शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

प्रवाशाचे ५० हजार केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:33 IST

घाईने बसवरून उतरणाºया प्रवाशाचे ५० हजार रूपये सिटवर पडले. ही बाब लक्षात आल्यानंतर बस वाहकाने बस थांबवून प्रवाशाचे ५० हजार रूपये परत केले.

ठळक मुद्देवाहकाचा असाही प्रामाणिकपणा : आलापल्लीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : घाईने बसवरून उतरणाºया प्रवाशाचे ५० हजार रूपये सिटवर पडले. ही बाब लक्षात आल्यानंतर बस वाहकाने बस थांबवून प्रवाशाचे ५० हजार रूपये परत केले. प्रामाणिकपणा जपणाºया एसटी वाहक मनोज माणिकराव बागडे यांचे प्रवाशांनी कौतुक केले. सदर घटना आलापल्ली बसस्थानकावर सोमवारी सकाळी घडली.राकेश केशवराव अलोणे हे एमएच ४० डीएल ४१७१ क्रमांकाच्या सिरोंचा-नागपूर बसने प्रवास करीत होते. चंद्रपूरला जायचे असल्याने अलोणे हे आलापल्ली बसस्थानकावर घाईने बसवरून उतरले. दरम्यान त्यांच्या खिशातील ५० हजार रूपयांची रोकड बसच्या सिटवर पडून असल्याचे वाहकाला दिसले. तोपर्यंत राकेश अलोणे हे बरेच दूर गेले होते. त्यांच्या ओळखीचा बसमध्ये दुसरा कोणताही प्रवासी नसल्याने अलोणे यांना शोधून त्यांना सदर रक्कम परत करणे मोठे आव्हान ठरले असते. त्यामुळे बागडे यांनी बसस्थानकावरच जवळपास २० मिनिटे बस थांबवून अलोणे यांच्या बद्दल माहिती काढली. काही दूर अंतरावर गेल्यानंतर आपल्या खिशातील पैसे पडले असल्याचे अलोणे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पुन्हा आलापल्ली बसस्थानक गाठले. तोपर्यंत बस बसस्थानकावर उभीच होती. त्यांनी पैशाची विचारणा केल्यानंतर वाहक बागडे यांनी ५० हजार रूपयांची रक्कम परत केली.आजच्या व्यावहारीक जगात माणुसकी व प्रामाणिकपण हरवत चालला आहे. पैशासाठी काही नागरिक भ्रष्टाचार व चोºया करून तुरूंगात जाण्यासही घाबरत नाही. वाहक बागडे यांनी मात्र त्यांना सापडलेली ५० हजार रूपयांची रक्कम सुमारे २० मिनिटे बस थांबवून परत केली. त्यांचा हा प्रामाणिकपणा इतर नागरिकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.