शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांना वाटलेले धान रोवणी यंत्र भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:55 IST

जिल्हाभरातील १२४ बचत गटांना दोन वर्षांपूर्वी धान रोवणी यंत्रांचे वितरण केले होते. दोन कोटी रूपये किमतीचे हे साहित्य देखभाल व दुरूस्तीअभावी बंद पडले असून पुन्हा पारंपरिक रितीनेच धानाची रोवणी करण्याकडे शेतकरीवर्ग वळला आहे.

ठळक मुद्देनियोजनशून्यतेचा परिणाम : सुमारे दोन कोटी रूपयांचा निधी पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील १२४ बचत गटांना दोन वर्षांपूर्वी धान रोवणी यंत्रांचे वितरण केले होते. दोन कोटी रूपये किमतीचे हे साहित्य देखभाल व दुरूस्तीअभावी बंद पडले असून पुन्हा पारंपरिक रितीनेच धानाची रोवणी करण्याकडे शेतकरीवर्ग वळला आहे.मानव विकास मिशन, जिल्हा वार्षिक योजना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत २०१३-१४ मध्ये ३७ व २०१५-१६ मध्ये ८७ शेतकरी बचतगटांना ९० टक्के अनुदानावर धान रोवणी यंत्रांचे वितरण करण्यात आले होते. अनुदानावर रोवणी यंत्र मिळत असल्याने बचतगटांनी सदर यंत्र मिळविण्यासाठी मोठी धावपळ केली होती. संबंधित यंत्राची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबंधित बचतगटावरच सोपविली होती. सदर यंत्र आंध्रप्रदेशातून एका कंपनीमार्फत आणण्यात आले होते. मात्र या यंत्रांचे सुटे भाग गडचिरोली जिल्ह्यात मिळत नसल्याने तसेच त्याची दुरूस्ती करणारे कारागिरही मिळत नसल्याने बंद पडलेले धान रोवणी यंत्र सुरूच झाले नाही.यंत्रांचे वितरण झाल्यानंतर सदर बचतगट योग्य पद्धतीने यंत्र चालवित आहे काय? सदर यंत्र चालविताना कोणत्या अडचणी येत आहेत, या सर्व बाबी समजून घेण्यासाठी कृषी विभागाने लक्ष देणे आवश्यक होते. मात्र धान रोवणी यंत्र वितरित केल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही हात वर केले आहे. अल्पावधीतच काही बचतगटांमध्ये भांडण निर्माण झाले. त्यामुळे यंत्राकडे दुर्लक्ष झाले आहे. एकूण १२४ यंत्रांपैकी ९५ टक्के यंत्र बंद पडले आहेत. या यंत्रांवर जवळपास दोन कोटी रूपयांचा निधी खर्च झाला आहे. हा सर्व निधी पाण्यात गेला आहे.सर्वच विभागांनी केले हात वरधान रोवणी यंत्रांचे वितरण मानव विकास मिशनचा निधी, जिल्हा वार्षिक योजना व आदिवासी उपयोजनेच्या निधीतून करण्यात आले. त्याला तांत्रिक मार्गदर्शन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले होते. वितरण झाल्यानंतर मात्र या सर्वच विभागांनी या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी योग्य मार्गदर्शनाअभावी सदर यंत्र धूळखात पडून आहेत.उणिवा लक्षात न घेताच यंत्रांचे वितरणधान रोवणी यंत्राच्या सहाय्याने रोवणी करावयची असल्यास धानाचा परा मॅट नर्सरीवर टाकावा लागतो. पºयाचे १५ ते २० दिवसांच्या कालावधीत रोवणे होणे आवश्यक आहे. पºयाची उंची एकदम वाढल्यास यंत्राने रोवणी करताना अडचण निर्माण होते. रोवणी वेळेवर होण्यासाठी पाऊस पडला किंवा नाही पडला तरी स्वत:ची सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा नाही. पाऊस पडला नाही तर कधीकधी दीड महिना धान रोवणीला विलंब होते. त्यामुळे धान यंत्राच्या सहाय्याने रोवणी शक्य नाही. ही बाब जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अधिकारी व कृषी सभापतींनी उपयोगिता लक्षात न घेताच नावीण्यपूर्ण उपक्रम म्हणून शेतकºयांच्या माथी रोवणी यंत्र मारले. मात्र जो परिणाम व्हायचा होता, तो आता दिसून येत आहे.शेतीचे यांत्रिकीकरण वाढावे, यासाठी शासनाकडून अनुदावर नवीन यंत्र उपलब्ध करून दिले जात आहेत. तर दुसरीकडे शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या यंत्रांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा परिषदेने काही निधी धान रोवणी यंत्रांच्या दुरूस्तीसाठी उपलब्ध करावा. त्याचबरोबर संबंधित यंत्र दुरूस्त करणारे कारागीर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अन्यथा सदर यंत्र भंगारात विकावे लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती