शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

लांब पल्ल्याच्या बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST

गडचिराेली : जिल्हाबंदी हटविल्यानंतर गडचिराेली आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस साेडल्या जात आहेत. या बसेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

गडचिराेली : जिल्हाबंदी हटविल्यानंतर गडचिराेली आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस साेडल्या जात आहेत. या बसेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरासरी ५५ एवढे भारमान मिळत आहे. प्रत्येक दिवशी बसफेऱ्या वाढविण्याचा प्रयत्न एसटीकडून केला जात आहे. जिल्हाबंदीच्या सीमा कायम असताना जिल्ह्यातच बसफेऱ्या साेडल्या जात हाेत्या. मात्र बाजारपेठ बंद असल्याने फारसे प्रवासी मिळत नव्हते. त्यामुळे देसाईगंज, आरमाेरी, अहेरी यासारख्या प्रमुख मार्गांवर दिवसाला एक ते दाेन फेऱ्या साेडल्या जात हाेत्या. त्यांनाही प्रवासी मिळत नव्हते. ७ जूनपासून शासनाने जिल्हाबंदीच्या सीमा शिथिल केल्या. त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात बसेस साेडण्यास सुरुवात झाली. सद्यस्थितीत गडचिराेली आगारातून नांदेड, अमरावती, उमरखेड, नागपूर, चंद्रपूर, भामरागड, आसरअल्ली, लाहेरी, सिराेंचा आदी ठिकाणी बसेस साेडल्या जात आहेत.

बाॅक्स

चंद्रपूर, नागपूरसाठी गर्दी

- चंद्रपूर व नागपूरसाठी साेडल्या जाणाऱ्या बसेस एसटीसाठी नेहमीच फायद्याच्या ठरल्या आहेत. आताही या दाेन मार्गावर चांगले प्रवासी मिळत असल्याने दर अर्ध्या तासाने बस साेडली जात आहे.

- अमरावती, नांदेड, उमरखेड या मार्गांवरही बसेस साेडल्या जात आहेत. लाॅकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी कामे थांबविली हाेती. जिल्हाबंदी उठताच आता नागरिक नातेवाईकांकडे भेटण्यासाठी जात आहेत. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या बसेसला प्रतिसाद मिळत आहे.

खासगी वाहतूक सेवा बंद

खासगी बस वाहतूक हा एसटीचा सर्वात माेठा स्पर्धक आहे. मूल-चंद्रपूर मार्गावर काही खासगी बसेस सुरू झाल्या आहेत. मात्र नागपूर मार्गावरच्या बसेस अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावरचे पूर्ण प्रवासी एसटीला मिळत आहेत. मूल मार्गावरही खासगी बसेससाेबतच काही खासगी वाहने धावतात. मात्र ही वाहनेसुद्धा बंद असल्याने एसटीला चांगले प्रवासी मिळत आहेत. दाेन महिन्यापासून बससेवा बंद असल्याने एसटीला फार माेठे नुकसान सहन करावे लागले आहे. सध्याच्या स्थितीचा फायदा उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

काेट

सध्या बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दरदिवशी बसफेऱ्या वाढविण्याचा प्रयत्न एसटीमार्फत केला जात आहे. दरदिवशी १२ हजार किमीचा प्रवास एसटी करीत असून, त्यातून अडीच लाख रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. चांगले उत्पन्न मिळवून एसटीची स्थिती सुधारण्याची संधी एसटी कर्मचाऱ्यांना मिळाली आहे.

- मंगेश पांडे, आगार प्रमुख, गडचिराेली

जिल्ह्यात सध्या एसटीच्या किती फेऱ्या सुरू आहेत? - २४

वाहक - १७०

चालक - २०४

एकूण बसेस १०३