शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

गौण वनोपजामधून क्षमता व उत्पन्नवाढीसाठी ग्रामसभेचा सहभाग; मेंढा-लेखातून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 10:44 IST

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसाधारण आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच आवश्यक रोजगार निर्मितीसाठी गौण वनोपजावर आधारित ग्रामसभेच्या समन्वयातून पुढे जाणारी योजना आखण्यात आली आहे.

ठळक मुद्देलेखा-मेंढाचा प्रशासनाशी करार ठरणार ऐतिहासिकजिल्हा प्रशासन व ग्रामसभांमध्ये होणार सामंजस्य करार

गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामसभांचे कौशल्य व क्षमता वाढीसाठी कार्यक्रम हाती घेऊन गौण वनोपजामधून उत्पन्न वाढविण्यास सक्षम करण्यासाठी प्रशासन आणि विविध ग्रामसभांमध्ये सामंजस्य करार होणार आहेत. याची ऐतिहासिक सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि.१६) लेखा मेंढा या ग्रामसभेपासून झाली.

जिल्हा परिवर्तन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय मीणा आणि ग्रामसभेकडून देवाजी तोफा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून वनाधारित शाश्वत विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात केली. यावेळी वृक्षमित्र गडचिरोलीचे संयोजक मोहन हिराबाई हिरालाल यांच्यासह डॉ. रूपेन्द्रकुमार गौर, प्रा.डॉ. कुंदन दुफारे, केशव गुरनुले, बाजीराव नरोटे, रमेश दुग्गा, सचिन उईके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आणि नवीन संकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिवर्तन समिती एकल केंद्र स्थापन करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसाधारण आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच आवश्यक रोजगार निर्मितीसाठी गौण वनोपजावर आधारित ग्रामसभेच्या समन्वयातून पुढे जाणारी योजना आखण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या संकल्पनेतून यामध्ये विविध ग्रामसभांना सामावून जैवविविधता संवर्धन व शाश्वत विकास या संकल्पनांना सोबत घेऊन आदिवासींच्या उपजीविकेच्या उन्नतीसाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती

जिल्ह्यातील वनसंवर्धन समोर ठेवून शाश्वत विकासातून वनोपजामधील उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीसह कार्यक्षम पुरवठा साखळी तयार केली जाणार आहे. गौण वनोपजाचे विपणन, वितरण आणि वापर यामध्ये कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहेत. याचबरोबर वनसंवर्धन आणि व्यवस्थापन योजनेचे आराखडे तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभांना सक्षम करण्यात येणार आहे.

वनावर आधारित सर्वांगीण विकास साधण्यासाठी हे सामंजस्य करार होणार आहेत. ग्रामसभांना सक्षम करणारा हा प्रकल्प लोकसहभागातून पुढे नेण्यात येणार आहे. गोंडवाना विद्यापीठाकडून ग्रामसभास्तरावर प्रशिक्षण देण्यासाठी एक मॉडेल तयार करण्यात येत आहे. यातून वनआधारित सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे.

- संजय मीणा, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा परिवर्तन समिती

टॅग्स :GovernmentसरकारVidarbhaविदर्भGadchiroliगडचिरोली