शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

अपंगांचे पालकमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: June 8, 2015 02:19 IST

अपंग कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या समस्या निकाली काढून अपंग कल्याणाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, ...

चुरमुरा : अपंग कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या समस्या निकाली काढून अपंग कल्याणाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/ अधिकारी संघटनेच्या वतीने राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे शुक्रवारी निवेदनातून करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपंग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ तीन टक्के आरक्षणाप्रमाणे देण्यात यावा, पावसाळी अधिवेशनात १९९५ च्या अधिनियमातील धोरण निश्चित करून अंमलबजावणी करावी, अपंग बेरोजगारासाठी तीन टक्के आरक्षणाप्रमाणे सर्व आस्थापनेतील पदभरती करावी, अपंग कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे उपकरणे व साधने उपलब्ध करावित, जिल्हा परिषदेच्या आर्थिक अंदाजपत्रकात अपंगांसाठीचा एकूण तीन टक्के निधी राखीव ठेवण्यात यावा, अपंगांना दिल्या जाणाऱ्या अमानवी वागणुकीला प्रतिबंध घालण्यासाठी अपंग अ‍ॅट्रॉसीटी कायदा अंमलात आणावा, आॅनलाईन प्रमाणपत्र योजना सुलभ सोयीची होण्याकरिता शासन स्तरावर योग्य ती उपाययोजना करावी, नोव्हेंबर २००५ पासून बंद झालेली पेंशन योजना पूर्ववत करावी, कंत्राटी अपंग कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अपंग व्यक्तीला विनाअट घरकूल द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता. पालकमंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष बंडू कुमरे, सरचिटणीस अतुल मेश्राम, आनंद गुरनुले, लक्ष्मण वाढई, सुनील झाडे, रंजन बल्लमवार, राजश्री मेश्राम, शालू कांबळे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)