे, त्यामुळे खिचडीतूनच विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली असावी, असा ग्रामस्थांचा संशय वाढला. त्यामुळे येत्या ५ फेब्रुवारीपर्यंत खिचडी तपासणीचा अहवाल द्यावा, अन्यथा ६ फेब्रुवारीला शाळेला कुलूप ठोकणार, असा इशारा ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांसह पालकांनी पत्रपरिषदेतून दिला आहे.यावेळी सरपंच दादाजी नैताम, उपसरपंच कमलेश खोब्रागडे, ग्रा.पं. सदस्य वाल्मिक वासेकर यांच्यासह वसंत जुआरे, घनश्याम भुसारी, पंकज बारसिंगे, प्रकाश दर्रो, हिराजी नैताम आदी पालक उपस्थित होते.प्रजासत्ताक दिन सोहळ्यानंतर २७ जानेवारीपासून खरपुंडीची जि.प. शाळा बंद आहे. १९ जानेवारीला ३६ विद्यार्थ्यांना भरती करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच १८ जानेवारीला काही मुलांची प्रकृती ढासळली होती, असे पदाधिकाºयांनी सांगितले.आम्ही प्रत्यक्ष खरपुंडी जि.प. शाळेला भेट देऊन तेथील खिचडीचे नमूने घेतले. या नमुन्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी होत नाही. त्यामुळे हे नमूने अन्न व औैषण प्रशासनाकडे सोपविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी हे नमुने स्वीकारले नाही. नमुने घेणे हे आमचेच काम आहे, असे सांगून त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हीच तेथे जाऊन नमुने घेऊ असे सांगितले. मात्र कुणीही तिथे जाऊन नमुने घेतले नाही. त्यामुळे खिचडी नमुन्याची तपासणी झाली नाही. पण विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.- डॉ. शशिकांत शंभरकर, डीएचओ, गडचिरोली