शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

हे पाहा जावयाचे लाड, शासकीय कार्यालयांकडे अडीच काेटी बिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

महापारेषण व इतर खासगी कंपन्यांकडून महवितरण नगदी स्वरूपात वीज खरेदी करते. मात्र, ग्राहकांना महिनाभर वीज पुरवठा केल्यानंतर वीजबिल पाठविले जाते. काही ग्राहक नियमितपणे वीजबिल भरतात. मात्र, काही ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात. विजेची थकबाकी वाढल्याने महावितरणचा आर्थिक डाेलारा काेसळण्याची शक्यता राहते. त्यामुळे वीज पुरवठ्याची कामे करण्याबराेबरच वीजबिल वसुलीची जबाबदारीसुद्धा महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर साेपविली आहे.

लाेकमत न्यूजन नेटवर्कगडचिराेली : सर्वसामान्य नागरिक महिनाभराचे वीजबिल भरले नाही तर त्याचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सूचना देतात. मात्र, शासकीय कार्यालयांकडेसुद्धा महावितरणची थकबाकी सुमारे अडीच काेटी रुपये आहे. मात्र अजूनपर्यंत शासकीय कार्यालयाची वीज कापल्याचे ऐकिवात नाही. महापारेषण व इतर खासगी कंपन्यांकडून महवितरण नगदी स्वरूपात वीज खरेदी करते. मात्र, ग्राहकांना महिनाभर वीज पुरवठा केल्यानंतर वीजबिल पाठविले जाते. काही ग्राहक नियमितपणे वीजबिल भरतात. मात्र, काही ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात. विजेची थकबाकी वाढल्याने महावितरणचा आर्थिक डाेलारा काेसळण्याची शक्यता राहते. त्यामुळे वीज पुरवठ्याची कामे करण्याबराेबरच वीजबिल वसुलीची जबाबदारीसुद्धा महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर साेपविली आहे. शासकीय कार्यालयांना खर्चासाठी वर्षातून एकदा अनुदान मिळते. त्यामुळे शासकीय कार्यालयांना तर वर्षभर उधार वीज द्यावी लागते. खर्च व उत्पन्न यांचा व्यवस्थित ताळमेळ जाेडत नसल्याने दिवंसेदिवस महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय वाईट हाेत चालली आहे. ही स्थिती वेळीच सावरण्यासाठी वेळेवर वीज बिलांची वसुली हाेणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

शासकीय कार्यालयांची वीज का कापत नाही? सामान्य नागरिकांना त्रस्त करून साेडणारी महावितरण शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा का खंडित करत नाही, असा प्रश्न आहे. शासकीय कार्यालयासाठी लागणारे इतर साहित्य ज्याप्रमाणे नगदी स्वरूपात आणले जातात. तसेच वीजबिलासाठीही अगाेदरच अनुदानाची तरतूद करण्याची गरज आहे. महावितरण ही शासकीय कंपनी आहे. महावितरणने शासनाला सवय लावण्याची गरज आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये विजेचा अपव्यय

-    शासकीय कार्यालयांचे वीजबिल भरण्याची जबाबदारी शासनाकडे राहते. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये विजेचा माेठ्या प्रमाणात अपव्यय केला जाते. 

-    लाईट, पंखे, एसी व इतर उपकरणे अनावश्यक सुरू ठेवली जातात. अनेक अधिकारी घरी कूलरमध्ये राहतात. मात्र कार्यालयात एसीचा वापर करतात. अनुदानापेक्षा वीजबिल अधिक झाल्यानंतर पुन्हा अडचण वाढते.

२ काेटी ५२ लाख थकलेजिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांकडे सुमारे २ काेटी ५२ लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. वेळाेवेळी सूचना देऊन अनुदान नसल्याच्या कारणास्तव वीजबिल भरले जात नाही. ही गंभीर बाब आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज