शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाचे ५० हजार केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:33 IST

घाईने बसवरून उतरणाºया प्रवाशाचे ५० हजार रूपये सिटवर पडले. ही बाब लक्षात आल्यानंतर बस वाहकाने बस थांबवून प्रवाशाचे ५० हजार रूपये परत केले.

ठळक मुद्देवाहकाचा असाही प्रामाणिकपणा : आलापल्लीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : घाईने बसवरून उतरणाºया प्रवाशाचे ५० हजार रूपये सिटवर पडले. ही बाब लक्षात आल्यानंतर बस वाहकाने बस थांबवून प्रवाशाचे ५० हजार रूपये परत केले. प्रामाणिकपणा जपणाºया एसटी वाहक मनोज माणिकराव बागडे यांचे प्रवाशांनी कौतुक केले. सदर घटना आलापल्ली बसस्थानकावर सोमवारी सकाळी घडली.राकेश केशवराव अलोणे हे एमएच ४० डीएल ४१७१ क्रमांकाच्या सिरोंचा-नागपूर बसने प्रवास करीत होते. चंद्रपूरला जायचे असल्याने अलोणे हे आलापल्ली बसस्थानकावर घाईने बसवरून उतरले. दरम्यान त्यांच्या खिशातील ५० हजार रूपयांची रोकड बसच्या सिटवर पडून असल्याचे वाहकाला दिसले. तोपर्यंत राकेश अलोणे हे बरेच दूर गेले होते. त्यांच्या ओळखीचा बसमध्ये दुसरा कोणताही प्रवासी नसल्याने अलोणे यांना शोधून त्यांना सदर रक्कम परत करणे मोठे आव्हान ठरले असते. त्यामुळे बागडे यांनी बसस्थानकावरच जवळपास २० मिनिटे बस थांबवून अलोणे यांच्या बद्दल माहिती काढली. काही दूर अंतरावर गेल्यानंतर आपल्या खिशातील पैसे पडले असल्याचे अलोणे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पुन्हा आलापल्ली बसस्थानक गाठले. तोपर्यंत बस बसस्थानकावर उभीच होती. त्यांनी पैशाची विचारणा केल्यानंतर वाहक बागडे यांनी ५० हजार रूपयांची रक्कम परत केली.आजच्या व्यावहारीक जगात माणुसकी व प्रामाणिकपण हरवत चालला आहे. पैशासाठी काही नागरिक भ्रष्टाचार व चोºया करून तुरूंगात जाण्यासही घाबरत नाही. वाहक बागडे यांनी मात्र त्यांना सापडलेली ५० हजार रूपयांची रक्कम सुमारे २० मिनिटे बस थांबवून परत केली. त्यांचा हा प्रामाणिकपणा इतर नागरिकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.